शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कसे भेदायचे?

By संदीप प्रधान | Updated: March 13, 2023 09:17 IST

ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत. ही बांधकामे स्थानिक माफिया कम राजकीय नेत्यांनी उभी केलेली आहेत. ती पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र ती पाडण्यास त्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांबरोबरच ती उभी करणाऱ्या राजकीय माफिया नेत्यांचा विरोध आहे. गेल्या काही दिवसांत अनधिकृत बांधकामांमधील नोकरशाहीचे हितसंबंध यावर प्रकाश पडला. अनधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर या संदर्भात गंभीर आरोप झालेले आहेत.

मुंबईतील गिरण्यांच्या जमिनी निवासी व व्यापारी वापराकरिता खुल्या झाल्यावर बांधकाम क्षेत्रात बूम आला. जागांचे दर गगनाला भिडले. मुंबईत मोठ्या संख्येने बांधकामे सुरू झाली. जुन्या चाळी, भाड्याच्या इमारती यांमध्ये वास्तव्य करणारा मराठी मध्यमवर्ग आर्थिक गरजांमुळे व कुटुंब वाढल्याने ठाणे जिल्ह्यातील शहरांकडे सरकला. नेमका याच संधीचा गैरफायदा ठाणे जिल्ह्यातील जमीनमालक, स्थानिक माफिया (जे पुढे बरेचसे राजकारणात आले) व नोकरशहा यांनी घेतला. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. ठाण्यात शिवसेनेने बस्तान बसवले होते; तर डोंबिवली-कल्याण व आजूबाजूच्या परिसरात जनसंघाचे वर्चस्व होते. आदिवासी पट्ट्यात वनवासी कल्याण आश्रमाचे काम आहे. त्यामुळे कदाचित येथे आपले फारसे मतदार नाहीत, या आकसापोटी असेल; पण काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचा विकास हा भूमाफिया व भ्रष्ट नोकरशहा यांच्या हाती सोपवून दिला. त्यातून मग येणाऱ्या लोंढ्यांकरिता मिळेल तिथे, मिळेल तशा इमारती उभ्या केल्या गेल्या. मुंबईतून जागा विकून आलेल्यांकडे चार पैसे असल्याने त्यांनी मागेपुढे न पाहता घरे घेतली. कालांतराने आपण राहत असलेल्या इमारती बेकायदा असल्याचा साक्षात्कार अनेकांना झाला. अनधिकृत बांधकामांची प्रकरणे न्यायालयात गेली. वेळोवेळी कारवाईचे आदेश झाले. मामुली कारवाई झाली; पण पुढे काहीच झाले नाही.  यामुळे ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर अशा शहरांत असंख्य बांधकामे उभी आहेत.

नाेकरशाही बाबाजींची बटीक

- मुंब्र्यातील अनधिकृत बांधकामांवरून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड व अनधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त आहेर यांच्यात महापालिका निवडणुकांच्या तोंडावर संघर्षाला तोंड फुटले. तत्पूर्वी ठाणे महापालिकेबाहेर लागलेला फलक हाही त्याच संघर्षाचा परिपाक होता. 

- नव्वदच्या दशकात जे. जे. हत्याकांडात सहभाग असलेल्या व उल्हासनगरातील एका वादग्रस्त रिसॉर्टमध्ये त्या हत्याकांडानंतर आसरा घेतलेल्या सुभाषसिंह ठाकूर (बाबाजी) याच्या नावाने धमकावण्याचे प्रकरण धक्कादायक आहे. याची चौकशी झाल्याचे दिसत नाही. 

- तुरुंगात असूनही हा बाबाजी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा रिमोट कंट्रोल हातात राखून आहे, हेच स्पष्ट होते. त्यावेळी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा तापला होता. राजकारण्यांबरोबर आता नोकरशाहीदेखील बाबाजींची बटीक झाली आहे. जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कुणाला थांबवायचे नाही, हेच वास्तव आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे