शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कोंडीच्या अहवालाची अंमलबजावणी करा

By admin | Updated: April 22, 2017 02:24 IST

शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने तयार केलेल्या अहवालाची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची केडीएमसी, रिक्षाचालक व युनियनचे

डोंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने तयार केलेल्या अहवालाची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची केडीएमसी, रिक्षाचालक व युनियनचे पदाधिकारी आणि विविध संस्थांमध्ये चर्चा झाली. या अहवालाबाबत वाहतूक विभागाने आॅनलाइनद्वारे हरकती-सूचना मागवल्या आहेत. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांनी या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.शहरातील रिक्षा, गल्लीबोळात असलेले रिक्षा स्टॅण्ड, बेशिस्त चालक, बेकायदा फेरीवाले, पार्किंग व्यवस्थेचा अभाव यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीत भर पडत असल्याचे वाहतूक विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालाबाबत नागरिकांनी www.thanepolice.org या वेबसाइटवर, cp.thane.dcptraffic@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर तसेच ठाणे वाहतूक पोलीस शाखा, तीनहातनाका, ठाणे (प.) येथे लेखी स्वरूपात हरकती-सूचना मांडाव्यात, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. शहरातील रिक्षा, रिक्षा स्टॅण्ड यावर या अहवालात वाहतूक विभागाने ठपका ठेवल्याने रिक्षा युनियन आणि नगरसेवक मंदार हळबे यांनी या अहवालात त्रुटी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यात सुधारणा आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी केली. या अहवालाचे कागदी घोडे नाचवणार का, अहवाल केडीएमसी आयुक्तांना सादर केला का, असे प्रश्न नागरिकांनी केले आहेत.शहरात किती रिक्षा स्टॅण्ड वैध आहेत, याची माहिती समितीला आहे का? ती त्यांनी आधी घ्यावी. वास्तव समोर आल्यावर जे निरीक्षण केले, ते दालनात बसून केले की, प्रत्यक्ष फिल्डवर केले, हे स्पष्ट होईल, असे भाजपाप्रणीत रिक्षा युनियनचे अध्यक्ष दत्ता माळेकर म्हणाले. (प्रतिनिधी)वाहतूककोंडीप्रश्नी समितीने नोंदवलेले निरीक्षण योग्य असले, तरी स्थानक परिसरातील कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झालेले दिसत नाहीत. अनेक रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जातात, त्याचेकाय? रिक्षा स्टॅण्डबद्दल तर बोलायची सोय नाही. - विवेक पंडित, संस्थापक, विद्यानिकेतनसमितीच्या अहवालावर डोंबिवलीत जनतादरबार भरवावा. त्यात उघडपणे मत घेऊन अंमलबजावणीबाबत तातडीने निर्णय घ्यावा.- कुशल जोशीपारदर्शक कारभारामुळेच हात दाखवा, रिक्षा थांबवा, अशी बकाल अवस्था आणि जागा तिथे रिक्षा स्टॅण्ड उभे केले जातात. त्या विषयावर काय बोलावे. - योगेश दामले‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे अहवाल तर तयार झाला. नागरिकांनी या अहवालावर आपल्या सूचना नोंदवाव्यात. त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.- सागर घोणे, श्रीखंडेवाडी रहिवासी मित्र मंडळवाहतूककोंडीचा विषय ‘लोकमत’ने योग्य पद्धतीने उचलून धरला आहे. त्यात सामाजिक संस्थांनीही सहभाग घ्यायला हवा. अहवालाच्या अंमलबजावणीसाठी स्वाक्षरी अभियान, सभा, बैठका तातडीने व्हायला हव्यात. - प्रवीण दुधे, उपाध्यक्ष, गणेश मंदिर संस्थाननागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ‘लोकमत’ने मांडला. वाहतूक विभागाने महापालिकेकडे अहवाल सादर करावा. आयुक्तांकडे पाठपुरावा करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एक त्रस्त नागरिक म्हणून माझीही आहे.- रमेश म्हात्रे, सभापती, स्थायी समिती, केडीएमसीशिवसेना नागरिकांच्या बाजूने आहे. अहवालाच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत नागरिकांची बैठक घेणार आहोत.- भाऊसाहेब चौधरी, शहरप्रमुख, शिवसेना, डोंबिवलीअहवालात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासंदर्भातील माझे मत मी वाहतूक विभागाकडे मांडणार आहे. त्यानुसार, त्यात बदल आणि अंमलबजावणी न झाल्यास मी आंदोलनावर ठाम आहे.- मंदार हळबे, नगरसेवकएखाद्या अहवालात महापालिकेवर गंभीर ताशेरे ओढले जात असतील, तर ते योग्य नाही. महापालिकेने तातडीने अंमलबजावणी केलीच पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून मी आक्रमकपणे जाब विचारेन.- प्रकाश भोईर,विरोधी पक्षनेते, केडीएमसी