शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

तौक्ते चक्रीवादळातील क्षतीग्रस्त १०८ सार्वजनिक मालमत्तांची उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तब्बल चार हजार २५२ दुर्दैवी घटना घडल्या. यात तिघांच्या मृत्यूसह १६७ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तब्बल चार हजार २५२ दुर्दैवी घटना घडल्या. यात तिघांच्या मृत्यूसह १६७ जनावरेही दगावली. यासाठी तब्बल सात कोटी ५४ लाख इतकी नुकसानभरपाई अपेक्षित आहे. मात्र, यातून आतापर्यंत सहा कोटी ८० लाखांच्या नुकसानभरपाईचे वाटप झाले. परंतु, १०८ सार्वजनिक वास्तूंची ७४ लाखांची भरपाई शासनाने अद्याप गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळात एक हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतीच्या नुकसानीसह दोन हजार १८१ कच्च्या घरांचे, २४५ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान, तर २१ पक्की घरे पूर्णपणे बरबाद झाली. याशिवाय समुद्रातील दोन बोटी, १४६ मच्छीमार जाळी अशा तब्बल चार हजार २५३ दुर्दैवी घटना घडल्या. याशिवाय तीन जणांचा मृत्यू आणि दोन गंभीर जखमी आहेत. या नैसर्गिक आपत्तीत जवळजवळ सात कोटी ५४ लाख ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले. यास अनुसरून सहा कोटी ८० लाखांची नुकसानभरपाई शासनाने आतापर्यंत वाटप केली आहे. मात्र, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपयुक्त १०८ मालमत्तांचे, वास्तूंचे, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांचे नुकसान वादळामुळे झाले आहे. त्यासाठीच्या भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, शासनाने तब्बल ७३ लाख ९० हजारांची भरपाई गांभीर्याने घेतली नाही.

जिल्ह्यातील या वास्तू, शाळा, वसतिगृहे भरपाईच्या रकमेअभावी नादुरुस्त अवस्थेत उभ्या आहेत. काही शाळांवरील पत्रे, कौले उडाली आहेत. काहींची पूर्णपणे पडझड झाली असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे. त्यांच्या या नुकसान भरपाईकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.