शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
4
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
5
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
6
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
7
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
8
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
9
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
10
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले
11
हॉटेलचा बेड पाहूनच ग्राहकाची झोप उडाली! असं काय पाहिलं की, मालकाला १ लाखांचा दंड द्यावा लागला? 
12
Diwali Special Recipe: गॅसचा वापर न करता, घरच्या साहित्यात करा हलवाईसारखी रुचकर मिठाई
13
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
14
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
15
Happy Diwali 2025 Wishes: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
16
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
17
परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग
18
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
19
Diwali 2025: या दिवाळीत स्वतःला द्या एक छोटासा ब्रेक; तुमचे टॅरो कार्ड काय सांगते पहा!
20
भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले

कर्मचाऱ्यांना टिकवायचे कसे आणि आम्हीही जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा सवाल धीरज परब लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान अजून भरून निघालेले ...

मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा सवाल

धीरज परब

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान अजून भरून निघालेले नाही. व्यवसाय आता कुठे कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच परत लॉकडाऊन होणार असेल, तर कर्मचाऱ्यांना टिकवणे ही तर नंतरची गोष्ट, पण जिकडे आम्हीच तग धरू शकणार नाही, त्याचे काय, असा सवाल मीरा-भाईंदरमधील अनेक व्यापाऱ्यांनी केला आहे. मीरा-भाईंदरमधील एकूणच दुकानदार व विविध व्यापाऱ्यांच्या व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आढावा घेतला असता अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. शहरात मोठ्या संख्येने दुकानदार, हॉटेल व अन्य व्यावसायिक हे भाड्याच्या जागेत आपला व्यवसाय करत आहेत. शहरातील भाडीही भरमसाट आहेत.

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात भाड्यामुळे अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले. तर, काहींनी कसाबसा तग धरला. कारण, बहुसंख्य मालकांनी भाडे अजिबात कमी केले नाही. काहींनी मात्र कमी केले तर काहींनी एखाद्या महिन्याचे भाडे माफही केले. मागील वर्षीच्या लॉकडाऊनकाळातच पगार देणे परवडत नसल्याने बहुसंख्य कर्मचारीवर्ग कमी करण्यात आला. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर हळूहळू व्यवसाय पूर्वपदावर येईल, या आशेने व्यापारीवर्ग होता. पदरमोड करून काहींनी दुकानाचे भाडे भरले व कर्मचारीही टिकवले. परंतु, व्यवसाय हळूहळू का होईना पुन्हा उभा करू, अशी आशा व जिद्द बाळगून व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू ठेवला होता. पण, लॉकडाऊन सुरू झाल्याने आता मात्र सहनशीलतेच्या पलीकडे सर्व गेल्याच्या भावना व्यापारीवर्गात आहेत. कारण, नुकसान सहन तरी किती करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतोय. आपणच इतके अस्थिर झालेले आहोत, तर कर्मचाऱ्यांना कसे पोसायचे, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे त्यांच्याकडे काम करत असले तरी मागील लॉकडाऊनकाळात त्यांना शक्य तेवढा पगार देऊन टिकवून ठेवले होते. पण, पुन्हा लॉकडाऊन म्हणजे व्यवसायच बंद करण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे कृष्णा जेना याने सांगितले.

मालक किती महिने पगार देणार?

लॉकडाऊनची कळ व्यापारी काही महिने व काही वर्षे सोसतीलही. पण, कर्मचाऱ्यांनी कुठे जायचे? व्यवसायच बंद असेल तर मालक किती महिने पगार, पैसे देणार. शेवटी, आमच्या रोजगारावर संक्रांत आहेच, अशी व्यथा भावेश म्हात्रे या कर्मचाऱ्याने मांडली. लॉकडाऊन हा आता पर्याय राहिलेला नसून विनामास्क फिरणारे, गर्दी करणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर आणि सातत्याने कारवाईची गरज आहे. त्याशिवाय लोक सुधारणार नाहीत व कोरोनालाही आळा घालणे अशक्य असल्याचे सुरेश पाटील म्हणाले.