शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

आदर्श शिक्षक केवळ कागदावर नसावा तो विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा : प्रा. प्रविण दवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:45 IST

प्रा. प्रविण दवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यातून आजच्या शिक्षकांना कानमंत्र आणि सल्ला दिला. तसेच, नव्या पिढीचे त्यांनी कौतुक केले.

ठळक मुद्दे आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा : प्रा. प्रविण दवणेकोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळाप्रकाश पाटील यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत

ठाणे : आदर्श शिक्षक हा केवळ कागदावर नसावा तर तो विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा. आदर्शपण हे रियाजामुळे मिळत असते. परंतू हल्ली तो रियाजच हरवत चालला आहे अशी खंत ज्येष्ठ कवी प्रा. प्रविण दवणे यांनी व्यक्त केली. भारत वाचणार असेल तर तो पालक आणि तळमळीने शिकवणाऱ्या शिक्षकांमुळेच. आजची पिढी उत्तम आहे परंतू ज्यांच्या हातात ती पिढी आहे ते पालक आणि शिक्षक किती संवेदनशील आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.          कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने बुधवारी शिक्षक दिनाच्यानिमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी कोचिंग संचालकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शहनाई हॉल येथे संपन्न झाला. यावेळी विद्याश्री क्लासेसचे प्रकाश पाटील यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच, शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, सभासद सन्मान पुरस्कार, उत्कृष्ट सभासद पुरस्कार, पुरग्रस्तांना निधी देणाºया शिक्षकांना पुरग्रस्त मदतनिधी प्रशस्तीपत्रक आणि नविन सभासदांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांचे व्यक्तिमत्त्वही महत्त्वाचे अशते असा कानमंत्र देत प्रा. दवणे म्हणाले, आजची पिढी ही शिक्षकांना तपासून घेत असते. पहिल्या तीन चार ओळींतच विद्यार्थ्याला कळते की त्या शिक्षकाचा किती सखोल अभ्यास आहे. आता नव्या पिढीला चकवणे हे अशक्य आहे कारण आताची पिढई तरबेज आहे. मी माझ्या अध्यापनाच्या ३५ वर्षांत कधीही विद्यार्थ्याला गेट आऊट म्हणालो नाही कारण विद्यार्थी वर्गाबाहेर हकलला की विद्यार्थी बाहेर जातो आणि समस्या आत येते. खरा शिक्षक हा मस्टरवर नाही तर नव्या पिढीच्या डोळ््यावर सही करतो. माझ्या नावावर सव्वाशे पुस्तके आहे त्याचे मुळ मी शिक्षक आहे यात आहे. मी आॅफ तास हा कधीही आॅफ ठेवला नाही तर आॅफ तास मी आॅन ठेवला. मी केवळ शाळेत, ग्रंथालयात शिकलो नाही तर शिक्षण जगवणाºया गुरुवर्यांकडे पाहूनही शिकलो. शैक्षणिक संघटना परिपक्व झाल्या तर समाज पुढे जाईल असा सल्लाही दवणे यांनी दिला. यावेळई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. एस. पठाण उपस्थित होते. ते म्हणाले, जगात आई वडिल आणि शिक्षक हे तीन शब्द आदर्श आहे. शिक्षक हा समाज घडवित असतो. यावेळी पठाण यांनी सर उठाओ तो कोई बात बने हे गाणे सादर केले. सोहळ््या प्रसंगी संघटनेचे सतीश देशमुख, सचिव सचिन सरोदे, खजिनदार सुनिल सोनार व इतर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक