शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

उल्हासनगरमध्ये नदीच्या पुराचे पाणी शेकडो घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शनिवार रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. परिणामी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शनिवार रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. परिणामी नदीच्या पुराचे पाणी शेकडो घरात घुसले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिका अनेक कुटुंबांना शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणी हलवीत असल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. तर शहरातील अनेक सखल भागातही पाणी साचल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे.

रविवारी रात्री कॅम्प नं-४ भारतनगरमधील अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू खराब झाल्या. अग्निशमन दलाने पाणी निचऱ्याची व्यवस्था करून नागरिकांना मदत केली. सोमवारी दुपारनंतर कॅम्प नं-३ येथील शांतीनगर परिसरातील गाऊबाई नगरातील अनेकांच्या घरात वालधुनी नदीच्या पुराचे पाणी घुसले असून त्यांच्या राहण्यासाठी महापालिका पर्यायी व्यवस्था करीत आहे. तसेच पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना जेवणासह इतर सुविधा पुरविण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

उल्हास नदीने धोक्याची पातळी गाठल्याने, शहाड गावठण, म्हारळ गाव रस्त्याकडील रिजेन्सी, ठारवाणी गृहसंकुलासह म्हारळ गाव, नाका, चौकासह शहरातील सखल भागात नदीच्या पुराचे पाणी घुसल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच उल्हासनगर ते मुरबाड रस्त्यावर नदीच्या पुराचे पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. नदी किनाऱ्यावरील म्हारळ, वरप, कांबा गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासनासह शासनाने केले आहे. शहरातील मयूरी हॉटेल, गोल मैदान, महापालिकेकडे जाणाऱ्या स्टेट बँकसमोरील रस्ता अशा अनेक भागात पाणी साचून शहराला तलावाचे स्वरूप आले होते. उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी पुलावरून रविवारपासून पुराचे पाणी जात असून पुलावरून वाहतूक बंद केली आहे.

------------

महापुराच्या आठवणी जागविल्या

२००६ साली आलेल्या महापुराचा वालधुनी व उल्हास नदीकिनाऱ्यावरील शेकडो नागरिकांना फटका बसून अनेकांचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसासून संततधार पाऊस सुरू असल्याने, महापुराच्या भीतीने अंगावर शहारे उभे राहिले. मात्र महापालिकेने सर्व उपाययोजना केली असून आपत्कालीन पथके तैनात केली असल्याची आम्ही उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

--------------------