शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मी कोणतीही पगडी घालणार नाही- प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:54 IST

ठाण्यात रंगला नाट्यसंमेलनाध्यक्षांचा सत्कार सोहळा

ठाणे : नाट्य किंवा साहित्य संमेलनात पेशवाई पगडी घातली जाते; मात्र मी कोणतीही पगडी घालणार नाही. माझी पगडी ही माझी असेल, ती ज्ञानाची असेल. विचारांची पगडीच मी संमेलनात घालणार आहे. जे कोणी पगडी घालू इच्छितात त्यांच्यामागे त्यांची तत्त्वप्रणाली असते. प्रत्येक तत्त्वप्रणाली ही परिपूर्ण नसते, म्हणून मला कोणाचीही पगडी नको, असे स्पष्ट मत प्रसिद्ध नाटककार आणि ९९ व्या मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषद ठाणे शाखा यांच्यावतीने गज्वी यांच्या सत्काराचा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजिला होता. प्रसिद्ध समीक्षक डॉ.अनंत देशमुख यांच्या हस्ते गज्वी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर झालेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. साहित्य आणि नाटक हे दोन्ही वेगवेगळे आहेत, असे मला वाटत नाही. नाटक वाङ्मयचाच भाग आहे. नाटक लिहून दिग्दर्शकाकडे जाते, मग नाटकाचे रूपांतर संहितेत होते. नाटकाला साहित्याचा दर्जा मिळालाच पाहिजे. खरं तर आपल्याकडे होणारी वेगवेगळी नाट्य आणि साहित्य ही संमेलने एकाचवेळी घ्यायला हरकत नाही, असे गज्वी म्हणाले. तर वर्षभर मी उपक्रम राबवावे म्हणून माझी निवड केलेली नाही. संमेलनाध्यक्ष नाही तर उपक्रम राबविण्यासाठी साहित्य महामंडळ आणि नाट्य परिषद असून परिषदेने विविध उपक्रमाांसाठी आर्थिक तरतूद करावी, असे मत व्यक्त केले. मकरंद जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.‘मातोश्री’चे आज चित्र बदललेत्याकाळी आम्ही मित्रांनी केलेल्या हुंडाविरोधी चळवळीच्या बातम्या वाचून बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मातोश्रीवर बोलावून एकत्र काम करण्याचे सुचविले होते. कालांतराने शिवसेनेने हिंदुत्वावर जास्त जोर दिला आणि मग सत्तेसाठी भांडणे सुरू झाली. मी तिथे गेलो असतो तर मला हे सगळे लिहिता आले नसते. परंतु माझे तिथे न गेल्याने काही बिघडलेले नाही आणि आज मातोश्रीचे चित्र बदलले आहे अशी खंत गज्वी यांनी यावेळी बालून दाखवली.