शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

प्रदूषणविरहित पर्यावरणात मानवाचा विकास - अभय ओक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 3:11 AM

पर्यावरणाच्या विकासाशिवाय माणसाचा विकास होणे अशक्य आहे. प्रदूषणविरहित पर्यावरण करू, तेव्हा मानवाचा विकास होईल. विकासात्मक कामे म्हणजेच विकास असे नाही

ठाणे : पर्यावरणाच्या विकासाशिवाय माणसाचा विकास होणे अशक्य आहे. प्रदूषणविरहित पर्यावरण करू, तेव्हा मानवाचा विकास होईल. विकासात्मक कामे म्हणजेच विकास असे नाही, तर पर्यावरणाचा विकास हादेखील विकास आहे, असे मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.पर्यावरण दक्षता मंडळाचा एकोणिसावा वर्धापन दिन रविवारी सहयोग मंदिर येथे पार पडला. ओक म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयावर टीका करण्याचा अधिकार सर्व नागरिकांना आहे; पण टीका करताना तो निर्णय का अयोग्य आहे, हे त्यांनी सांगावे. पर्यावरणासंबंधी आदेश दिले की, विकासाला खीळ लागते, अशी टीका न्यायाधीशांवर होते. मला प्रदूषणमुक्त जगायचे आहे, हा प्रदूषणाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु, दुर्दैवाने फार थोड्या नागरिकांना या अधिकाराची जाणीव आहे. फार थोडे नागरिक पर्यावरणासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. एखादा आदेश कायद्यात बसत नसेल, पण तो सार्वजनिक हितासाठी असेल, तर तसा आदेश सर्वोच्च न्यायालय देऊ शकते. प्रदूषणाबाबत असे अनेक आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची समाजात मात्र उपेक्षा केली जाते. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणविषयक कायद्यांवर संशोधन व्हावे आणि त्याचे शिक्षण जनसामान्यापर्यंत पोहोचावे, म्हणून संशोधन केंद्रे उभारली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट सेंटर संस्थापक व संचालक डॉ. प्रसाद मोडक यांनी जनसामान्यांच्या माध्यमातून पर्यावरण विकास याविषयी मार्गदर्शन केले तसेच पर्यावरणीय शिक्षण संस्थेचे महत्त्व सांगितले. डॉ. प्रसाद कर्णिक यांनी प्लास्टिक रिसायकलिंगची माहिती देताना प्लास्टिकचा वापर केला पाहिजे; पण तो सयुक्तिक आणि विवेकी असावा, असे सांगितले. यावेळी त्यांनी मुरबाडमध्ये सुरू असलेल्या संतुलन प्रक्रियेची माहिती दिली. कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम, उपाध्यक्ष डॉ. विकास हजीरनीस उपस्थित होते. टिटवाळा येथील ‘रुंदे’ या गावी सुरू असलेल्या ‘देवराई’ प्रकल्पाची माहिती संगीता जोशी यांनी दिली. विद्याधर वालावलकर यांनी प्रास्ताविक केले. ‘आपलं पर्यावरण’ प्रकाशित झालेल्या मासिकाबाबत डॉ. संजय जोशी यांनी माहिती दिली. रूपाली शाईवाले यांनी मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली. 

टॅग्स :thaneठाणे