शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

अवैध बांधकामांचा अध्यादेश अजेंड्यावर

By admin | Updated: January 26, 2017 03:09 IST

उल्हासनगरची अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने विशेष अध्यादेश काढला. पण तांत्रिक कारणामुळे त्याची प्रक्रिया ठप्प झाली.

सदानंद नाईक / उल्हासनगरउल्हासनगरची अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने विशेष अध्यादेश काढला. पण तांत्रिक कारणामुळे त्याची प्रक्रिया ठप्प झाली. पालिका निवडणुकीत प्रत्येक पक्षाने या अध्यादेशाला गती देण्याचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेतला आहे. त्यामुळे बांधकामे नियमित होतील. पालिकेला उत्पन्न मिळेल आणि त्यातील अनेक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मुद्दाही निकाली निघेल. उल्हासनगरातील ८५५ अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शहरात एकच हंडकप झाला होता. हजारो जण बेघर होतील, असा मुद्दा उपस्थित झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाडकाम सुरू करताच नागरीक रस्त्यावर उतरले. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारने उल्हासनगर हे विस्थापित सिंधी समाजाचे शहर असल्याचे सांगून त्या शहरासाठी २००६ साली विशेष अध्यादेश काढला. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीनिहाय तज्ज्ञ समितीची स्थापना केली. पालिकेकडे वैध-अवैध बांधकामांची यादी नसल्याने सरसकट सर्वच मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवून अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले. त्यानंतर २२ हजारांपेक्षा जास्त प्रस्ताव आले. त्यांची छाननी झाली. मात्र फक्त १०० बांधकामे नियमित होऊन दंडापोटी सात कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळाले. नंतर तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या. जिल्हाधिकारी व पालिकेच्या दुर्लक्षामुळे अध्यादेशाची प्रक्रिया ठप्प झाली.राज्य सरकार व महापालिकेने अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी तत्काळ विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली असती तर हजारो बांधकामे नियमित होऊन पालिकेला हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असते. शिवसेना-भाजप, रिपाइं व साई पक्षाची सत्ता असताना त्यांनी या प्रकरणात काहीही केले नाही. आता मात्र पालिका निवडणुकीच्या काळात सर्वच पक्ष अध्यादेशाची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन देणार आहेत. तसेच इमारतींचा दंड कमी करू, असेही आश्वासन देण्याच्या हालचाली सुरू आहेत.