शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

राणा डम्पिंगच्याखाली बेकायदा बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:39 IST

उल्हासनगर : ओव्हरफ्लो झाल्याने बंद केलेल्या राणा डम्पिंग ग्राउंडच्या पायथ्याशी चक्क बेकायदा चाळींचे बांधकाम सुरू झाले आहे. पावसाळ्यात कचऱ्याचा ...

उल्हासनगर : ओव्हरफ्लो झाल्याने बंद केलेल्या राणा डम्पिंग ग्राउंडच्या पायथ्याशी चक्क बेकायदा चाळींचे बांधकाम सुरू झाले आहे. पावसाळ्यात कचऱ्याचा ढिगारा कोसळून जीवितहानी होण्याची भीती भाजपचे नगरसेवक महेश सुखरामनी यांनी व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्त, प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलीस उपायुक्त आदींना सुखरामनी यांनी पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.

उल्हासनगर महापालिकेचे म्हारळगावजवळील दुर्गानगर राणा खदान येथील डम्पिंग ग्राउंड कचऱ्याने ओव्हरफ्लो झाल्यावर तत्कालीन आयुक्तांनी खबरदारी म्हणून डम्पिंग ग्राउंड कॅम्प नं. ५ परिसरातील खडी खदान येथे स्थलांतरीत केले. तेव्हापासून शहरातील कचरा खडी खदान येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे. तर राणा खदान ग्राउंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करून खत बनविण्याचे काम सुरू असून, त्यासाठी १० कोटींचा निधी सरकारकडून मिळाला आहे. तर दुसरीकडे भूमाफिया राणा खदान डम्पिंग ग्राउंड शेजारील खुल्या जागेवर बेकायदा बांधकामे करीत आहेत. गेल्या आठवड्यात सहायक आयुक्त अनिल खातुरानी यांच्या पथकाने पाडकाम कारवाई केलेले बेकायदा बांधकाम पुन्हा उभे राहिले आहे.

ओव्हरफ्लो झालेल्या व बंद ठेवलेल्या राणा डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम १० कोटींच्या निधीतून सुरू असताना दुसरीकडे ग्राउंडच्या पायथ्याशी असलेल्या कचऱ्याचे सपाटीकरण जेसीबीद्वारे करून चाळींचे बांधकाम सुरू केल्याचा आरोप सुखरामनी, मनसेचे प्रवीण माळवे आदींनी केला आहे. उन्हाळ्यात कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडतात. पावसाळ्यात कचऱ्याचे ढीग पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टीवर कोसळून जीवितहानी होण्याची भीती या दोघांनी व्यक्त केली आहे.