शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

15 दिवसात जिझिया कर मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

By admin | Updated: March 15, 2017 16:40 IST

ठाण्यातील हजारो नागरिकांना ठाणे जिल्हाधिकार्यांनी महाराष्ट्र जमीन महसुलांतर्गत लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा पाठविल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 15 - ठाण्यातील हजारो नागरिकांना  ठाणे जिल्हाधिकार्यांनी महाराष्ट्र जमीन महसुलांतर्गत लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या सर्व नोटिसा नियमबाह्य असून पंधरा दिवसात या नोटीसा मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे     आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिला. 
 राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 35 नगरसेवक  आणि कार्यकत्यानी आंदोलन करुन र जिल्हाधिकार्यांना एक निवेदन देण्यात आले.
गरिबांकडून जबरदस्तीने वसूल केला जाणारा हा जिझीया दंड कदापी भरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ सरकारी तिजोरीत खडखडाट झाला असल्यानेच शासनाकडून अशा प्रकारे सर्व सामान्य जनतेवर आसुड ओढले जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने हे आंदोलन छेडले होते. बुधवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादीच्या पाचपाखाडी भागातील कार्यालयापासून या आंदोलनाला सुरवात झाली. या आंदोलनात शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच नगरसेवक आणि रहिवाशी आणि व्यापारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलनही करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा ही लोकशाही मार्गाने कार्यरत आहे किंवा नाही?, याबाबत सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शासाकडून प्रशासकीय हुकुमशाहीचा जनतेवर प्रयोग केला जात असल्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला. त्यातही शासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसाच्या विरोधात जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरीकांना उलट दमदाटी केली जात असून जप्तीची कारवाई करु असेही धमकावले जात असल्याचा आरोप यावेळी पराजंपे यांनी केला. 
दरम्यान,  शासनाचा एखादा निर्णय जनहिताच्या विरोधात असले तर त्यावेळेस जनमताचा कौल घेतला जातो. परंतु येथे असेही होतांना दिसत नाही. एकूणच हा जाचक जिझीया कर मागे घ्यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकत्र्यानी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. प्रशासनाच्या वतीने ही मागणी शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु येत्या 15 दिवसात यावर तोडगा निघाला नाही, तर मात्र रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी राष्ट्रवादीने दिला.