शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

रस्ता रुंदीकरणात आता शेकडो झाडांवर कुऱ्हाड?

By admin | Updated: February 5, 2016 02:41 IST

शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणाच्या आड येणारी झाडे, विजेचे खांब, रोहित्र हटविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून न्यायालयीन स्थगिती मिळविलेल्या

सदानंद नाईक,  उल्हासनगरशहरातील कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणाच्या आड येणारी झाडे, विजेचे खांब, रोहित्र हटविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून न्यायालयीन स्थगिती मिळविलेल्या १७ दुकानांची सुनावणी सुरू आहे. त्यानंतर शहरात व्यापक कारवाईचे संकेत उपायुक्त नितिन कापडणीस यांनी दिले. पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी गेली ३ वर्षे रखडलेल्या अंबरनाथ-कल्याण रस्त्याचे रूंदीकरण सुरू केले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात सुरु असलेल्या या कारवाईला व्यापारी व राजकीय नेते यांनी विरोध केलेला नाही. रस्ता रुंदीकरणाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून झाडे, विजेचे खांब व रोहित्र हटवून उर्वरित रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे. रूंदीकरणामुळे रस्त्यालगत असणारे पिंपळ, अशोका, आंबा व इतर जातीच्या एकूण ६३ झाडांचा बळी जाणार असल्याचे पालिका सांगत असली तरी प्रत्यक्षात शेकडो झाडांचा बळी जाणार असल्याचे स्थानिक सांगतात. झाडे हटवण्याबाबतचा अहवाल वृक्ष समिती व बांधकाम विभागाला देवून त्यांचा अभिप्राय घेणार असल्याचे सहा. अधिकारी भगवान कुमावत यांनी सांगितले.