शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: August 3, 2015 01:13 IST

गटबाजीच्या राजकारणाने सर्वच पक्षांना पोखरले असून पक्षश्रेष्ठींच्या निवडप्रक्रियेला आणि निर्णयालाही फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण-डोंबिवलीतील

अनिकेत घमंडी , डोंबिवलीगटबाजीच्या राजकारणाने सर्वच पक्षांना पोखरले असून पक्षश्रेष्ठींच्या निवडप्रक्रियेला आणि निर्णयालाही फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण-डोंबिवलीतील महत्वाच्या बहुतांशींनी एकत्रितपणे राजीनामे दिले आहेत. या ठिकाणच्या आजी-माजी नगरसेवकांसह २५ जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना ९ जुलैदरम्यान दिले. जिल्हा नेतृत्वाकडून होणारी निर्णय प्रक्रिया मान्य नसल्याचे कारण सांगत त्यांनी हे राजीनामे दिल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आहे, परंतू त्याची दखलही वरिष्ठांनी घेतलेली नसल्याने या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. राजीनामे त्यांनी ९ जुलै रोजी तटकरेंना मुंबईत जाऊन दिले. आधी ते पक्षश्रेष्ठी अजित पवार यांच्याशी संपर्क साधणार होते, परंतू ते नसल्याने त्यांनी ते पत्र तटकरेंना भेटून देण्यासाठी तेथे गेले, मात्र तेही नसल्याने त्यांच्या कार्यालयात ते देण्यात आले. त्याची दखल घेत दोन दिवसात पवार बोलावतील अशी अपेक्षा पदाधिकारी कार्यकर्त्यांना होती, परंतू अद्याप ना फोन ना बैठक - भेटीचे निमंत्रण अशी अवस्था असल्याचे सूत्रांनी सांगितले. राजीनामा दिलेल्यांमध्ये ६ विद्यमान नगरसेवक - नगरसेविका, माजी नगरसेवक, विद्यार्थी अध्यक्ष, माजी शिक्षण मंडळ सभापती, सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष, माजी महिला अध्यक्ष आदींसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. लवकरच महापालिकेच्या निवडणूका होत आहेत, आधीच पक्षाने खासदारकी-आमदारकी ला सपाटून मार खाल्लेला असतांना आता नवनवे निर्णय का लदाण्यात येत आहेत, बदल करण्यासही हरकत नाही, परंतू ते निर्णय घेतांना लोकल बॉडीला विचारात का घेतले जात नाही. जे निर्णय घ्यायचे आहेत ते निवडणुकीनंतर घ्यावेत. सध्या कोणतेही बदल करू नयेत. अन्यथा आम्ही राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहोत असा त्यांचा पवित्रा आहे.