शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श! अखेर परवानगी मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:46 IST

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड लसीकरणाचे दाेन डोस पूर्ण होऊन १४ ...

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड लसीकरणाचे दाेन डोस पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रविवारपासून रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली. पण, रविवारी हा सुट्टीचा वार, त्यातच स्वातंत्र्य दिनाची धामधूम यात फारशी वर्दळ कल्याण रेल्वेस्थानकावर दिसून आली नाही. पण, दाेन डोस घेतलेल्या नागरिकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यावर शिक्का मारून देण्याचे काम केडीएमसीतर्फे आजही सुरू असल्याचे दिसून आले. कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या आणि पडताळणीअंती शिक्का मारून मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसले. यात हुश्श अखेर रेल्वे प्रवासाला परवानगी मिळाली; आता वेळ आणि खर्चही वाचणार, अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त झाली.

सरकारने लोकल प्रवाशाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत कोविड डोससाठी लसीकरण केंद्रावर गर्दी उसळणार ही बाब स्पष्ट होती. एकीकडे लसींचा खेळखंडोबा सुरू असताना दुसरीकडे नागरिकांना रेल्वेचा पास मिळणे सुकर व्हावे यासाठी केडीएमसीकडून त्यांच्या परिक्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, कोपर, टिटवाळा, आंबिवली, शहाड, ठाकुर्ली रेल्वेस्थानकांवर सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री ११ या दोन सत्रांत प्रतिनिधी नियुक्त करून दाेन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची प्रमाणपत्र तपासण्याकामी कक्ष उभारले आहेत.

११ ऑगस्टपासून सुरू झालेल्या कक्षाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. दिवसभरात ८०० ते १००० नागरिक पास मिळण्यासाठी कागदपत्रे घश्न येत असल्याचे तेथील मनपा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. रविवारी कल्याण रेल्वेस्थानकाचा आढावा घेता फारशी गर्दी सकाळच्या सत्रात दिसून आली नाही. चार ते पाच नागरिक एका वेळेला कक्षाच्या ठिकाणी रांगेत दिसून आले. दोन डोसचे प्रमाणपत्र आणि आधारकार्ड तपासूनच कर्मचाऱ्यांकडून शिक्के मारून दिले जात आहेत. ही परवानगी केवळ रेल्वे पाससाठी असून तिकिटासाठी नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात येत होते. गोंधळ अथवा वादावादी होऊ नये म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचा एक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रेल्वे फलाटांवर जागोजागी पोलिसांची गस्त दिसून आली. टीसींकडूनही प्रवाशांकडे तिकीट अथवा पास आहे का, याची तपासणी सुरू होती.

------------------------------------------------

रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाली हे खूप बरे झाले

रेल्वे पास मिळण्यासाठी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांवर शिक्कामोर्तब होताच नागरिकांची पावले लागलीच पास काढण्यासाठी तिकीट काउंटरकडे वळत होती. त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा नि:श्वास टाकल्याची भावनाही दिसत होती. संबंधित नागरिकांशी संवाद साधला असता रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाली हे खूप बरे झाले. आता वेळ आणि खर्चही वाचणार, अशी प्रतिक्रिया त्यांच्या वतीने देण्यात आली. कल्याणातील किशोर घाडगे हे कळवा येथे कामाला आहेत. जेव्हापासून कामावर जायला परवानगी मिळाली. तेव्हापासून साधारण दीड वर्षे ते कल्याण-कळवा असा दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. वाहतूककोंडी, त्यात खड्ड्यांचा त्रास यात त्यांना कंबरदुखीचा त्रासही व्हायचा, पण आता त्यांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रताप तांबे हेही दररोज कल्याण-अंबरनाथ दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने रोजचा प्रवास परवडत नव्हता. दरम्यान, आता त्यांना रेल्वे पास मिळाल्याने त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

--------------------------------------------------

आनंद मोरे फोटो