शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

अवैध बांधकामांचा अध्यादेश अजेंड्यावर

By admin | Updated: January 26, 2017 03:09 IST

उल्हासनगरची अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने विशेष अध्यादेश काढला. पण तांत्रिक कारणामुळे त्याची प्रक्रिया ठप्प झाली.

सदानंद नाईक / उल्हासनगरउल्हासनगरची अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने विशेष अध्यादेश काढला. पण तांत्रिक कारणामुळे त्याची प्रक्रिया ठप्प झाली. पालिका निवडणुकीत प्रत्येक पक्षाने या अध्यादेशाला गती देण्याचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेतला आहे. त्यामुळे बांधकामे नियमित होतील. पालिकेला उत्पन्न मिळेल आणि त्यातील अनेक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मुद्दाही निकाली निघेल. उल्हासनगरातील ८५५ अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शहरात एकच हंडकप झाला होता. हजारो जण बेघर होतील, असा मुद्दा उपस्थित झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाडकाम सुरू करताच नागरीक रस्त्यावर उतरले. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारने उल्हासनगर हे विस्थापित सिंधी समाजाचे शहर असल्याचे सांगून त्या शहरासाठी २००६ साली विशेष अध्यादेश काढला. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीनिहाय तज्ज्ञ समितीची स्थापना केली. पालिकेकडे वैध-अवैध बांधकामांची यादी नसल्याने सरसकट सर्वच मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवून अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले. त्यानंतर २२ हजारांपेक्षा जास्त प्रस्ताव आले. त्यांची छाननी झाली. मात्र फक्त १०० बांधकामे नियमित होऊन दंडापोटी सात कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळाले. नंतर तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या. जिल्हाधिकारी व पालिकेच्या दुर्लक्षामुळे अध्यादेशाची प्रक्रिया ठप्प झाली.राज्य सरकार व महापालिकेने अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी तत्काळ विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली असती तर हजारो बांधकामे नियमित होऊन पालिकेला हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असते. शिवसेना-भाजप, रिपाइं व साई पक्षाची सत्ता असताना त्यांनी या प्रकरणात काहीही केले नाही. आता मात्र पालिका निवडणुकीच्या काळात सर्वच पक्ष अध्यादेशाची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन देणार आहेत. तसेच इमारतींचा दंड कमी करू, असेही आश्वासन देण्याच्या हालचाली सुरू आहेत.