शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

पाणी मिळाले नाही तर लॉकडाऊनमध्येही मोर्चाला सामोरे जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:42 IST

अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रापाडा, कोहोजगाव, कमलाकरनगर, विठ्ठल मंदिर परिसर, चिंचपाडा, शास्त्रीनगर नालंदानगर, डीएमसीचाळ आदी भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली ...

अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रापाडा, कोहोजगाव, कमलाकरनगर, विठ्ठल मंदिर परिसर, चिंचपाडा, शास्त्रीनगर नालंदानगर, डीएमसीचाळ आदी भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यात एखाद दिवस पाणी न आल्यास तीन दिवस पाण्याविना राहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने जीवन प्राधिकरणाने पाण्याचे नियोजन करीत असताना, सर्व नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. हे करीत असताना नागरिकांना योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल, असा विश्वास देखील निर्माण केला होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून अनेक ठिकाणी तीन ते चार दिवस तो होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शहरात भीषण पाणीटंचाई असतानादेखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत होती. अखेर संताप अनावर झाल्याने नागरिकांनी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि नगरसेवक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. या मोर्चाचे नियोजन सुरू असतानाच अंबरनाथ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून लॉकडाऊनच्या काळात मोर्चा काढू नये, अशी विनंती काँग्रेस पक्षाला केली.

पाणीसमस्या चर्चेने सोडवण्यासाठी अंबरनाथ पोलीस ठाण्यात सोमवारी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रदीप पाटील यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी येत्या तीन दिवसात पाणी प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिले. पोलिसांच्या मध्यस्थीने काँग्रेसचा मोर्चा स्थगित केला असून येत्या तीन दिवसांत ही समस्या न सुटल्यास लॉकडाऊनमध्येदेखील जीवन प्राधिकरणावर मोर्चा काढू, असा स्पष्ट इशारा दिला.