शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

बारावीची परीक्षा मंगळवारपासून; जिल्ह्यातून ९६ हजार १८१ विद्यार्थी

By admin | Updated: February 25, 2017 03:04 IST

ठाणे, पालघर जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ८२६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. २८ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहे.

ठाणे : ठाणे, पालघर जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ८२६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. २८ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहे. तत्पूर्वी ठिकठिकाणी सुमारे १७ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारीला संपणार आहेत.या प्रात्यक्षिक परीक्षा ठाणे जिल्ह्यातील १४८ केंद्रांवर तर पालघर जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर घेण्यात आल्या. यासाठी प्रत्येकी एक केंद्र संचालक व परीक्षकांच्या नियंत्रणात या दोन्ही जिल्ह्यात प्रात्यक्षिक पार पडले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी १२ वीची परीक्षा २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे या परीक्षेसाठी कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी या शाखांचे एक लाख ३३ हजार ८२६ परीक्षार्थी या दोन्ही जिल्ह्यातील आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यामधील ९६ हजार १८१ विद्यार्थी आहेत. यामध्ये कला शाखेचे १६ हजार ५९२, विज्ञानचे २९ हजार ४५०, वाणिज्यचे ४९ हजार ०५७ आणि एक हजार ८२ विद्यार्थी एमसीव्हीसी शाखेचे आहेत. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यामधील १६ हजार ६७९ वाणिज्य शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत, कलेचे दहा हजार ९३७, विज्ञानचे नऊ हजार ४८५ आणि एमसीव्हीच्या केवळ ५४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)