शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

‘गोविंदवाडी बायपास’चा बेकायदा वापर

By admin | Updated: March 30, 2017 05:38 IST

गोविंदवाडी बायपास रस्त्याचे दुर्गाडी पुलाच्या दिशेला काम बाकी आहे. तरीही

कल्याण : गोविंदवाडी बायपास रस्त्याचे दुर्गाडी पुलाच्या दिशेला काम बाकी आहे. तरीही, वाहनचालकांनी या रस्त्याचा वापर सुरू केला आहे. विनापरवाना वाहतुकीसाठी पुलाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलिसांकडे केली होती. मात्र, त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या पुलावर होणाऱ्या अपघातांना पोलीसच जबाबदार आहेत, अशी बाब महामंडळाच्या पत्रव्यवहारावरून उघड झाली आहे.इयत्ता अकरावीत शिकणारा बिलाल चौधरी (रा. गोविंदवाडी परिसर) हा १५ मार्चला दुचाकीवरून जात असताना त्याला एका ट्रकने धडक दिली. त्यात त्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम एमएमआरडीएने केले आहे. २०११ मध्ये हा रस्ता तयार करण्यास घेतला होता. त्यावर, १५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या रस्त्याच्या विरोधात दोन तबेलाधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम अपूर्ण राहिले होते. रस्त्याच्या बदल्यात तबेलाधारकांना पर्यायी जागा देण्याचे महापालिकेने कबूल केले. मात्र, ही जागा दिलेली नाही. त्यामुळे या रस्त्याचा पेच अद्याप कायम आहे. रस्त्याचे एका बाजूचे काम पूर्ण होण्याआधीच वाहनचालकांनी त्याचा वापर सुरू केला. तसेच शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागण्यापूर्वी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून लवकरच दुसरी बाजू सुरू केली जाईल, असे स्पष्ट केले होते.दुर्गाडीच्या दिशेला पुलाचे थोडेफार रस्त्याचे काम शिल्लक असताना वाहनचालकांनी रस्त्याचा वापर सुरू केला आहे. मात्र, रस्त्याचा हा बेकायदा वापर होत असल्याची बाब रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय भोंडे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिसांच्या निदर्शनास आणली होती. त्यासाठी त्यांनी ११ जानेवारीला एक पत्रही पोलिसांना दिले आहे. काम अपूर्ण असलेल्या रस्त्याच्या बाजूने कल्याण-डोंबिवली महापालिकेचा घनकचरा वाहून नेणाऱ्या जय मल्हार कंपनीचा ट्रक व जेसीबी जातो. अपूर्ण रस्त्याचा विनापरवानगी वापर करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी महामंडळाने पोलिसांकडे केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. सामाजिक कार्यकर्त्या अजमत आरा यांनी सांगितले की, गोविंदवाडी पुलाचे काम मंजूर विकास आराखड्यानुसार झालेले नाही. रस्त्यासाठी महापालिकेने अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. त्याचवेळी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने तीन सदस्य समिती नेमली होती. न्यायालयाने दिलेल्या नकाशानुसार रस्त्याचे काम झालेले नाही. मंजूर नकाशानुसार रस्त्याचे काम होत नसल्याचे तत्कालीन आयुक्त, नगररचनाकार, तहसीलदार, भूमी अभिलेख यांनी मान्य केले आहे. तसा पत्रव्यवहारही आरा यांच्याकडे आहे. नागरिकांची महापालिकेने दिशाभूल केली आहे. तशी तक्रारही आरा यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिली होती. पोलसांनी हा विषय दिवाणी असल्याने न्यायालयात जाण्याचा सल्ला आरा यांना दिला होता. त्यांच्या मते मंजूर नकाशाप्रमाणे हा रस्ता व्हावा. त्यामुळे हा रस्ता चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे. लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे हा रस्ता तयार केला जात असल्याचे माहितीच्या अधिकारात महामंडळाने आरा यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. हे अतिरिक्त काम असल्याने ते एमएमआरडीएच्या निधीतून केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) रस्त्याचे वळण ठरतेय अपघातास कारणीभूत‘उमंग’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार शेख यांनी सांगितले की, रस्त्याला रेलिंग असावे. रस्त्याचे वळण अपघातास कारणीभूत ठरते. पत्रीपुलाच्या दिशेला नाल्याचे काम महामंडळाऐवजी महापालिकेने केले आहे.त्यामुळे तेथील सोसायटीमधील नागरिकांचा रस्ता बंद झाला आहे. तेथील नाला अरुंद आहे. अपूर्ण रस्त्याचा विनापरवानगी वापर करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी महामंडळाने पोलिसांकडे केली आहे.