शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

15 दिवसात जिझिया कर मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

By admin | Updated: March 15, 2017 16:40 IST

ठाण्यातील हजारो नागरिकांना ठाणे जिल्हाधिकार्यांनी महाराष्ट्र जमीन महसुलांतर्गत लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा पाठविल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 15 - ठाण्यातील हजारो नागरिकांना  ठाणे जिल्हाधिकार्यांनी महाराष्ट्र जमीन महसुलांतर्गत लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या सर्व नोटिसा नियमबाह्य असून पंधरा दिवसात या नोटीसा मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे     आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिला. 
 राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 35 नगरसेवक  आणि कार्यकत्यानी आंदोलन करुन र जिल्हाधिकार्यांना एक निवेदन देण्यात आले.
गरिबांकडून जबरदस्तीने वसूल केला जाणारा हा जिझीया दंड कदापी भरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ सरकारी तिजोरीत खडखडाट झाला असल्यानेच शासनाकडून अशा प्रकारे सर्व सामान्य जनतेवर आसुड ओढले जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने हे आंदोलन छेडले होते. बुधवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादीच्या पाचपाखाडी भागातील कार्यालयापासून या आंदोलनाला सुरवात झाली. या आंदोलनात शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच नगरसेवक आणि रहिवाशी आणि व्यापारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलनही करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा ही लोकशाही मार्गाने कार्यरत आहे किंवा नाही?, याबाबत सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शासाकडून प्रशासकीय हुकुमशाहीचा जनतेवर प्रयोग केला जात असल्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला. त्यातही शासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसाच्या विरोधात जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरीकांना उलट दमदाटी केली जात असून जप्तीची कारवाई करु असेही धमकावले जात असल्याचा आरोप यावेळी पराजंपे यांनी केला. 
दरम्यान,  शासनाचा एखादा निर्णय जनहिताच्या विरोधात असले तर त्यावेळेस जनमताचा कौल घेतला जातो. परंतु येथे असेही होतांना दिसत नाही. एकूणच हा जाचक जिझीया कर मागे घ्यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकत्र्यानी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. प्रशासनाच्या वतीने ही मागणी शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु येत्या 15 दिवसात यावर तोडगा निघाला नाही, तर मात्र रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी राष्ट्रवादीने दिला.