शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कारवाई झाली, तरीही काम रखडणार

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

कल्याण वालधुनीपासून उल्हासनगरमार्गे अंबरनाथकडे जाणाऱ्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण उल्हासनगरमध्ये सुरू झाले असले तरी ही कारवाई पूर्ण झाल्यावरही त्याचे काम सुरू होऊ

- पंकज पाटील,  अंबरनाथकल्याण वालधुनीपासून उल्हासनगरमार्गे अंबरनाथकडे जाणाऱ्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण उल्हासनगरमध्ये सुरू झाले असले तरी ही कारवाई पूर्ण झाल्यावरही त्याचे काम सुरू होऊ शकणार नाही. कारण, त्यासाठी असलेली आर्थिक तरतूद आणि कामाची मुदत संपली आहे. त्यामुळे अतिक्रमण काढल्यावरही रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. राज्य महामार्ग क्रमांक ३५चे (नवीन ७६) चौपदरीकरण करण्यासाठी एमएमआरडीएने १०८ कोटींची तरतूद केली होती. त्यातून कल्याण वालधुनी पूल ते अंबरनाथ फॉरेस्ट नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात येणार होते. मात्र, काम सुरू झाल्यावर उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरांतून जाणाऱ्या या मार्गाला लागून असलेल्या अतिक्रमणांचा प्रश्न निर्माण झाला होता. अंबरनाथमध्ये १ हजार ७३ दुकानांचा प्रश्न तर उल्हासनगरमध्ये ८२१ अनधिकृत दुकानांचा प्रश्न होता. याप्रकरणी अंबरनाथच्या व्यापाऱ्यांनी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून रुंदीकरणाला तोंडी स्थगिती आदेश मिळवला होता. पालकमंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांनीही वादात न पडता जिथे रस्ता मोकळा होता, तिथेच कामास सुरुवात करून उल्हासनगर साईबाबा मंदिर ते अंबरनाथ मटका चौकापर्यंतच्या १०० फुटी रस्ता पूर्ण केला. मात्र, त्यानंतर फॉरेस्ट नाक्यापर्यंत केवळ तीनपदरी रस्त्याचेच काम केले. उल्हासनगरमध्ये अनेक बहुमजली व्यापारी गाळे असल्याने तिथे कारवाईला बगल दिली. राजकीय हस्तक्षेपामुळे या महामार्गाचे काम अर्थवटच झाले.