शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपासोबत युती केल्यास मनसेचे १५ नगरसेवक होतील विजयी?; ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 12:32 IST

ठाणे : येत्या महापालिका निवडणुकांसाठी चारचे पॅनल जाहीर झाल्यास मनसेला '' एकला चलो रे '' धोरणाचा फटका बसण्याची शक्यता ...

ठाणे : येत्या महापालिका निवडणुकांसाठी चारचे पॅनल जाहीर झाल्यास मनसेला '' एकला चलो रे '' धोरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसोबत मनसेने युती केल्यास ठाणे शहरातून किमान १५ जागा निवडून येतील, असा विश्वास मनसैनिकांनी व्यक्त केला. २०१७ ची पुनरावृत्ती टाळायची असेल तर मनसेला युती सोयीची ठरेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. मनसे-भाजप युतीबाबत मनसैनिकांची मते जाणून घेण्याकरिता मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात बैठक घेत आहेत.

कोविड काळात आंदोलने, मोर्चे यांच्या माध्यमातून मनसे हा पक्ष सतत चर्चेत राहिला. ठाणे शहरात जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे तसेच कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम तिघांनी कोविड काळात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. काही वेळा प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले. अनेकदा समस्या सोडविल्याने कोविडच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत मनसेने प्रशासनावर अंकुश ठेवला. ठाणे शहरात मनसे संघटनात्मकदृष्ट्या सक्षम असून येथे मनसेच्या मराठी भाषिकांच्या हितरक्षणाच्या भूमिकेला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.

राज्यात सत्ता असल्याने शिवसेनेला मराठीच्या किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भूमिका घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे याचा लाभ मनसे उठवू शकते. बृहन्मुंबईत भाजपचे आमदार विजयी झालेले असून तेथे भाजपला मानणारा मतदार मोठ्या संख्येने राहतो. त्या तुलनेत ठाण्यात भाजपकडे एकही आश्वासक चेहरा नाही. त्यामुळे मुंबईपेक्षा ठाण्यात भाजपला मनसेच्या संघटनेची व राज ठाकरे यांच्या करिष्म्याची जास्त गरज आहे. त्यामुळे पुढील समीकरणांच्या जुळवाजु‌ळवीकरिता उद्याची राज यांची भेट महत्त्वाची आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत २०१९ साली मनसेला काही पक्षांकडून मिळालेल्या छुप्या तर काही पक्षाच्या उघड पाठिंब्यामुळे ठाणे शहर विधानसभा मतदार संघात मनसेला चांगली मजल मारता आली. परंतु गेल्या काही दिवसात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सतत केलेल्या आंदोलनामुळे, वैयक्तिक टीकेमुळे भविष्यात पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी मनसेला प्रामुख्याने ठाणे शहर मतदारसंघात आपले स्थान टिकवायचे असेल तर भाजपशी युतीशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ही युती झाल्यास २०१७ ची पुनरावृत्ती टळेल आणि किमान १५ जागा मनसेला जिंकणे शक्य होईल.

पक्ष स्थापनेपासून असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मधल्या काळात नेतृत्वाला कंटाळून पक्षाला राम राम केला. त्यांची नाराजी वेळीच दूर केली असती तर, या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाला फायदा झाला असता असे मनसैनिकांचे मत आहे.

पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांनी वैयक्तिक संवाद साधल्यास त्यांना त्यांच्या भावना आणि अडीअडचणी जाणून घेता येईल. तसेच, पुढे काम करण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणे