शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जि.प.चे विद्यार्थी गणवेशाविना, ८१ हजार विद्यार्थ्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 02:25 IST

जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या ८१ हजार विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या ८१ हजार विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. गणवेशासाठी मिळणाऱ्या सुमारे चार कोटी ८६ लाखांच्या शासकीय निधीसह जिल्हा परिषदेचे५० लाख असा पाच कोटी ३६ लाखांचा निधी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यांवर जमा करण्यास विरोध होत आहे. हा निधी ग्रामपंचायतींच्या शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर जमा करण्याचा घाट घातला जात आहे. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरनुसारच निधी मिळावा, यासाठी काही संघटना जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत.मागील काही वर्षांपासून ‘डीबीटी’ पद्धतीने पालकांच्या खात्यावर गणवेशाची रक्कम जमा होत आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी ही पद्धत सुरू केली. मात्र, त्यास विरोध केला जात आहे. नवीन अध्यादेशाप्रमाणे राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांच्या दोन गणवेशांसाठी ६०० रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. याआधी विद्यार्थ्यांच्या दोन गणवेशांसाठी केवळ ४०० रुपये दिले जात असत. परंतु, यंदा त्यात २०० रुपये वाढ होऊन ६०० रुपये मिळणार असल्याचे शिक्षकांना लेखी प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे.जिल्हा परिषदेच्या सुमारे ८१ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शासनाचे चार कोटी ८६ लाख व जिल्हा परिषदेचे ५० लाख असा तब्बल पाच कोटी ३६ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. या रकमेवर ग्रामपंचायतींच्या सरपंचासह शालेय व्यवस्थापन समितीचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांचा जीव कासावीस झाला आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी डीबीटीद्वारे जमा होणारी गणवेशाची रक्कम पालकांकडून घरकामासाठी खर्च होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.जिल्हा परिषदेसह शासनाकडून येणारा गणवेश निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या नावे जमा करण्याचा हट्ट ग्रामपंचायतींकडून होत आहे. या अनुसरून ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांना विचारणा केली असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. मात्र, त्यावर लवकरच तोडगा काढणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.>प्रत्येक तालुक्यात वेगळ्या रंगाचा गणवेश!यंदा जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत दिले जाणार आहे. याआधी केवळ एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांसह सर्व प्रवर्गांतील विद्यार्थिनींना मोफत गणवेशाचा लाभ मिळाला. यासाठी त्यांच्या बँक खात्यावर ४०० रुपये जमा होत असत. परंतु, यंदा ६०० रुपये विद्यार्थ्यांऐवजी पालकांच्या किंवा आईच्या बँक खात्यात जमा होतील. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, म्हणून ठाणे जिल्हा परिषदेनेदेखील अतिरिक्त सुमारे ५० लाखांची तरतूद केली आहे. यामुळे एससी, एसटी असा भेदभाव न करता सर्वच विद्यार्थ्यांना आता मोफत गणवेशाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, प्रत्येक तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग वेगवेगळा राहणार आहे. याआधी एकाच रंगाचे गणवेश होते. पण, यंदापासून प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग वेगवेगळा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग तालुकाभर एकच असणार आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या रंगातील गणवेश यंदापासून राहणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला सांगितले. मात्र, शासनाचा निधी अद्याप प्राप्त झालेला नसल्यामुळे यंदा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.