शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मी नवखा उमेदवार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:54 IST

बाबाजी पाटील : ३३ वर्षांनी स्थानिकाला संधी

कल्याण : कल्याण लोकसभा निवडणुकीतील मी नवखा उमेदवार असल्याचा जो प्रचार सुरू आहे, तो चुकीचा आहे. माझ्यासाठी लोकसभा निवडणूक नवीन असली, तरी मी स्थानिक आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी विरोधकांना लगावला. तब्बल ३३ वर्षांनंतर या लोकसभा मतदारसंघाला स्थानिक उमेदवार मिळाला असून यावेळी स्थानिक उमेदवारालाच मतदारांकडून न्याय मिळेल, असा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

पाटील म्हणाले की, सहकार क्षेत्रात गेल्या ११ ते १२ वर्षांपासून संचालक आहे. तीन वर्षे सहकारी बँकेचा चेअरमन राहिलो आहे. २००८ ते २०१४ या काळात शिक्षण मंडळ सदस्य म्हणून, तर सध्या ठाणे महापालिकेत प्रभाग क्रमांक २९ मधून नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. लोकसभेसाठी नवीन चेहरा असलो, तरी सामाजिक कार्याचा आणि येथील स्थानिक प्रश्नांची मला चांगली जाण आहे.मी नवखा असल्याचा जो माझ्याविरोधात प्रचार सुरू आहे, तो चुकीचा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील नवखेच होते. मात्र, त्यांना मतदारांनी स्वीकारले होते. यावेळी स्थानिक उमेदवार म्हणून मलाही न्याय मिळेल, असे पाटील म्हणाले. भूमिपुत्र असल्याने आगरी-कोळी समाज पाठीशी राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच इतरही समाज आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

नेवाळी आंदोलन, २७ गावे वगळण्याचा मुद्दा स्थानिक जनता विसरणार नाही. या प्रकरणांमध्ये सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. गेल्या पाच वर्षांत सरकारने आश्वासने दिली, पण पूर्तता केली नाही.सरकारच्या विरोधात असलेला स्थानिकांचा रोष दि. २९ एप्रिलच्या मतदानातून दिसून येईल, असेही पाटील म्हणाले. मनसेच्या मतांचा आपल्याला फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्थानिक नेते कॉ. काळू कोमास्कर हे देखील उपस्थित होते.शरद पवार २६ एप्रिलला कल्याण ग्रामीणमध्येराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची सभा दि. २६ एप्रिल रोजी प्रीमिअर कॉलनी ग्राउंडवर होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.