शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आदर्श शिक्षक केवळ कागदावर नसावा तो विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा : प्रा. प्रविण दवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:45 IST

प्रा. प्रविण दवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यातून आजच्या शिक्षकांना कानमंत्र आणि सल्ला दिला. तसेच, नव्या पिढीचे त्यांनी कौतुक केले.

ठळक मुद्दे आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा : प्रा. प्रविण दवणेकोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळाप्रकाश पाटील यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत

ठाणे : आदर्श शिक्षक हा केवळ कागदावर नसावा तर तो विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा. आदर्शपण हे रियाजामुळे मिळत असते. परंतू हल्ली तो रियाजच हरवत चालला आहे अशी खंत ज्येष्ठ कवी प्रा. प्रविण दवणे यांनी व्यक्त केली. भारत वाचणार असेल तर तो पालक आणि तळमळीने शिकवणाऱ्या शिक्षकांमुळेच. आजची पिढी उत्तम आहे परंतू ज्यांच्या हातात ती पिढी आहे ते पालक आणि शिक्षक किती संवेदनशील आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.          कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने बुधवारी शिक्षक दिनाच्यानिमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी कोचिंग संचालकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शहनाई हॉल येथे संपन्न झाला. यावेळी विद्याश्री क्लासेसचे प्रकाश पाटील यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच, शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, सभासद सन्मान पुरस्कार, उत्कृष्ट सभासद पुरस्कार, पुरग्रस्तांना निधी देणाºया शिक्षकांना पुरग्रस्त मदतनिधी प्रशस्तीपत्रक आणि नविन सभासदांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांचे व्यक्तिमत्त्वही महत्त्वाचे अशते असा कानमंत्र देत प्रा. दवणे म्हणाले, आजची पिढी ही शिक्षकांना तपासून घेत असते. पहिल्या तीन चार ओळींतच विद्यार्थ्याला कळते की त्या शिक्षकाचा किती सखोल अभ्यास आहे. आता नव्या पिढीला चकवणे हे अशक्य आहे कारण आताची पिढई तरबेज आहे. मी माझ्या अध्यापनाच्या ३५ वर्षांत कधीही विद्यार्थ्याला गेट आऊट म्हणालो नाही कारण विद्यार्थी वर्गाबाहेर हकलला की विद्यार्थी बाहेर जातो आणि समस्या आत येते. खरा शिक्षक हा मस्टरवर नाही तर नव्या पिढीच्या डोळ््यावर सही करतो. माझ्या नावावर सव्वाशे पुस्तके आहे त्याचे मुळ मी शिक्षक आहे यात आहे. मी आॅफ तास हा कधीही आॅफ ठेवला नाही तर आॅफ तास मी आॅन ठेवला. मी केवळ शाळेत, ग्रंथालयात शिकलो नाही तर शिक्षण जगवणाºया गुरुवर्यांकडे पाहूनही शिकलो. शैक्षणिक संघटना परिपक्व झाल्या तर समाज पुढे जाईल असा सल्लाही दवणे यांनी दिला. यावेळई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. एस. पठाण उपस्थित होते. ते म्हणाले, जगात आई वडिल आणि शिक्षक हे तीन शब्द आदर्श आहे. शिक्षक हा समाज घडवित असतो. यावेळी पठाण यांनी सर उठाओ तो कोई बात बने हे गाणे सादर केले. सोहळ््या प्रसंगी संघटनेचे सतीश देशमुख, सचिव सचिन सरोदे, खजिनदार सुनिल सोनार व इतर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक