शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

भाजपासोबत युती केल्यास मनसेचे १५ नगरसेवक होतील विजयी?; ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 12:32 IST

ठाणे : येत्या महापालिका निवडणुकांसाठी चारचे पॅनल जाहीर झाल्यास मनसेला '' एकला चलो रे '' धोरणाचा फटका बसण्याची शक्यता ...

ठाणे : येत्या महापालिका निवडणुकांसाठी चारचे पॅनल जाहीर झाल्यास मनसेला '' एकला चलो रे '' धोरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसोबत मनसेने युती केल्यास ठाणे शहरातून किमान १५ जागा निवडून येतील, असा विश्वास मनसैनिकांनी व्यक्त केला. २०१७ ची पुनरावृत्ती टाळायची असेल तर मनसेला युती सोयीची ठरेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. मनसे-भाजप युतीबाबत मनसैनिकांची मते जाणून घेण्याकरिता मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात बैठक घेत आहेत.

कोविड काळात आंदोलने, मोर्चे यांच्या माध्यमातून मनसे हा पक्ष सतत चर्चेत राहिला. ठाणे शहरात जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे तसेच कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम तिघांनी कोविड काळात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. काही वेळा प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले. अनेकदा समस्या सोडविल्याने कोविडच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत मनसेने प्रशासनावर अंकुश ठेवला. ठाणे शहरात मनसे संघटनात्मकदृष्ट्या सक्षम असून येथे मनसेच्या मराठी भाषिकांच्या हितरक्षणाच्या भूमिकेला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.

राज्यात सत्ता असल्याने शिवसेनेला मराठीच्या किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भूमिका घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे याचा लाभ मनसे उठवू शकते. बृहन्मुंबईत भाजपचे आमदार विजयी झालेले असून तेथे भाजपला मानणारा मतदार मोठ्या संख्येने राहतो. त्या तुलनेत ठाण्यात भाजपकडे एकही आश्वासक चेहरा नाही. त्यामुळे मुंबईपेक्षा ठाण्यात भाजपला मनसेच्या संघटनेची व राज ठाकरे यांच्या करिष्म्याची जास्त गरज आहे. त्यामुळे पुढील समीकरणांच्या जुळवाजु‌ळवीकरिता उद्याची राज यांची भेट महत्त्वाची आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत २०१९ साली मनसेला काही पक्षांकडून मिळालेल्या छुप्या तर काही पक्षाच्या उघड पाठिंब्यामुळे ठाणे शहर विधानसभा मतदार संघात मनसेला चांगली मजल मारता आली. परंतु गेल्या काही दिवसात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सतत केलेल्या आंदोलनामुळे, वैयक्तिक टीकेमुळे भविष्यात पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी मनसेला प्रामुख्याने ठाणे शहर मतदारसंघात आपले स्थान टिकवायचे असेल तर भाजपशी युतीशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ही युती झाल्यास २०१७ ची पुनरावृत्ती टळेल आणि किमान १५ जागा मनसेला जिंकणे शक्य होईल.

पक्ष स्थापनेपासून असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मधल्या काळात नेतृत्वाला कंटाळून पक्षाला राम राम केला. त्यांची नाराजी वेळीच दूर केली असती तर, या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाला फायदा झाला असता असे मनसैनिकांचे मत आहे.

पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांनी वैयक्तिक संवाद साधल्यास त्यांना त्यांच्या भावना आणि अडीअडचणी जाणून घेता येईल. तसेच, पुढे काम करण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणे