शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: August 3, 2015 01:13 IST

गटबाजीच्या राजकारणाने सर्वच पक्षांना पोखरले असून पक्षश्रेष्ठींच्या निवडप्रक्रियेला आणि निर्णयालाही फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण-डोंबिवलीतील

अनिकेत घमंडी , डोंबिवलीगटबाजीच्या राजकारणाने सर्वच पक्षांना पोखरले असून पक्षश्रेष्ठींच्या निवडप्रक्रियेला आणि निर्णयालाही फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण-डोंबिवलीतील महत्वाच्या बहुतांशींनी एकत्रितपणे राजीनामे दिले आहेत. या ठिकाणच्या आजी-माजी नगरसेवकांसह २५ जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना ९ जुलैदरम्यान दिले. जिल्हा नेतृत्वाकडून होणारी निर्णय प्रक्रिया मान्य नसल्याचे कारण सांगत त्यांनी हे राजीनामे दिल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आहे, परंतू त्याची दखलही वरिष्ठांनी घेतलेली नसल्याने या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. राजीनामे त्यांनी ९ जुलै रोजी तटकरेंना मुंबईत जाऊन दिले. आधी ते पक्षश्रेष्ठी अजित पवार यांच्याशी संपर्क साधणार होते, परंतू ते नसल्याने त्यांनी ते पत्र तटकरेंना भेटून देण्यासाठी तेथे गेले, मात्र तेही नसल्याने त्यांच्या कार्यालयात ते देण्यात आले. त्याची दखल घेत दोन दिवसात पवार बोलावतील अशी अपेक्षा पदाधिकारी कार्यकर्त्यांना होती, परंतू अद्याप ना फोन ना बैठक - भेटीचे निमंत्रण अशी अवस्था असल्याचे सूत्रांनी सांगितले. राजीनामा दिलेल्यांमध्ये ६ विद्यमान नगरसेवक - नगरसेविका, माजी नगरसेवक, विद्यार्थी अध्यक्ष, माजी शिक्षण मंडळ सभापती, सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष, माजी महिला अध्यक्ष आदींसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. लवकरच महापालिकेच्या निवडणूका होत आहेत, आधीच पक्षाने खासदारकी-आमदारकी ला सपाटून मार खाल्लेला असतांना आता नवनवे निर्णय का लदाण्यात येत आहेत, बदल करण्यासही हरकत नाही, परंतू ते निर्णय घेतांना लोकल बॉडीला विचारात का घेतले जात नाही. जे निर्णय घ्यायचे आहेत ते निवडणुकीनंतर घ्यावेत. सध्या कोणतेही बदल करू नयेत. अन्यथा आम्ही राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहोत असा त्यांचा पवित्रा आहे.