शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

देवीच्या मूर्तींनाही बसला पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:48 IST

रंगकामास उशिरा सुरुवात : मूर्ती सुकवण्यासाठी सुरु आहे कोळशाची भट्टी आणि हॅलोजनचा वापर

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : यावर्षीच्या अतिवृष्टीचा फटका देवीच्या मूर्तींनाही बसला आहे. आधीच कमी दिवस आणि त्यात पावसाच्या तडाख्यामुळे मूर्ती सुकवण्याकरिता मूर्तिकारांची तारेवरची कसरत सुरू आहे. पावसामुळे मूर्ती सुकत नसल्याने कोळशाची भट्टी आणि हॅलोजनचा वापर करून मूर्ती सुकवल्या जात आहेत. अनेक मूर्तिकारांनी मनुष्यबळ वाढवले आहे.नवरात्रोत्सव आठवडाभरावर आला आहे. मूर्तिकारांकडे अवघे पाच-सहा दिवस आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दिवसरात्र कोसळत असलेल्या पावसाचा फटका देवीच्या मूर्तींना बसला आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले की, देवीच्या मूर्तिकामास सुरुवात होते. मूर्ती साच्यातून काढून रंगकाम केले जाते. पावसाने थैमान घातल्याने मूर्ती सुकवण्यास मूर्तिकारांना नाना शक्कल लढवायला लागल्या आहेत. त्यामुळे अर्थातच रंगकामासही उशिरा सुरुवात झाली आहे. भाविकांना मूर्ती वेळेत पूर्ण करून देण्यासाठी काही मूर्तिकारांनी कामाचे तास वाढवले आहेत, तर काहींनी नेहमीपेक्षा दुपटीने मनुष्यबळात वाढ केली आहे. कोळशाची भट्टी मूर्तीखाली ठेवून तसेच, चारही बाजूंनी हॅलोजन लावून मूर्ती सुकवल्या जात आहेत.अनेकांनी शुक्रवारपासून रंगकामास सुरुवात केली आहे. मूर्ती पूर्ण सुकल्याशिवाय रंगकाम करता येत नाही. त्यामुळे मूर्तिकारांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. गणेश विसर्जन झाले की, ऊन पडते त्यामुळे मूर्ती बाहेर ठेवल्या तरी त्या लगेच सुकतात. यंदा मात्र उलट परिस्थिती असल्याची नाराजी मूर्तिकारांनी व्यक्त केली. बेस कलर, बॉडी टोन, कपड्यांचा रंग, मग दागिने रंगविणे अशा टप्प्यांत रंगकाम केले जाते. गणेशमूर्तीपेक्षा देवीच्या मूर्ती बारकाईने रंगवल्या जातात आणि तुलनेने ते काम अवघड असते, असे पल्लवी गावकर यांनी सांगितले.रंग महागल्याने मूर्तींच्या दरांत वाढरंग आणि कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने गेल्या वर्षी १५ हजार रुपये दराने मिळणारी मूर्ती यंदा १८ ते २० हजार रुपये दराने मिळत आहे. कामगारांची मजुरी वाढली आहे. हल्ली मूर्ती बनविणारे कामगार मिळणे कठीण झाल्याने ते मागतील ती मजुरी द्यावी लागते. त्यामुळे दररोज ५०० रुपये मजुरी घेणारे कामगार हे ७०० ते १००० रुपये मागत असल्याचे गावकर यांनी सांगितले.यंदा हातात कमी दिवस असल्याने आणि पावसामुळे मूर्ती सुकण्यास खूप अडचणी येत असल्याने दरवर्षीपेक्षा यंदा कमीच प्रमाणात मूर्ती आणल्या आहेत.- अरुण बोरीटकर,मूर्तिकारपावसामुळे मूर्तीचा खर्च कमी आणि कोळशांचा खर्च जास्त आहे. मूर्ती सुकवण्यासाठी आतापर्यंत ७० किलो कोळसा लागला आहे.- पल्लवी गावकर,मूर्तिकार