शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

कंपन्या स्थलांतरित केल्यास न्यायालयात; ‘कामा’ संघटनेने दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:48 IST

एमआयडीसीतील अग्निशमन दल अकार्यक्षम असल्याची तक्रार करणार

कल्याण : डोंबिवलीतील मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम कंपनीला लागलेल्या आगीनंतर एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, या कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असा पवित्रा कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांनी घेतला आहे.आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या वार्तालापामध्ये सोनी यांनी ही माहिती दिली. यावेळी पदाधिकारी नारायण टेकाडे, राजू बैलूर, डॉ. निखिल धूत, बाबाजी चौधरी, श्रीकांत जोशी आदी उपस्थित होते.सोनी म्हणाले, ‘मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम कंपनीत पुरेसा पाण्याचा साठा व सुरक्षिततेची पुरेशी यंत्रणा होती. त्याच जोरावर कंपनी व्यवस्थापनाने स्वत: आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे आग आवाक्याबाहेर गेल्याने ती भडकली. एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्रात अवघ्या दोन गाड्या आहेत. त्यापैकी एकच गाडी पाठविली जाते. तर, दुसरी राखीव म्हणून ठेवली जाते. एमआयडीसीतील कारखान्यांची संख्या पाहता किमान तीन गाड्या असल्या पाहिजेत. अग्निशमन दल अकार्यक्षम असल्याची तक्रार ‘कामा’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे होणाºया तिमाही बैठकीत केली जाणार आहे.’ते पुढे म्हणाले, डोंबिवलीत एकूण ५५० कारखाने आहेत. त्यामानाने एमआयडीसीकडून योग्य प्रकारे सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळेच कारखान्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांकडे होणाºया बैठकीत मांडली जाणार आहे. एमआयडीसीने व महापालिकेने कारखाना व नागरी वस्तीतील अंतर न ठेवता बांधकामास परवानगी दिली. जेथे परवानगी दिलेली नाही, तेथे बेकायदा बांधकामे झाली असून, त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. हा मुद्दाही उपस्थित करण्यात येणार आहे.’गुलाबी रस्त्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीतील कंपन्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सरकारी यंत्रणांनी ३११ कंपन्यांचे सर्वेक्षण तसेच वर्गवारी केली आहे. कारखानदारांनी ९९ वर्षांच्या लीजवर एमआयडीसीकडून जागा घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या स्थलांतराचा निर्णय घेतल्यास त्याला ‘कामा’चा विरोध असेल. तसेच त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असे सोनी यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाचा मुद्दा गाजणार आहे.कामगारांना दिला जाणार पगारमेट्रोपॉलिटन एक्झिमकेम कंपनीचे आगीत १५० कोटींचे नुकसान झाले आहे. या कंपनीला उत्पादन बंदची नोटीस दिली आहे. सुरक्षा उपाययोजना पूर्ण करूनची उत्पादन सुरू करता येणार आहे. कंपनीतील कामगारांना मालकाकडून पगार दिला जाणार आहे. तसेच ही कंपनी तीन महिन्यांत पुन्हा सुरू करण्याचा मानस कंपनीमालकाने व्यक्त केला आहे. विम्याची रक्कम मिळविण्यासाठी कंपनीला आग लावण्यात आल्याचा संशयही व्यक्त करणे चुकीचे आहे, याकडे सोनी यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :MIDCएमआयडीसी