शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

कारवाई झाली, तरीही काम रखडणार

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

कल्याण वालधुनीपासून उल्हासनगरमार्गे अंबरनाथकडे जाणाऱ्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण उल्हासनगरमध्ये सुरू झाले असले तरी ही कारवाई पूर्ण झाल्यावरही त्याचे काम सुरू होऊ

- पंकज पाटील,  अंबरनाथकल्याण वालधुनीपासून उल्हासनगरमार्गे अंबरनाथकडे जाणाऱ्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण उल्हासनगरमध्ये सुरू झाले असले तरी ही कारवाई पूर्ण झाल्यावरही त्याचे काम सुरू होऊ शकणार नाही. कारण, त्यासाठी असलेली आर्थिक तरतूद आणि कामाची मुदत संपली आहे. त्यामुळे अतिक्रमण काढल्यावरही रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. राज्य महामार्ग क्रमांक ३५चे (नवीन ७६) चौपदरीकरण करण्यासाठी एमएमआरडीएने १०८ कोटींची तरतूद केली होती. त्यातून कल्याण वालधुनी पूल ते अंबरनाथ फॉरेस्ट नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात येणार होते. मात्र, काम सुरू झाल्यावर उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरांतून जाणाऱ्या या मार्गाला लागून असलेल्या अतिक्रमणांचा प्रश्न निर्माण झाला होता. अंबरनाथमध्ये १ हजार ७३ दुकानांचा प्रश्न तर उल्हासनगरमध्ये ८२१ अनधिकृत दुकानांचा प्रश्न होता. याप्रकरणी अंबरनाथच्या व्यापाऱ्यांनी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून रुंदीकरणाला तोंडी स्थगिती आदेश मिळवला होता. पालकमंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांनीही वादात न पडता जिथे रस्ता मोकळा होता, तिथेच कामास सुरुवात करून उल्हासनगर साईबाबा मंदिर ते अंबरनाथ मटका चौकापर्यंतच्या १०० फुटी रस्ता पूर्ण केला. मात्र, त्यानंतर फॉरेस्ट नाक्यापर्यंत केवळ तीनपदरी रस्त्याचेच काम केले. उल्हासनगरमध्ये अनेक बहुमजली व्यापारी गाळे असल्याने तिथे कारवाईला बगल दिली. राजकीय हस्तक्षेपामुळे या महामार्गाचे काम अर्थवटच झाले.