शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

झाडे तोडण्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:11 IST

केडीएमसीचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांचे झाडे तोडण्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे

कल्याण : केडीएमसीचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांचे झाडे तोडण्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी केला आहे. या संदर्भात हळबे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. जाधव यांच्याकडे कोणत्याही एका विभागाचा पूर्णवेळ कार्यभार सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.मुंबई, ठाणे परिसरात धोकादायक झाडे कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. मात्र, केडीएमसीही हद्दीतही धोकादायक अवस्थेत झाडे आहेत. त्याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाल्याकडे हळबे यांनी लक्ष वेधले आहे. अशी झाडे तसेच वाढलेली झाडे छाटणी करणे, यासंदर्भात मागील चार-पाच महिन्यांपासून नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित आहेत. परंतु, त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे हळबे यांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या परवानगी पत्रांकडेही दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले.प्रभारी म्हणून सचिव जाधव हे महापालिकेत उद्यान अधीक्षक म्हणून मूळ पदावर कार्यरत आहेत. परंतु, त्यांच्याकडे सचिवपदासारखी महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याने त्यांना उद्यान विभागाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. मुंबई, ठाण्यासारखी एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का?, असा सवालही हळबे यांनी केला आहे. एकतर जाधव यांच्याकडून उद्यान अधीक्षकाचा पदभार काढून घेत त्यांना सचिवपदाचा कायमस्वरूपी कारभार सोपवावा, अन्यथा अन्य कोणालातरी पूर्णवेळ उद्यान अधीक्षकाची जबाबदारी सोपवावी, याकडे हळबे यांनी लक्ष वेधले आहे.या संदर्भात हळबे यांनी केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाला मंगळवारी पत्र दिले असून, यावर कोणता निर्णय घेतला जातो? याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.