शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक केल्यास कारवाई

By admin | Updated: June 15, 2016 02:29 IST

शहरात नियमबाह्य, मुदत संपलेल्या तसेच भंगार रिक्षा चालणाऱ्यांविरोधात कल्याण आरटीओने जोरदार मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर आता मंगळवारपासून आरटीओने विद्यार्थ्यांची

डोंबिवली : शहरात नियमबाह्य, मुदत संपलेल्या तसेच भंगार रिक्षा चालणाऱ्यांविरोधात कल्याण आरटीओने जोरदार मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर आता मंगळवारपासून आरटीओने विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.येत्या दोन-तीन दिवसांत शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांच्या बेकायदा वाहतुकीमुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यापार्श्वभूमीवर स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅन, रिक्षा आदी गाड्यांची तपासणी केली जाणार आहे, असे कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी सांगितले.कल्याण-डोंबिवली परिसरात अधिकृतपणे ९०० हून अधिक वाहने विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. त्या शिवायही वाहने विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करतात. मात्र, त्यांची आकडेवारी मिळू शकलेली नाही. ते शोधण्याचे आव्हान आरटीओपुढे आहे. त्यासाठी अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याच्या सूचना नाईक यांनी पथकांना दिल्या आहेत. एकाच वेळी कल्याण, डोंबिवलीत ही पथके कारवाई करतील. त्यात संबंधित वाहनांत दोष आढळल्यास ती जप्त केली जातील. कागदपत्रे तपासणीत बेकायदा असल्याचे स्पष्ट झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जप्त केलेली वाहने कल्याण आरटीओ कार्यालयात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.स्कूल बसची ठिकठिकाणी पाहणी करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने बसच्या परवानग्या, नियमांचे पालन, कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्याची पूर्तता केलेली नसल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल. तसेच ज्या रिक्षांमधून वाहतूक होते, त्या रिक्षांची क्षमता, त्यांना दिलेल्या परवानग्या, कागदपत्रांची पाहणी, आसनव्यवस्था आदींची पाहणी केली जाईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)