शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

... तर दिवाळीतील लाडू होणार कडू , ७ वर्षांपासूनच्या मागण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:33 IST

जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर झालेल्या नाहीत.

ठाणे : जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर झालेल्या नाहीत. यामुळे संतापलेल्या या कर्मचा-यांनी अखेर मंगळवारी सकाळपासून राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या या आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांवर सणासुदीच्या अन्नधान्यांसह साखर, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार नाही. यामुळे दिवाळीचा लाडू मात्र कडू होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.या आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील सुमारे २०० कर्मचाºयांचा समावेश असल्याचे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेचे सरचिटणीस कापडे यांनी लोकमतला सांगितले. या कामबंद आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास दिवाळी सणानिमित्त जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील सुमारे ५९३ शिधावाटप दुकानांवर सणासुदीचे अन्नधान्य, गोडे तेल, साखर, डाळी आदींचा पुरवठा अजिबात होणार नाही. परिणामी सुमारे लाखो ग्रामस्थ, आदिवासी कुटुंबिय दिवाळीत लाडू सारख्या गोडधड पदार्थापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे वर्ग तीन व वर्ग चार श्रेणीच्या कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. बेमुदत कामबंद आंदोलना दरम्यान कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. मात्र, ते कोणत्याही प्रकारचे काम करणार नाहीत. त्यांच्या या असहकारमुळे ग्रामीण कुटुंबियाना जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवणार आहे. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. तहसीलदारांच्या नियंत्रणातील पुरवठा कर्मचारी देखील या आंदोलनात आहेत.या आंदोलनापाठोपाठ १० आॅक्टोबरपासून महसूल कर्मचारी देखीलबेमुदत आंदोलन छेडणार आहेत. ऐन दिवाळीत राज्यभर होणाºया या आंदोलनादरम्यान अन्नधान्याच्या पुरवठा व शासकीय कामांना खीळ बसणार आहे.

टॅग्स :thaneठाणे