शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

महाराष्ट्रनगरमध्ये बळावले आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 23:25 IST

कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्ल्यूसह डेंग्यूची साथ असतांनाच कच-याची विल्हेवाट आणि घाणीची स्वच्छता वेळेवर न झाल्यानेही प्रभाग क्र. ६७ मध्ये आजार बळावले आहेत.

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीकल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्ल्यूसह डेंग्यूची साथ असतांनाच कच-याची विल्हेवाट आणि घाणीची स्वच्छता वेळेवर न झाल्यानेही प्रभाग क्र. ६७ मध्ये आजार बळावले आहेत. डोंबिवली पश्चिमेच्या महाराष्ट्र नगर मध्ये अशाच विविध कारणांनी नागरिक हैराण झाले आहेत. चाळींसह काही इमारतींमधील रहिवाशांना हा त्रास होत असून महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.हाकेच्या अंतरावर असलेले ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालय नावालाच असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. दोन पाण्याच्या टाकीनजीकच्या खेळाच्या मैदानातही गुढघाभर गवत उगवले असून तेथेही डासांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आहे. त्यात काही ठिकाणच्या गटारींच्या मॅन होलवर तसेच चेंबरवर झाकणे न लावल्याने दुर्गंधीसह पाणी बाहेर रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले. त्या गटारी बंदिस्त करण्यासाठी रस्त्यासह अन्य तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले. पाण्याच्या टाकीनजीकच कुंडी असून सदान्कदा तीच्यातून कचरा भरल्याने तो नजीकच्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरतो. त्याचाही त्रास वाहनचालकांसह पादचा-यांना होतो. काही वर्षांोूर्वी महापालिकेने कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी डोंबिवलीसह कल्याणमधील काही प्रभागांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम दिले होते. मात्र काही लोकप्रतिनिधींनी ते काम चांगल्या पद्धतीने होत नसल्यासह अन्य कारणे देत त्याचे काम बंद पाडले. त्यामुळे आता पुन्हा महापालिकेच्या स्वच्छता कर्मचा-यांवर त्याचा भर पडला. आधीच अपु-या कर्मचा-यांमुळे स्वच्छतेसह अन्य विभागांचे तीनतेरा वाजलेले आहेत. त्यात कामाचा व्याप वाढल्यास जी स्वच्छता होत होती तिचाही बो-या वाजला. या वॉर्डात अपुरे सफाई कामगार असल्याने स्वच्छता होत नसल्याची टिका नागरिकांकडून होत आहे. तसेच काही ठिकाणी गवत वाढल्याने तेथेही डासांची अंडी घालण्यात येतात, पावसाचीही उघडीप मिळाल्याने अशा ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये डास वाढीस लागतात. त्याच्या सोबतील कचरा त्यामुळे येथिल रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभिर झाला आहे. या ठिकाणी बहुतांशी प्रमाणात चाळींची वस्ती असल्याने बैठी घरेच आढळून येतात. त्यामुळे डासांसह अन्य साथ रोग पसरण्यास वाव मिळत असल्याचे नागरिक सांगतात. स्वच्छता धाब्यावर बसवण्यात आल्याने ते प्रमाण वाढीस लागते. पाण्याची समस्या फारशी भेडसावत नसली तरीही ज्या ठिकाणी दोन पाण्याच्या टाक्या आहेत त्या ठिकाणची एक जुनी टाकी असून त्यातील दोन पाण्याच्या लाइनीतून पाणी गळत असते. परिणामी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. याकडेही महापालिकेचे लक्ष नसल्याची टीका करण्यात आली. गळती लागलेल्या जलकुंभाची तातडीने डागडुजी करण्यात यावी, सध्या तरी पाण्याची लाइनच दुरुस्त करावी लागणार असली तरी याकडे काणाडोळा झाल्यास ती समस्या वाढेल. भविष्यात त्याचा परिसरातील नागरिकांनाच त्रास होइल. या मुलभूत गरजेकडे लक्ष न दिल्याने परिसरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. ज्या कंत्राटदाराला आधी कचरा उचलण्याचे काम दिले होते, त्यास काही नगरसेवकांनीच विशिष्ट हेतूने काढले . या ठिकाणी अस्वच्छेतेमुळे आजार बळावलेत, त्याला कारणही महाापालिकाच आहे. जो ठेकेदार होता तो महाराष्ट्रासह देशाबाहेर चांगल्या पद्धतीने काम करित आहे, तेथे तो हेच काम करत आहे. तेथे का नाही अडचणी आल्या, यावरुनच काय ते स्पष्ट होत आहे. आमच्या कुटुंबातील मंडळीही आजारी पडली आहेत.- वामन म्हात्रे, नगरसेवक