शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कसे भेदायचे?

By संदीप प्रधान | Updated: March 13, 2023 09:17 IST

ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत. ही बांधकामे स्थानिक माफिया कम राजकीय नेत्यांनी उभी केलेली आहेत. ती पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र ती पाडण्यास त्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांबरोबरच ती उभी करणाऱ्या राजकीय माफिया नेत्यांचा विरोध आहे. गेल्या काही दिवसांत अनधिकृत बांधकामांमधील नोकरशाहीचे हितसंबंध यावर प्रकाश पडला. अनधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर या संदर्भात गंभीर आरोप झालेले आहेत.

मुंबईतील गिरण्यांच्या जमिनी निवासी व व्यापारी वापराकरिता खुल्या झाल्यावर बांधकाम क्षेत्रात बूम आला. जागांचे दर गगनाला भिडले. मुंबईत मोठ्या संख्येने बांधकामे सुरू झाली. जुन्या चाळी, भाड्याच्या इमारती यांमध्ये वास्तव्य करणारा मराठी मध्यमवर्ग आर्थिक गरजांमुळे व कुटुंब वाढल्याने ठाणे जिल्ह्यातील शहरांकडे सरकला. नेमका याच संधीचा गैरफायदा ठाणे जिल्ह्यातील जमीनमालक, स्थानिक माफिया (जे पुढे बरेचसे राजकारणात आले) व नोकरशहा यांनी घेतला. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. ठाण्यात शिवसेनेने बस्तान बसवले होते; तर डोंबिवली-कल्याण व आजूबाजूच्या परिसरात जनसंघाचे वर्चस्व होते. आदिवासी पट्ट्यात वनवासी कल्याण आश्रमाचे काम आहे. त्यामुळे कदाचित येथे आपले फारसे मतदार नाहीत, या आकसापोटी असेल; पण काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचा विकास हा भूमाफिया व भ्रष्ट नोकरशहा यांच्या हाती सोपवून दिला. त्यातून मग येणाऱ्या लोंढ्यांकरिता मिळेल तिथे, मिळेल तशा इमारती उभ्या केल्या गेल्या. मुंबईतून जागा विकून आलेल्यांकडे चार पैसे असल्याने त्यांनी मागेपुढे न पाहता घरे घेतली. कालांतराने आपण राहत असलेल्या इमारती बेकायदा असल्याचा साक्षात्कार अनेकांना झाला. अनधिकृत बांधकामांची प्रकरणे न्यायालयात गेली. वेळोवेळी कारवाईचे आदेश झाले. मामुली कारवाई झाली; पण पुढे काहीच झाले नाही.  यामुळे ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर अशा शहरांत असंख्य बांधकामे उभी आहेत.

नाेकरशाही बाबाजींची बटीक

- मुंब्र्यातील अनधिकृत बांधकामांवरून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड व अनधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त आहेर यांच्यात महापालिका निवडणुकांच्या तोंडावर संघर्षाला तोंड फुटले. तत्पूर्वी ठाणे महापालिकेबाहेर लागलेला फलक हाही त्याच संघर्षाचा परिपाक होता. 

- नव्वदच्या दशकात जे. जे. हत्याकांडात सहभाग असलेल्या व उल्हासनगरातील एका वादग्रस्त रिसॉर्टमध्ये त्या हत्याकांडानंतर आसरा घेतलेल्या सुभाषसिंह ठाकूर (बाबाजी) याच्या नावाने धमकावण्याचे प्रकरण धक्कादायक आहे. याची चौकशी झाल्याचे दिसत नाही. 

- तुरुंगात असूनही हा बाबाजी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा रिमोट कंट्रोल हातात राखून आहे, हेच स्पष्ट होते. त्यावेळी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा तापला होता. राजकारण्यांबरोबर आता नोकरशाहीदेखील बाबाजींची बटीक झाली आहे. जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कुणाला थांबवायचे नाही, हेच वास्तव आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे