शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

उल्हासनगरमधील बेघरांना माणुसकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:28 IST

मानवता ग्रुपची सामाजिक बांधीलकी : एकाकी जगणाऱ्यांना तरुणांचा मदतीचा हात

उल्हासनगर : शहरातील फुटपाथ, रस्ते, चौक, रेल्वेस्टेशन, बसस्टॉप आदी ठिकाणी एकाकी आयुष्य व्यतीत करणाºया व्यक्तींना, रुग्णांना मानवता ग्रुपचा आधार मिळत आहे. या ग्रुपतर्फे रक्तदान शिबिरे घेऊन सरकारी रुग्णालये आणि रक्तपेढींना रक्त दिले जात असून त्याचा गरजूंना फायदा होत आहे. सामाजिक जाणीव आणि बांधीलकीतून उच्चशिक्षित तरुण हे सामाजिक कार्य करत आहेत.उल्हासनगरमधील निलेश बच्छाव, साई जाधव, कुशल नेहते, मयूर कदम आदी तरुणांनी एकत्र येत मानवता ग्रुप तयार केला आहे.विविध व्याधीग्रस्त नागरिकांची आरोग्यतपासणी तसेच त्यांना अंघोळ घालून स्वच्छ करून नवे कपडे दिले जातात. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचारानंतर त्यांना नातेवाइकांच्या स्वाधीन केले जाते. मात्र, माहिती न मिळाल्यास त्यांची महापालिकेच्या बेघर केंद्रांत व्यवस्था केली जाते. बेघर केंद्र चालविणारे सत्यवान जगताप यांची यात मदत होत असून राहणे, खाणे आणि आरोग्याची काळजी घेतली असल्याने निराधार व्यक्तींना आधार मिळत असल्याचे निलेश बच्छाव यांनी सांगितले.गरीब आणि गरजू नागरिकांना अनेकदा रक्ताची गरज लागते. रक्तांसाठी त्यांची भटकंती होऊ नये म्हणून ग्रुपचे सदस्य रक्तदान शिबिर घेऊ न शासकीय रुग्णालय व रक्तपेढ्यांंना रक्त देतात. यातून गरीब व गरजू नागरिकांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. शहरात विविध कार्यक्रमांत अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून ग्रुपच्या सदस्य हॉटेल, मंगल कार्यालय, खाजगी कार्यक्रम आदी ठिकाणी शिल्लक अन्न जमा करून रात्री अर्धपोटींना ते दररोज दिले जात असल्याचे या तरुणांनी सांगितले.मानवता ग्रुपचे तरुण उच्चशिक्षितमानवता ग्रुप तयार करून गोरगरिबांची सेवा करणाºया ग्रुपचे सदस्य तरुण व उच्चशिक्षित आहेत. प्रत्येक जण नोकरी व व्यवसाय सांभाळून हे काम करीत आहेत. मानवता गु्रपसोबत असंख्य जण जोडले असून ते मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.