शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

‘अमृत’ योजना २७ गावांमध्ये तातडीने कार्यान्वित करा - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:21 IST

कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. डोंबिवलीतील २७ गावांचा विकास व्हावा, यासाठी शिवसेना साडेतीन वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. या भागांतील पाणीसमस्या तातडीने सोडवण्यासाठी अमृत योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

डोंबिवली -  कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. डोंबिवलीतील २७ गावांचा विकास व्हावा, यासाठी शिवसेना साडेतीन वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. या भागांतील पाणीसमस्या तातडीने सोडवण्यासाठी अमृत योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या मानपाडा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.शिंदे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकांत ग्रामीण भागातून शिवसेनेला भरघोस मतदान झाले आहे. काही राजकीय पक्षांची कार्यालये केवळ निवडणुकीसाठी असतात. शिवसेना मात्र बाराही महिने कार्यालयातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करते. केडीएमसीतील २७ गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार डॉ. शिंदे, आमदार भोईर सातत्याने प्रयत्न करत असतात. या भागाच्या विकासासाठी शिवसेनेने अर्थसंकल्पात ५५० कोटींची तरतूद केली आहे. या भागातील रस्ते, अंतर्गत रस्ते यांची कामे तसेच अमृत योजना अशा विविध कामांना सुरुवात केली आहे. यामुळे नजीकच्या काळात या भागाचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कल्याण-डोंबिवलीतही क्लस्टर योजना मंजूर झाली पाहिजे. या योजनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला त्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला होता. बेकायदा इमारतींना क्लस्टर योजना कशी लागू करता येईल, असा प्रश्न विचारला जातो. अशा बेकायदा इमारतींतही नागरिक राहतात, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे शिवसेनेने क्लस्टर योजना आणली. या योजनेत अनेक त्रुटी होत्या. त्याही आता दूर झाल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींसाठीही क्लस्टर मंजूर केले पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.आमदार भोईर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी डॉ. शिंदे आणि महापौर देवळेकर यांची भाषणे झाली.‘विरोधी पक्ष काहीच करत नाहीत’राज्यात शिवसेना सत्तेत असूनही विरोध का करते, अशी टीका केली जाते. याचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काही करत नाही व विरोधी पक्ष कमकुवत आहे.त्यामुळेच शिवसेनेला विरोधी भूमिका घ्यावी लागते. शिवसेनेची बांधीलकी जनतेशी आहे. जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना सरकारमध्ये असूनही रस्त्यावर उतरते आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, असेही ते या वेळी म्हणाले.डोंबिवलीत घरच्यासारखे वाटते - अंकुश चौधरीआमदार भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी व महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी चौधरी म्हणाले, डोंबिवलीत मी वारंवार येतो. कारण, इकडे आलो की, मला घरच्यासारखे वाटते.एका गाण्यावर त्यांनी नृत्य करून रसिकांना खूश केले. आमदार भोईर यांचा जनसंपर्क दांडगा असून या कार्यालयामुळे अधिक संपर्क वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका