शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आयरे गावातील ५०० पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : आयरे गावात यंदाही खाडीचे पाणी शिरल्याने सुमारे ५०० नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. २०१९ मध्येही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : आयरे गावात यंदाही खाडीचे पाणी शिरल्याने सुमारे ५०० नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. २०१९ मध्येही पुराचा तडाखा बसला होता. मात्र त्यावेळी तातडीने नागरिकांना तहसीलदार व अधिकाऱ्यांनी अन्नधान्य तसेच आर्थिक मदत केली होती. आताही तशीच मदत मिळावी, अशी मागणी माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी तहसीलदार दीपक काकडे यांच्याकडे सोमवारी केली आहे.

आयरे गावातील समता नगर, सहकार नगर, श्रीराम नगर, गणेश प्रसाद चाळ, कोपर पूर्व परिसर, बेडसिंग मैदान आदी परिसरातील सुमारे ५०० घरे पाण्याखाली गेल्याने तेथील नागरिकांचे खूप हाल झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. त्यामुळे त्यांना सरकारकडून तत्काळ मदत मिळणे अपेक्षित आहे. मदतीपासून नागरिक उपेक्षित राहू नये, अशी मागणी टावरे यांनी केली.

२०१९ मध्ये तत्कालीन युती सरकारने सुमारे दोन महिने पुरेल एवढा शिधा पूरग्रस्तांना दिला होता, तेवढाच किंबहुना लॉकडाऊन परिस्थिती बघता त्याहून जास्त सहकार्य केले जावे, अशी अपेक्षा टावरे यांनी व्यक्त केली. त्यावर तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, नुकसान झालेल्यांना सरकारी निकषानुसार निश्चित सहकार्य केले जाईल, असे सांगितले आहे.

------