शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

तौक्ते चक्रीवादळातील क्षतीग्रस्त १०८ सार्वजनिक मालमत्तांची उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तब्बल चार हजार २५२ दुर्दैवी घटना घडल्या. यात तिघांच्या मृत्यूसह १६७ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तब्बल चार हजार २५२ दुर्दैवी घटना घडल्या. यात तिघांच्या मृत्यूसह १६७ जनावरेही दगावली. यासाठी तब्बल सात कोटी ५४ लाख इतकी नुकसानभरपाई अपेक्षित आहे. मात्र, यातून आतापर्यंत सहा कोटी ८० लाखांच्या नुकसानभरपाईचे वाटप झाले. परंतु, १०८ सार्वजनिक वास्तूंची ७४ लाखांची भरपाई शासनाने अद्याप गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळात एक हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतीच्या नुकसानीसह दोन हजार १८१ कच्च्या घरांचे, २४५ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान, तर २१ पक्की घरे पूर्णपणे बरबाद झाली. याशिवाय समुद्रातील दोन बोटी, १४६ मच्छीमार जाळी अशा तब्बल चार हजार २५३ दुर्दैवी घटना घडल्या. याशिवाय तीन जणांचा मृत्यू आणि दोन गंभीर जखमी आहेत. या नैसर्गिक आपत्तीत जवळजवळ सात कोटी ५४ लाख ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले. यास अनुसरून सहा कोटी ८० लाखांची नुकसानभरपाई शासनाने आतापर्यंत वाटप केली आहे. मात्र, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपयुक्त १०८ मालमत्तांचे, वास्तूंचे, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांचे नुकसान वादळामुळे झाले आहे. त्यासाठीच्या भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, शासनाने तब्बल ७३ लाख ९० हजारांची भरपाई गांभीर्याने घेतली नाही.

जिल्ह्यातील या वास्तू, शाळा, वसतिगृहे भरपाईच्या रकमेअभावी नादुरुस्त अवस्थेत उभ्या आहेत. काही शाळांवरील पत्रे, कौले उडाली आहेत. काहींची पूर्णपणे पडझड झाली असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे. त्यांच्या या नुकसान भरपाईकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.