शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

लस उपलब्ध हाेताच आदिवासींचे प्राधान्याने लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:42 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : शहापूर तालुक्यात खास करून बिरवाडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असणाऱ्या सर्व कातकरी वाड्या व १२ आदिवासी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भातसानगर : शहापूर तालुक्यात खास करून बिरवाडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असणाऱ्या सर्व कातकरी वाड्या व १२ आदिवासी पाड्यांतील नागरिकांना लस उपलब्ध होताच बिरवाडी येथे केंद्र सुरू करून त्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ‘लसीपेक्षा घरगुती काढ्यावरच अधिक भर’ या मथळ्याखाली साेमवारी ‘लाेकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे शहापूर तालुक्याची आराेग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. डॉ. धानके यांनी या बातमीची दखल घेत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले़.

तालुक्यात कातकरी ही आदिम जमात राहते. अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती, रुढी परंपरा यामध्येच हा समाज कायम गुंतलेला असल्याने शिक्षणापासून वंचित राहिला आहे. मजुरी करून पाेट भरायचे हेच त्यांचे नित्यकर्म ठरलेले आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे अख्खे जग संकटात सापडलेले असूनही या लोकांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. काेराेनावरील प्रतिबंधक लस घेण्यासही आदिवासी व कातकरी समाज राजी नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. बिरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या १२ आदिवासीपाडे व सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या कातकरीवाडीतील लोकांचे व इतरांचे लसीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळू वेहळे, उपसरपंच प्रकाश भेरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सासे, ग्रामसेवक कापसे यांनी केली आहे. लस उपलब्ध होताच बिरवाडी केंद्र ठरवून लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याचे डॉ. धानके यांनी सांगितले. या लसीकरणामुळे या भागात तालुक्यातील आदिवासी व अधिक संख्येने राहत असलेल्या कातकरी या जमातीच्या भातसानगर, साजिवली, कुकांबे, बिरवाडी गावातील वाड्यांना व १२ आदिवासी पाड्यांना याचा मोठा फायदा होण्यासाठी प्रयत्न करून सर्वाधिक लसीकरण करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.