शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

कल्याण-डोंबिवलीतील खड्डे त्वरित बुजवा; वकिलाचे केडीएमसी आयुक्तांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:59 IST

अन्यथा कायदेशीर नोटीस पाठवणार

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यासंदर्भात अ‍ॅड. संजय मिश्रा यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना एक पत्र पाठविले आहे. मात्र, त्याची दखल न घेतल्यास खड्डे बुजविण्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविण्यात येईल, असे मिश्रा यांनी सांगितले.

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात मिश्रा राहतात. आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील सगळ्याच रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो. असे असताना महापालिका प्रशासन खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका दरवर्षी नागरिकांकडून मालमत्ता करापोटी कोट्यवधींची वसुली करते. गेल्याच वर्षी मालमत्ता करापोटी ३५० कोटींची वसुली केली होती. यंदा मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य ४५० कोटी रुपये आहे. नागरिकांनी मालमत्ता कर न भरल्यास महापालिका प्रशासनाकडून जप्ती आणि लिलावाची कारवाई केली जाते. तसेच मालमत्ता कराच्या थकबाकीचा धनादेश वेळेवर न वटल्यास महापालिका संबंधित मालमत्ताधारकावर गुन्हा दाखल करते. ही कारवाई करताना महापालिका जशी तत्परता दाखविते तशी खड्डे बुजवण्यासाठी दाखवली जात नाही. या दिरंगाई व बेपर्वा केल्याप्रकरणी प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई का करू नये. महापालिकाही कारवाईस पात्र आहे. आयुक्तांना केवळ पत्राद्वारे ही बाब निदर्शनास आणून दिली असली तरी खड्डे न बुजविल्यास महापालिकेच्या विरोधात कायदेशीर नोटीस काढली जाईल. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मिश्रा यांनी सूचित केले आहे.