शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

बेकायदा रिक्षांचा भिवंडीत मांडला उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:48 IST

नितीन पंडित : लाेकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्या लाॅकडाऊन लागल्यानंतर रिक्षाव्यवसाय ठप्प झाला हाेता. काेराेनाचा प्रभाव ...

नितीन पंडित : लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्या लाॅकडाऊन लागल्यानंतर रिक्षाव्यवसाय ठप्प झाला हाेता. काेराेनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर हळूहळू रिक्षांना काही बंधने घालून परवानगी देण्यात आली. मात्र, रिक्षाचालकांनी ही बंधने धुडकावून आपल्या बेशिस्त वर्तनाचेच दर्शन घडवले आहे. काेराेना काळातील कसर भरून काढण्याचा चंग बांधून या रिक्षाचालकांनी सर्वसामान्य जनतेच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊन लूट चालवली आहे. शहर आणि ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणावर भाडेवाढ केली आहे. ग्रामीण भागात तर कहरच केला आहे. चार-पाच किमीच्या प्रवासासाठी प्रति माणसी १० वरून २० रुपये भाडेवाढ केली आहे. काही वेळा तर स्पेशल भाड्याच्या नावाखाली ८० ते १०० रुपये उकळले जात आहेत. ज्या निर्बंधांमुळे ही भाडेवाढ केली त्या निर्बंधांचा मात्र साेयीस्कर विसर पडला आहे.

कोरोना संकटामुळे रिक्षात कमी प्रवासी बसविण्यात यावे असे निर्देश आहेत. मात्र भिवंडी शहर व ग्रामीण भागात चार प्रवासी आल्याशिवाय रिक्षा जागची हलतच नाही. भिवंडीत जवळपास सर्वच रिक्षा सीएनजीवर चालतात. मात्र, पेट्रोल-डिझेल दरवाढीची बाब पुढे करून भिवंडीत रिक्षाचालकांकडून स्वयंघोषित भाडेवाढ ही प्रवाशांच्या अंगवळणीच पडली आहे. भिवंडी ग्रामीण भागातील अंजुरफाटा ते वडघर डुंगे खारबाव हा चार ते पाच किलोमीटरचा प्रवास आहे. यासाठी प्रवाशांना २० रुपये मोजावे लागतात. तर शहरात अंजुरफाटा ते वंजारपट्टी नाका या सहा ते सात किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल तीस रुपये माणसी मोजावे लागतात. याउपरही रिक्षाचालक दाेनच प्रवाशांना परवानगी असताना चार ते पाच प्रवासी काेंबून व्यवसाय करत आहेत. शिवाय, बेकायदा रिक्षाव्यावसायिकांचा विषय तर त्यापेक्षाही गहन बनला आहे. त्यांना काही नियम पाळायचे असतात हेच माहिती नसतात. वरून मुजाेरीही वाढली आहे. चालकांमुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांची पिळवणूक हाेत आहे.

राजकीय पुढाऱ्यांचा आशीर्वाद

बेकायदा रिक्षाचालकांवर स्थानिक नेते, पुढाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने दिवसेंदिवस मुजाेरी वाढली आहे. रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांची नेहमीच पायमल्ली होताना दिसते. त्यांच्या बेदरकार रिक्षा चालविण्यामुळे अनेक प्रवाशांना अपघाताचा सामना करावा लागत आहे.

काेट

काही दिवसांपूर्वी अंजुरफाटा येथून पायी जाताना एका रिक्षाचालकाने वाहन बेदरकारपणे चालवून धडक दिली. हा रिक्षाचालक मदत करण्याऐवजी माझ्याशी मुजोरीने वागला आणि जखमी अवस्थेत मला साेडून पळून गेला. रुग्णालयात उपचार घेताना नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस जबाबासाठी आले. पण त्या रिक्षाचालकावर काहीच कारवाई झाली नाही.

- कविता जाधव-उबाळे, पूर्णागाव

शहरातील बेकायदा रिक्षांवर कारवाई करण्याचे अधिकार आरटीओकडे असतात, आरटीओ, वाहतूक पोलीस व मनपा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बेकायदा रिक्षा स्टॅण्डला परवानग्या दिल्या जातात. रिक्षा स्टॅंण्डवर २० ते २५ रिक्षा थांबण्याची परवानगी असते. शहरात अधिकृत २० ते २५ स्टॅण्ड आहेत. त्यामुळे शहरात ५०० ते ७०० किंवा हजारांच्या आतच अधिकृत रिक्षा असतील. मात्र आज शहरात पाच हजारहून अधिक रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. तसेच त्या कोठेही उभ्या केल्या जात असल्याने वाहतूककोंडीही वाढली आहे.

- कल्याणजी घेटे, वाहतूक पोलीस निरीक्षक, नारपोली अंजुरफाटा शाखा