शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

झेपत नसेल तर सत्ता सोडा

By admin | Updated: July 16, 2017 02:55 IST

शहरातील मुजोर रिक्षावाल्यांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. फेरीवाल्यांविरोधात मानवी साखळी नागरिकांनीच करायची. प्रदूषणाचा त्रास झाल्यास

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील मुजोर रिक्षावाल्यांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. फेरीवाल्यांविरोधात मानवी साखळी नागरिकांनीच करायची. प्रदूषणाचा त्रास झाल्यास त्यासाठीही नागरिकांनीच आवाज उठवायचा. सगळे जर नागरिकांनीच करायचे, तर मग सत्ताधाऱ्यांचा उपयोग काय? महापौर, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवकांनी काय, फक्त मोजायचे? २२ वर्षे करता काय मग? सत्ता झेपत नाही सांगा आणि सोडून द्या ना, असा टोला मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेला लगावला आहे.‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मधील ‘फेरीवाल्यांविरुद्ध आता मानवी साखळी’ या शीर्षकाखाली शनिवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल कदम यांनी घेतली. शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांना लक्ष्य करत त्यांनी वरील टोला लगावला. फेरीवाल्यांविरोधात उपोषणास्त्र शिवसेनेने काढले होते. त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकाने पत्रकार परिषद घेत फेरीवाल्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणार, असा गाजावाजा केला होता. या प्रश्नावर केडीएमसीची महासभाही तहकूब केली होती. पण, तरीही फेरीवाला प्रश्न ‘जैसे थे’ आहे. म्हणजेच, सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नाही, हे स्पष्ट झाले. प्रशासनावरील त्यांची पकड ढिली होत आहे. त्यामुळेच समस्या वाढत आहेत, अशी टीका कदम यांनी केली.मुजोर रिक्षाचालकांविरोधात कारवाई होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सत्ताधारी शिवसेना काहीच करत नसल्याने नागरिकांनीच पुढाकार घेत ‘प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटो’ असा मंच स्थापन केला. पण, सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न का मार्गी लावला नाही. त्यासाठी नागरिकांनाच का रस्त्यावर उतरायला लागत आहे, याकडे कदम यांनी लक्ष वेधले. एमआयडीसी परिसरात रासायनिक कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आहे. कंपन्या रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडत आहेत. तसेच वायूप्रदूषणामुळे श्वास गुदमरत आहे. त्यातही सत्ताधारी कमी पडत आहेत. गुन्हेगारीमध्येही सांस्कृतिक उपराजधानी आघाडीवर आहे. वरिष्ठ पोलिसांच्या बदलीसाठी प्रयत्न करणारे सत्ताधारी शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी प्रयत्न का करत नाहीत. त्यासाठीही आता नागरिकांमधूनच त्यांना अपेक्षा आहे का, असा सवाल कदम यांनी केला. अस्वच्छता, बेधुंदपणा, मनमानी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खेळण्यासाठी मैदाने नाहीत. ज्येष्ठांना विरंगुळा नाही. दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. फेरीवाला, वाहतूककोंडी, पाणीसमस्या, कचरा, खंडित होणारा वीजपुरवठा अशा सर्वच समस्या शहरात आहेत. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सत्ताधाऱ्यांनी समस्या सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा. २२ वर्षे सत्ता देऊनही सोयीसुविधा मागाव्या का लागतात, अशी टीका कदम यांनी केली. प्रदेश उपाध्यक्षांना केवळ केडीएमसीतच रसकल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे विरोधी पक्षात आहे. मात्र, त्यांचे अस्तित्वच असून नसल्यासारखे आहे. राजेश कदम हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, पण तरीही ते या महापालिकेभोवतीच लक्ष का घालतात? याचाच अर्थ त्यांचा येथील विरोधीपदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्याच पक्षात फाटाफूट, गटबाजी आहे. त्यांनी आम्हा सत्ताधाऱ्यांबाबत बोलणे म्हणजे ‘स्वत:चे ठेवावे झाकून अन्...’ असे झाल्याची टीका भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.