शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

उल्हासनगर महापालिकेच्या कंत्राटी कामगारांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:55 IST

तीन महिने वेतनाविना : ठेकेदाराकडे मागितला खुलासा

उल्हासनगर : महापालिका पाणीपुरवठा विभागातील तब्बल ४० ते ५० कंत्राटी कामगारांची वेतनाविना उपासमार सुरू आहे. तीन महिन्यांपासून त्यांना वेतनच न मिळाल्याने कामगारांनी आयुक्तांकडे गाºहाणे मांडले. त्यानंतर आयुक्तांनी कंत्राटदाराला नोटीस देऊ न खुलासा मागितला आहे.

उल्हासनगर महापालिकेत कामगारांची संख्या अपुरी असल्याने कंत्राटदारामार्फत शेकडो कामगार विविध विभागांत कार्यरत आहेत. मात्र शासन नियमानुसार नेमलेला कंत्राटदार कंत्राटी कामगारांना दरमहा वेतन देतो का? याची साधी चौकशीही पालिका विभागप्रमुख करीत नाही. पाणीपुरवठा विभागातील तब्बल ४० ते ५० वॉलमन आणि मजुरांना तीन महिने पगारच मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अखेर त्यांनी आक्रमक भूमिका घेत कामबंद करण्याचा इशारा दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. शहर पूर्वेला खाजगी कंत्राटदारामार्फत वॉलमन आणि मजूर पुरविले जातात. कामगारांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊ न गाºहाणे मांडल्यावर हा प्रकार उघड झाला आहे. याबाबत आयुक्तांनी कंत्राटदाराला काळ्या यादीत का टाकू नये? अशी नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे.महापालिका सुरक्षा व्यवस्थाही खाजगी कर्मचाऱ्यांच्या हाती असून ७० टक्के सुरक्षारक्षक खाजगी कंपनीचे आहेत. तसेच अग्निशमन दल, नागरी सुविधा केंद्र, वाहतूक विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आदींसह इतर विभागांत खाजगी कंत्राटदारामार्फत कर्मचारी पुरविले जात आहेत. त्यांची संख्या ६०० पेक्षा जास्त आहे,अशी माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. कंत्राटी कामगारांना शासन नियमानुसार वेतन देणे बंधनकारक आहेत. कंत्राटदार या सर्व नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे उघड झाले आहे.साप्ताहिक सुटी, भरपगारी रजा, वैद्यकीय रजा, पीएफ आदी सुविधा देत नसून त्यांचे वेतन बँकेत जमा केले जात नसल्याचेही उघड झाले आहे. अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे संकेत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिल्याने ठेकेदारांत खळबळ उडाली आहे.कारभार कंत्राटी कामगारांवरमहापालिकेत १ व २ वर्गाची ८० तर वर्ग-३ व ४ ची ४० टक्केपदे रिक्त आहेत. त्यामुळे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, करनिर्धारक, विभागप्रमुख, महापालिका सचिव, विधी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आदी महत्त्वाच्या पदाचा पदभार कनिष्ठ कर्मचाºयांना देण्याची वेळ आयुक्तांवर आली. या प्रकाराने महापालिकेत सावळागोंधळ गोंधळ उडाला असून कंत्राटी कामगारांचाही भांडाफोड झाला आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे