शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्येच जुंपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:13 IST

केडीएमसीच्या कारवाईअभावी डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना दुसरीकडे जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्ये हाणामारीच्या घटना सर्रास घडत आहेत.

डोंबिवली : केडीएमसीच्या कारवाईअभावी डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना दुसरीकडे जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्ये हाणामारीच्या घटना सर्रास घडत आहेत. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास येथील इंदिरा चौकात फेरीवाल्यांमध्ये जुंपल्याचे पाहावयास मिळाले. या हाणामारीमध्ये पुरुषांसह एका महिलेचाही समावेश होता.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वेस्थानक परिसरातील १५० मीटरपर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई आहे. परंतु, डोंबिवली पूर्वेतील स्थानक परिसर याला अपवाद ठरला आहे. केडीएमसीच्या कुचकामी ठरलेल्या फेरीवालाविरोधी पथकामुळे मनाई क्षेत्रात बिनदिक्कतपणे फेरीवाल्यांकडून व्यवसाय थाटले जात आहेत. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे या फेरीवाल्यांना पुरते अभय मिळाले आहे. त्यात शहराबाहेरच्या गुंडांच्या आश्रयाने व्यवसाय जोमात सुरू असताना फेरीवाल्यांमध्ये हाणामारीचे प्रसंग सातत्याने घडत आहेत. याआधी पूर्वेकडील स्थानकालगतच्या गल्ल्यांमध्ये फेरीवाल्यांमध्ये आपापसात प्राणघातक हल्लेही झाले आहेत. रामनगर पोलिसांनी या घटना गांभीर्याने घेतल्या नसल्याने हाणामारीचे प्रसंग सुरूच असल्याचे सोमवारी पुन्हा दिसून आले. दुपारी ४ च्या सुमारास जागा मिळवण्यावरून तिघांमध्ये जोरदार मारामारी झाली. यात एक महिलाही होती.महासभेत वेळोवेळी अशा गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांबाबत चर्चा होऊन वाढत्या अतिक्रमणाबाबत ठोस कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. कर्तव्यात कसूर करणाºयांचे निलंबन करा, असे ठरावही मंजूर झाले आहेत. पण, परिस्थितीत फरक पडलेला नाही.आयुक्त दखलघेणार का?आयुक्त गोविंद बोडके यांनी २५ एप्रिलला डोंबिवली शहराचा दौरा केला होता. त्यावेळी स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना व्यवसाय न करण्याचे ‘फर्मान’ काढण्यात आले होते. परंतु, आयुक्तांची मोटार डोंबिवलीहून कल्याणकडे रवाना होताच फेरीवाले पुन्हा दाखल झाल्याचे दिसले होते. डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत हालचाली प्रशासनाने सुरू केल्या असल्या तरी सध्या सुरू असलेल्या अतिक्रमणाची आयुक्त बोडके गांभीर्याने दखल घेतील का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.