शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:40 IST

कल्याण : उल्हास नदीपात्रात होत असलेले प्रदूषण रोखणे व जलपर्णी काढणे या दोन प्रश्नांवर मी कल्याणकर संस्थेने १८ दिवस ...

कल्याण : उल्हास नदीपात्रात होत असलेले प्रदूषण रोखणे व जलपर्णी काढणे या दोन प्रश्नांवर मी कल्याणकर संस्थेने १८ दिवस नदीपात्रात आंदोलन केले. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन २७ फेब्रुवारी रोजी मागे घेतले गेले. मात्र, त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता नाही. त्यामुळे प्रशासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी शून्य असल्याचा आरोप आंदोलक नितीन निकम यांनी केला आहे.

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेच्या वतीने निकम यांच्यासह कैलास शिंदे व उमेश बोरगावकर यांनी आंदोलन केले होते. १८ दिवसांनंतर पालकमंत्र्यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारीही उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी तातडीने जलपर्णी काढण्यासाठी मशीन मागविण्यात यावे, त्यासाठी निविदा काढावी असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. दरम्यान, मशीन येईपर्यंत मनुष्यबळाचा वापर करून जलपर्णी काढण्याचे सूचित केले होते. मात्र, ते सोपे नाही. जलपर्णी मशीनद्वारे काढण्यासाठी निविदा काढण्यात येणार होती. मात्र, अशी मशीन तयार नसते. ती तयार करण्यासाठी ऑर्डर द्यावी लागते. ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यात जून महिना उजाडणार असून, तोपर्यंत पावसाळा लागणार आहे. त्यामुळे मशीन मागविण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. मशीनची किंमत ३ कोटींच्या घरात आहे. तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर मिठी नदीच्या ठिकाणाहून मशीन मागविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मशीन मागवून जलपर्णी काढण्याच्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय चंद्रशेखर भडसावले या पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने हर्बल फवारणी करून जलपर्णी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जावा. त्यासाठी निकम यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भडसावले यांची मदत घेण्याच्या कामाचे काय झाले याची विचारणा केली. त्यावर नार्वेकर यांनी नदीचे पाणी लाखो लोक पितात. हर्बल फवारणीने रिॲक्शन झाल्यास त्याला जबाबदार कोण, त्याची शहानिशा केल्याशिवाय हा प्रयोग करता येणार नाही, असे मत व्यक्त केले. त्यामुळे मशीनद्वारे जलपर्णी काढणे व हर्बल फवारणी करून समूळ नष्ट करणे ही दोन्ही आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. आंदोलन मागे घेऊन १६ दिवस उलटले तरी आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. मग आंदोलन मागे घेण्याचा आग्रह का धरण्यात आला, असा प्रतिप्रश्न निकम यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्र्यांची भेट घेऊन निकम हा सगळा प्रकार त्यांना सांगणार आहेत.

--------------------------------