शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

कंपन्या स्थलांतरित केल्यास न्यायालयात; ‘कामा’ संघटनेने दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:48 IST

एमआयडीसीतील अग्निशमन दल अकार्यक्षम असल्याची तक्रार करणार

कल्याण : डोंबिवलीतील मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम कंपनीला लागलेल्या आगीनंतर एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, या कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असा पवित्रा कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांनी घेतला आहे.आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या वार्तालापामध्ये सोनी यांनी ही माहिती दिली. यावेळी पदाधिकारी नारायण टेकाडे, राजू बैलूर, डॉ. निखिल धूत, बाबाजी चौधरी, श्रीकांत जोशी आदी उपस्थित होते.सोनी म्हणाले, ‘मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम कंपनीत पुरेसा पाण्याचा साठा व सुरक्षिततेची पुरेशी यंत्रणा होती. त्याच जोरावर कंपनी व्यवस्थापनाने स्वत: आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे आग आवाक्याबाहेर गेल्याने ती भडकली. एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्रात अवघ्या दोन गाड्या आहेत. त्यापैकी एकच गाडी पाठविली जाते. तर, दुसरी राखीव म्हणून ठेवली जाते. एमआयडीसीतील कारखान्यांची संख्या पाहता किमान तीन गाड्या असल्या पाहिजेत. अग्निशमन दल अकार्यक्षम असल्याची तक्रार ‘कामा’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे होणाºया तिमाही बैठकीत केली जाणार आहे.’ते पुढे म्हणाले, डोंबिवलीत एकूण ५५० कारखाने आहेत. त्यामानाने एमआयडीसीकडून योग्य प्रकारे सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळेच कारखान्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांकडे होणाºया बैठकीत मांडली जाणार आहे. एमआयडीसीने व महापालिकेने कारखाना व नागरी वस्तीतील अंतर न ठेवता बांधकामास परवानगी दिली. जेथे परवानगी दिलेली नाही, तेथे बेकायदा बांधकामे झाली असून, त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. हा मुद्दाही उपस्थित करण्यात येणार आहे.’गुलाबी रस्त्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीतील कंपन्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सरकारी यंत्रणांनी ३११ कंपन्यांचे सर्वेक्षण तसेच वर्गवारी केली आहे. कारखानदारांनी ९९ वर्षांच्या लीजवर एमआयडीसीकडून जागा घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या स्थलांतराचा निर्णय घेतल्यास त्याला ‘कामा’चा विरोध असेल. तसेच त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असे सोनी यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाचा मुद्दा गाजणार आहे.कामगारांना दिला जाणार पगारमेट्रोपॉलिटन एक्झिमकेम कंपनीचे आगीत १५० कोटींचे नुकसान झाले आहे. या कंपनीला उत्पादन बंदची नोटीस दिली आहे. सुरक्षा उपाययोजना पूर्ण करूनची उत्पादन सुरू करता येणार आहे. कंपनीतील कामगारांना मालकाकडून पगार दिला जाणार आहे. तसेच ही कंपनी तीन महिन्यांत पुन्हा सुरू करण्याचा मानस कंपनीमालकाने व्यक्त केला आहे. विम्याची रक्कम मिळविण्यासाठी कंपनीला आग लावण्यात आल्याचा संशयही व्यक्त करणे चुकीचे आहे, याकडे सोनी यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :MIDCएमआयडीसी