शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल तर ते लेखन ग्रेटच :  अरुण म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 17:02 IST

मौनाची स्पंदने' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभ पार पडला.  

ठळक मुद्देप्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल तर ते लेखन ग्रेटच :  अरुण म्हात्रे मौनाची स्पंदने' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभ या संग्रह निर्मितीचे सारे श्रेय आईला : मानसी कुलकर्णी

ठाणे : कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारात लेखन करताना त्यामधले अनुभव विश्व कवितेच्या पातळीवरचे  असेल तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते. प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल तर ते लेखन ग्रेटच म्हणावे लागेल. मानसी ही खऱ्या अर्थाने भाग्यवान कारण तिला आयुष्याचा पेच नीट समजला आहे. तिला मी तिच्या पुढील लेखनप्रवासास शुभेच्छा देतो अशा भावना ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केल्या. 

         कवयित्री, लेखिका मानसी कुलकर्णी हिच्या पहिल्या 'मौनाची स्पंदने' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी अरुण म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात मानसीला शुभेच्छा देताना वरील उद्गार काढले. ते म्हणाले,  कवितेचा एक विशिष्ट प्रकारचा ग्राफ असतो. सर्वसाधारण विचार सारेच करीत असतात, मात्र त्याच्या पलीकडचा, पुढचा  विचार करणे, स्वतःमधला बदल समजून येणे, शब्दांमध्ये रमताना साक्षात्कार होणे ही सर्व जातिवंत कवीची लक्षणे होत. कविता लेखन करताना स्वतःला सूर सापडणे, नेमका शब्द सापडणे म्हणजे अवघड गोष्ट मात्र ही किमया मानसीला उत्तम साधली आहे.यावेळी अरुण म्हात्रे यांनी  संग्रहातील 'परतीच्या वाटेवर अजूनही' या ही कविता वाचून त्यातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवली. त्यापूर्वी मानसीने आपले मनोगत व्यक्त करताना या संग्रह निर्मितीचे सारे श्रेय आपल्या तिने आपल्या आईला दिले. ती म्हणते " माझी आई ही माझ्या कवितेची पहिली रसिक, वाचक आणि टीकाकार. माझ्यातील कविता शाबूत ठेवण्याचे महत्वाचे काम तिने केले आहे."  हे पुस्तक प्रकाशित करणारे व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड आपल्या प्रास्ताविकेत म्हणाले " मानसीच्या शब्दांमध्ये, विषयांमध्ये वैविध्य आहे. तरुणाईची भाषा तिला नेमकी समजली आहे."त्यावेळी व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक नेर्लेकर, संचालक निलेश गायकवाड, मानसीची आई कवयित्री आरती कुलकर्णी आणि बाबा राघव कुलकर्णी हे उपस्थित होते. या संग्रहातील मानसीच्या कवितांचे वाचन अनेक मंडळींनी उत्स्फूर्तपणे केले हे महत्वाचे. या छोटेखानी, घरगुती स्वरूपाच्या प्रकाशन समारंभास साहित्यक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होते. लेखिका, अनुवादक जयश्री देसाई, मेधा सोमण, साधना जोशी, मेघना साने, दीपा ठाणेकर, मनीषा चव्हाण, साधना ठाकूर, अंजूषा पाटील,पत्रकार प्रज्ञा सोपारकर, वृषाली शिंदे, गीतेश शिंदे, सदानंद राणे, बाळ कांदळकर, राजेश दाभोलकर, आदी मंडळी उपस्थित होती. मानसीच्या 'आकाश कवेत घेताना' हा आत्मकथन पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लवकरच आम्ही प्रकाशित करणार आहोत असे व्यासचे संचालक निलेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले. संपूर्ण कार्य्रक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कवयित्री नीता माळी यांनी केले तर आरती कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महापूर नरेश म्हस्के यांनीही मानसीला शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक