शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मी कोणतीही पगडी घालणार नाही- प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:54 IST

ठाण्यात रंगला नाट्यसंमेलनाध्यक्षांचा सत्कार सोहळा

ठाणे : नाट्य किंवा साहित्य संमेलनात पेशवाई पगडी घातली जाते; मात्र मी कोणतीही पगडी घालणार नाही. माझी पगडी ही माझी असेल, ती ज्ञानाची असेल. विचारांची पगडीच मी संमेलनात घालणार आहे. जे कोणी पगडी घालू इच्छितात त्यांच्यामागे त्यांची तत्त्वप्रणाली असते. प्रत्येक तत्त्वप्रणाली ही परिपूर्ण नसते, म्हणून मला कोणाचीही पगडी नको, असे स्पष्ट मत प्रसिद्ध नाटककार आणि ९९ व्या मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषद ठाणे शाखा यांच्यावतीने गज्वी यांच्या सत्काराचा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजिला होता. प्रसिद्ध समीक्षक डॉ.अनंत देशमुख यांच्या हस्ते गज्वी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर झालेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. साहित्य आणि नाटक हे दोन्ही वेगवेगळे आहेत, असे मला वाटत नाही. नाटक वाङ्मयचाच भाग आहे. नाटक लिहून दिग्दर्शकाकडे जाते, मग नाटकाचे रूपांतर संहितेत होते. नाटकाला साहित्याचा दर्जा मिळालाच पाहिजे. खरं तर आपल्याकडे होणारी वेगवेगळी नाट्य आणि साहित्य ही संमेलने एकाचवेळी घ्यायला हरकत नाही, असे गज्वी म्हणाले. तर वर्षभर मी उपक्रम राबवावे म्हणून माझी निवड केलेली नाही. संमेलनाध्यक्ष नाही तर उपक्रम राबविण्यासाठी साहित्य महामंडळ आणि नाट्य परिषद असून परिषदेने विविध उपक्रमाांसाठी आर्थिक तरतूद करावी, असे मत व्यक्त केले. मकरंद जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.‘मातोश्री’चे आज चित्र बदललेत्याकाळी आम्ही मित्रांनी केलेल्या हुंडाविरोधी चळवळीच्या बातम्या वाचून बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मातोश्रीवर बोलावून एकत्र काम करण्याचे सुचविले होते. कालांतराने शिवसेनेने हिंदुत्वावर जास्त जोर दिला आणि मग सत्तेसाठी भांडणे सुरू झाली. मी तिथे गेलो असतो तर मला हे सगळे लिहिता आले नसते. परंतु माझे तिथे न गेल्याने काही बिघडलेले नाही आणि आज मातोश्रीचे चित्र बदलले आहे अशी खंत गज्वी यांनी यावेळी बालून दाखवली.