शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

उल्हासनगरात त्रिशंकू अवस्था

By admin | Updated: February 24, 2017 05:58 IST

महापालिकेची सत्ता प्राप्त करण्याकरिता कुख्यात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्यासोबत

उल्हासनगर : महापालिकेची सत्ता प्राप्त करण्याकरिता कुख्यात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्यासोबत आघाडी करणाऱ्या भाजपाला ३३ जागांवर मजल मारता आली असली, तरी शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आल्याने आणि साई पक्षाला ११ जागा मिळाल्याने, उल्हासनगरात त्रिशंकू अवस्था निर्माण होऊन सत्ता स्थापनेची रस्सीखेच सुुरू झाली आहे.राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक ओमी टीममध्ये सामील होऊन भाजपासोबत गेल्यानंतर, भरत गंगोत्री यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागांवर यश मिळाले. कुठल्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत नसल्याने साई पक्षाच्या हाती पुन्हा सत्तेची चावी गेली आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने ओमी कलानी यांच्यासोबत आघाडी केली, तसेच मतांचे ध्रुवीकरण करण्याकरिता सिंधी व मराठी मुद्द्यावर निवडणूक लढली गेली. प्रभाग क्र.१७ चा सर्वप्रथम निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री, सुनीता बगाडे, सतरामदास जेसवानी, पूजाकौर लबाना विजयी झाले. या निकालाने सर्वाधिक धक्का ओमी व भाजपाला बसला. प्रभाग क्र. १ शहाड गावठाण या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून एकमेव ज्योती गायकवाड या विजयी झाल्या असून, त्यांनी भाजपाचे दिग्गज राम चार्ली यांचा पराभव केला. मात्र, इतर तीन जागी भाजपाचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेने मराठा सेक्शन, संतोषनगर-महादेवनगर, संभाजी चौक-लालचक्की, चोपडा कोर्ट हे आपले बालेकिल्ले राखण्यात यश मिळवले. प्रभाग क्र. २० मधून आकाश व विकास पाटील, तर प्रभाग क्र.-३ मधून ४ पैकी भुल्लर दाम्पत्य फेरमतमोजणीत निवडून आले. प्रभाग क्र.१९ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, ऐन वेळी मीना सोंडे, विजय पाटील व किशोर वनवारी यांनी शिवबंधन तोडून काही तासांत भाजपात प्रवेश केला. या प्रकाराने सेनेला धक्का बसून वेळेअभावी शिवसेनेला चारही जागी उमेदवार उभे करता आले नाही. परिणामी, सोंडेसह चारही जण निवडून आले. भारिपच्या कविता बागुल व शिवसेनेच्या सविता दिवटे यांना समसमान मते पडली. निवडणूक अधिकारी व पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी चिठ्ठी काढून बागुल यांना विजयी घोषित केले. २०१२ च्या निवडणुकीत सुभाष टेकडीमधून बीएसपीचे दोन नगरसेवक निवडून आले होते, तर मनसेचा एक व ६ अपक्ष नगरसेवक विजयी झाले होते, तसेच काँग्रेसचे ८ नगरसेवक निवडून आले होते. मनसे, बीएसपी व अपक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला असून, काँग्रेसच्या एकमेव अंजली साळवे निवडून आल्या आहेत. प्रभाग क्र.१७ मध्येच काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीची लढत होती. त्यात राष्ट्रवादीची सरशी झाल्याने काँग्रेसच्या दिग्गज जया साधवानी, मोहन साधवानी यांचा पराभव झाला, तर भरत गंगोत्री व सतरामदास जेसवानी, सुनीता बगाडे, पूजाकौर लबाना यांचा विजय झाला आहे. दिग्गजांचा पराभव भाजपाचे राम चार्ली, आकाश चक्रवर्ती, प्रवीण कृष्णानी, काँग्रेसच्या जया साधवानी, शिवसेनेचे विनोद ठाकूर, विजय ठाकूर शिवसेनेचे बंडखोर सुभाष मनसुलकर, माजी महापौर आशा इदनानी, राष्ट्रवादीचे गटनेते व ओमी टीमचे प्रमुख सदस्य मनोज लासी, माजी महापौर मालती करोतिया, विद्या निर्मले, यशस्वी निर्मले यांचा पराभव झाला, तर साई पक्षाच्या अजित गुप्ता या नवख्या उमेदवाराने मनोज लासी यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले.घराणेशाहीचा विजय शिवसेनेतील घराणेशाहीने दणदणीत विजय मिळवला आहे. प्रभाग क्र. ३ मधून राजेंद्रसिंग भुल्लर, चरणजित कौर भुल्लर, प्रभाग क्र. १० राजेंद्र चौधरी, राजश्री चौधरी, प्रभाग क्र,-१५ मधून धनंजय बोडारे, बसुधा बोडारे अशी तीन दाम्पत्ये निवडून आली. धनंजय बोडारे यांच्या वहिनी शीतल बोडारे याही प्रभाग क्र-१५ मधून विजयी झाल्या आहेत, तर प्रभाग क्र.२० मधून आकाश व विकास पाटील हे सख्खे भाऊ, तसेच प्रभाग क्र.१० व ४ मधून पुष्पा बागुल व स्वप्निल बागुल हे मायलेक निवडून आले. स्वप्निल बागुल अवघे २२ वर्षांचे आहेत. दिव्यात भाजपा, मनसेला फटका दिव्यातील लोकवस्ती गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढल्याने तेथील वॉर्डांची संख्या दोनवरून वाढून ११ झाली होती. दिव्यातील मतदारांनी मनसे व भाजपाला नाकारले. तेथे शिवसेनेला ८, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळाल्या.पंचम कलानी विजयी पंचम कलानी प्रभाग क्र.२ मधून विजयी झाल्या. त्यांच्या वॉर्डात ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. भाजपाचे जमनुदास पुरस्वानी, हरेश जग्यासी, मीना कौर लबाना हे विजयी झाले.