शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

...पण गळतीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:10 IST

या चौकात नेहमीच वर्दळ असते. येथेच वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. २५ दिवसांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, तिला गळती लागल्याने रस्त्याच्या अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत.

कल्याण : पूर्वेकडील कोळसेवाडी चक्कीनाका भागातील चौकात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. परंतु, या जलवाहिनीला गळती लागल्याने येथे सर्वत्र पाणीचपाणी होऊन मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाल्याने सध्या येथे अपघातही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी वाहतूक पोलीस उपविभागाच्या वतीने महापालिकेकडे पत्रव्यवहार करून तातडीने गळक्या जलवाहिनीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.पूर्वेकडील चक्कीनाका चौक परिसर हा कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली या शहरांकडून हाजीमलंग रोडकडे जाणारा आणि येणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या चौकात नेहमीच वर्दळ असते. येथेच वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. २५ दिवसांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, तिला गळती लागल्याने रस्त्याच्या अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साठते आहे. शिवाय, या खड्ड्यांची खोली किती आहे, याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. यामुळे अपघातही घडत आहेत.एकीकडे शहरात पाणीकपात लागू असताना दुसरीकडे अशा गळतीच्या माध्यमातून होत असलेली पाण्याची नासाडी हा चर्चेचा विषय आहे. दरम्यान, कोळसेवाडी भागातील शहर वाहतूक उपशाखा विभागाचे एस.एन. जाधव यांनी केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले आहे.अपघात घडल्यास जबाबदारी महापालिकेचीजलवाहिनीची दुरुस्ती आणि खड्डे भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर पार पाडावी, अन्यथा भविष्यात अपघात घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची राहील, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या व्हॉल्व्हचे लिकेज होऊन रस्त्यावर पाणी आल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.यासंदर्भात ‘लोकमत’ने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा