शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:40 IST

कल्याण : उल्हास नदीपात्रात होत असलेले प्रदूषण रोखणे व जलपर्णी काढणे या दोन प्रश्नांवर मी कल्याणकर संस्थेने १८ दिवस ...

कल्याण : उल्हास नदीपात्रात होत असलेले प्रदूषण रोखणे व जलपर्णी काढणे या दोन प्रश्नांवर मी कल्याणकर संस्थेने १८ दिवस नदीपात्रात आंदोलन केले. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन २७ फेब्रुवारी रोजी मागे घेतले गेले. मात्र, त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता नाही. त्यामुळे प्रशासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी शून्य असल्याचा आरोप आंदोलक नितीन निकम यांनी केला आहे.

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेच्या वतीने निकम यांच्यासह कैलास शिंदे व उमेश बोरगावकर यांनी आंदोलन केले होते. १८ दिवसांनंतर पालकमंत्र्यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारीही उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी तातडीने जलपर्णी काढण्यासाठी मशीन मागविण्यात यावे, त्यासाठी निविदा काढावी असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. दरम्यान, मशीन येईपर्यंत मनुष्यबळाचा वापर करून जलपर्णी काढण्याचे सूचित केले होते. मात्र, ते सोपे नाही. जलपर्णी मशीनद्वारे काढण्यासाठी निविदा काढण्यात येणार होती. मात्र, अशी मशीन तयार नसते. ती तयार करण्यासाठी ऑर्डर द्यावी लागते. ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यात जून महिना उजाडणार असून, तोपर्यंत पावसाळा लागणार आहे. त्यामुळे मशीन मागविण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. मशीनची किंमत ३ कोटींच्या घरात आहे. तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर मिठी नदीच्या ठिकाणाहून मशीन मागविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मशीन मागवून जलपर्णी काढण्याच्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय चंद्रशेखर भडसावले या पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने हर्बल फवारणी करून जलपर्णी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जावा. त्यासाठी निकम यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भडसावले यांची मदत घेण्याच्या कामाचे काय झाले याची विचारणा केली. त्यावर नार्वेकर यांनी नदीचे पाणी लाखो लोक पितात. हर्बल फवारणीने रिॲक्शन झाल्यास त्याला जबाबदार कोण, त्याची शहानिशा केल्याशिवाय हा प्रयोग करता येणार नाही, असे मत व्यक्त केले. त्यामुळे मशीनद्वारे जलपर्णी काढणे व हर्बल फवारणी करून समूळ नष्ट करणे ही दोन्ही आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. आंदोलन मागे घेऊन १६ दिवस उलटले तरी आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. मग आंदोलन मागे घेण्याचा आग्रह का धरण्यात आला, असा प्रतिप्रश्न निकम यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्र्यांची भेट घेऊन निकम हा सगळा प्रकार त्यांना सांगणार आहेत.

--------------------------------