शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

उल्हासनगरमध्ये नदीच्या पुराचे पाणी शेकडो घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शनिवार रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. परिणामी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शनिवार रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. परिणामी नदीच्या पुराचे पाणी शेकडो घरात घुसले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिका अनेक कुटुंबांना शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणी हलवीत असल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. तर शहरातील अनेक सखल भागातही पाणी साचल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे.

रविवारी रात्री कॅम्प नं-४ भारतनगरमधील अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू खराब झाल्या. अग्निशमन दलाने पाणी निचऱ्याची व्यवस्था करून नागरिकांना मदत केली. सोमवारी दुपारनंतर कॅम्प नं-३ येथील शांतीनगर परिसरातील गाऊबाई नगरातील अनेकांच्या घरात वालधुनी नदीच्या पुराचे पाणी घुसले असून त्यांच्या राहण्यासाठी महापालिका पर्यायी व्यवस्था करीत आहे. तसेच पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना जेवणासह इतर सुविधा पुरविण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

उल्हास नदीने धोक्याची पातळी गाठल्याने, शहाड गावठण, म्हारळ गाव रस्त्याकडील रिजेन्सी, ठारवाणी गृहसंकुलासह म्हारळ गाव, नाका, चौकासह शहरातील सखल भागात नदीच्या पुराचे पाणी घुसल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच उल्हासनगर ते मुरबाड रस्त्यावर नदीच्या पुराचे पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. नदी किनाऱ्यावरील म्हारळ, वरप, कांबा गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासनासह शासनाने केले आहे. शहरातील मयूरी हॉटेल, गोल मैदान, महापालिकेकडे जाणाऱ्या स्टेट बँकसमोरील रस्ता अशा अनेक भागात पाणी साचून शहराला तलावाचे स्वरूप आले होते. उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी पुलावरून रविवारपासून पुराचे पाणी जात असून पुलावरून वाहतूक बंद केली आहे.

------------

महापुराच्या आठवणी जागविल्या

२००६ साली आलेल्या महापुराचा वालधुनी व उल्हास नदीकिनाऱ्यावरील शेकडो नागरिकांना फटका बसून अनेकांचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसासून संततधार पाऊस सुरू असल्याने, महापुराच्या भीतीने अंगावर शहारे उभे राहिले. मात्र महापालिकेने सर्व उपाययोजना केली असून आपत्कालीन पथके तैनात केली असल्याची आम्ही उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

--------------------