शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

तंत्रज्ञानामुळे जगणे बदलले तर गाणे ही बदलणारच - आशुतोष जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:51 IST

आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे तर गाणे ही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते. हे विधान मला पटत नाही.

ठाणे : आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे तर गाणे ही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते. हे विधान मला पटत नाही. आताच्या काळात अत्यंत सुमार ते आशयघन अशी गाणी आढळतात असे वक्तव्य लेखक आशुतोष जावडेकर यांनी ठाण्यात केले.      मॅजेस्टिक गप्पाचे शेवटचे पुष्प सोमवारी गुंफण्यात आले. सावरकर वाचनालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जावडेकर यांच्या सांगतिक गप्पांचा कार्यक्रम रंगला. सिद्धार्थ केळकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. आपल्या संगीत प्रवास उलगडताना जावडेकर म्हणाले की, मला गाण्याचे अंग उपजत होते. एकच अंग असते तर मी पं. आशुतोष जावडेकर असतो. माझ्या आत एक आशुतोष आहे, जो शब्दांचा लोभी आणि दुसरा आशुतोष आहे जो सुरांचा लोभी आहे. शब्द - स्वर हे दूरचे नातेवाईक नाहीत.  उत्तम गाण्यासाठी जगण्याचा रियाज असावा लागतो. ते अनेक गायकांना नाही. ऐकणो हा पहिला रियाज असतो, मी ऐकत खूप गेलो. चांगले रसिक घडायचे असेल तर आपल्याला वाढायला लागेल. माझी ओळख ही वन लायनर आहे. गाणे कितीही तल्लीन होऊन ऐकत असलो तरी गाणे हे माझे सर्वस्व नाही. मी एक्सप्रेशनिस्ट आहे. संगीत ही सामाजिक घटना आहे. ती शुन्यातून निर्माण होत नाही. गाणो ही ऐकण्याबरोबर बघण्याची देखील गोष्ट आहे. हे भारतीयांना न पटण्यासारखे नाही. आपण गाणे हे पाहिलेले देखील असते. दृश्य कला आणि श्रवण कला या भगिनी आहेत. संगीत हे दृश्यकलेला आव्हान देणारे असते. इनडिपेण्डंट म्युझिकची जगभर लाट आहे. हे म्युझीक मराठीत आणावे. आपल्या मराठी संगीतात होणा-या चांगल्या गोष्टी या परभाषिकांर्पयत पोहोचाव्या. संगीत रसिक म्हणून आपल्या सांगितीक कक्षा विस्ताराव्या लागतील. अभिरुचितला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. ज्यांना पाश्चात्य संगीत हे कर्णकटू वाटत असेल त्यांनी कंट्री संगीतापासून सुरूवात करावी. तुम्ही गायक असा किंवा नसा गात मात्र जा असा सल्ला त्यांनी दिला.