शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

उल्हासनगरमधील बेघरांना माणुसकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:28 IST

मानवता ग्रुपची सामाजिक बांधीलकी : एकाकी जगणाऱ्यांना तरुणांचा मदतीचा हात

उल्हासनगर : शहरातील फुटपाथ, रस्ते, चौक, रेल्वेस्टेशन, बसस्टॉप आदी ठिकाणी एकाकी आयुष्य व्यतीत करणाºया व्यक्तींना, रुग्णांना मानवता ग्रुपचा आधार मिळत आहे. या ग्रुपतर्फे रक्तदान शिबिरे घेऊन सरकारी रुग्णालये आणि रक्तपेढींना रक्त दिले जात असून त्याचा गरजूंना फायदा होत आहे. सामाजिक जाणीव आणि बांधीलकीतून उच्चशिक्षित तरुण हे सामाजिक कार्य करत आहेत.उल्हासनगरमधील निलेश बच्छाव, साई जाधव, कुशल नेहते, मयूर कदम आदी तरुणांनी एकत्र येत मानवता ग्रुप तयार केला आहे.विविध व्याधीग्रस्त नागरिकांची आरोग्यतपासणी तसेच त्यांना अंघोळ घालून स्वच्छ करून नवे कपडे दिले जातात. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचारानंतर त्यांना नातेवाइकांच्या स्वाधीन केले जाते. मात्र, माहिती न मिळाल्यास त्यांची महापालिकेच्या बेघर केंद्रांत व्यवस्था केली जाते. बेघर केंद्र चालविणारे सत्यवान जगताप यांची यात मदत होत असून राहणे, खाणे आणि आरोग्याची काळजी घेतली असल्याने निराधार व्यक्तींना आधार मिळत असल्याचे निलेश बच्छाव यांनी सांगितले.गरीब आणि गरजू नागरिकांना अनेकदा रक्ताची गरज लागते. रक्तांसाठी त्यांची भटकंती होऊ नये म्हणून ग्रुपचे सदस्य रक्तदान शिबिर घेऊ न शासकीय रुग्णालय व रक्तपेढ्यांंना रक्त देतात. यातून गरीब व गरजू नागरिकांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. शहरात विविध कार्यक्रमांत अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून ग्रुपच्या सदस्य हॉटेल, मंगल कार्यालय, खाजगी कार्यक्रम आदी ठिकाणी शिल्लक अन्न जमा करून रात्री अर्धपोटींना ते दररोज दिले जात असल्याचे या तरुणांनी सांगितले.मानवता ग्रुपचे तरुण उच्चशिक्षितमानवता ग्रुप तयार करून गोरगरिबांची सेवा करणाºया ग्रुपचे सदस्य तरुण व उच्चशिक्षित आहेत. प्रत्येक जण नोकरी व व्यवसाय सांभाळून हे काम करीत आहेत. मानवता गु्रपसोबत असंख्य जण जोडले असून ते मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.