शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डाेक्यावर घेऊन नाचू: मनोज जरांगे पाटील

By जितेंद्र कालेकर | Updated: November 21, 2023 18:30 IST

"आम्ही शांततेतेचे आव्हान करतोय, तर आमच्यावरच गुन्हे दाखल करताय..."

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा कार्यकर्ते हे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी हा समाज आपली सर्व कामे सोडून येत आहे. आम्ही शांततेचे आवाहन करीत आहे. तरीही आमच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत. आता तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आता आम्ही घाबरणार नाही. ३२ लाख मराठयांच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे आता २४ डिसेंबरपर्यंत मराठयांना मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यायलाच हवे, अशी आग्रही मागणी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत  मंगळवारी केली.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मराठा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी जरांंगे पाटील यांची मंगळवारी दुपारी सभा पार पडली. या सभेनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. तत्पूर्वी, सभेमध्ये मराठा समाजाला मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. ठाण्यात आलाे तरी आपण काही घाबरत नाही. मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत. त्यांनी आरक्षण दिले तर समाज बांधव त्यांना डोक्यावर घेउन  नाचतील. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगळे विशेष अधिवेशन घेण्यापेक्षा योगायोगाने ७ ते २२ डिसेंबर या काळात विधानसभेचे अधिवेशन आहे. सरकारने आरक्षणाबाबतचा पहिला अहवाल स्वीकारला आहेच. आता मराठा कुणबी नोंदीचा दुसरा अहवाल स्वीकारुन २२ ते २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे. अन्यथा २५ डिसेंबरपासून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. ते आंदोलन सरकारला झेपणारे नसेल. त्याचवेळी समाजानंही एकजुट ठेवावी. मराठे हटणार नाहीत. आरक्षणाशिवाय, एक इंचही माघार घेणार नाही. जीव गेला तरी ही माघार घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराच जरांगे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला दिला. हे आंदोलन मराठयांच्या न्यायासाठी असून सरकारच्या समन्वयासाठी नाही. पद, पैसा आणि खूर्चीचा मोह आपल्याला नाही. मराठा समाजासाठी इंच भरही नियत ढळू दिली जाणार नाही. आरक्षण देऊन मराठयांच्या मुलांच्या चेहऱ्यावर  हसू आणि आनंद पहायचा आहे. त्यामुळे कोणीही गट तोडू नका, राजकारण करु नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी आपल्या समाजबांधवांना दिला.

दरम्यान, गडकरी रंगायतनच्या हिरवळीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, छगन भुजबळांचे विचार तसेच म्हणुन ते असेच वक्तव्य करीत आहेत. त्यांचा बोलवतां धनी कोणी नाही, असं वाटत होतं पण एवढं बोलून त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणजे आता शंका येते त्यांच्या पाठिशी कोणी आहे का? आम्ही कधी बोललो का ओबीसींना आरक्षण का दिले. भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणुन आम्ही त्यांना विरोध केला. आम्हाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षण पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलthaneठाणे