शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांसोबत उघडपणे दहशतवादी दिसले; हा घ्या पुरावा
2
India Pakistan War : पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजू लागला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
5
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
6
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
7
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
8
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
9
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
10
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
11
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
12
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
13
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
14
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
15
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
16
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
17
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
18
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
19
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
20
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम

कर्मचाऱ्यांना टिकवायचे कसे आणि आम्हीही जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा सवाल धीरज परब लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान अजून भरून निघालेले ...

मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा सवाल

धीरज परब

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान अजून भरून निघालेले नाही. व्यवसाय आता कुठे कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच परत लॉकडाऊन होणार असेल, तर कर्मचाऱ्यांना टिकवणे ही तर नंतरची गोष्ट, पण जिकडे आम्हीच तग धरू शकणार नाही, त्याचे काय, असा सवाल मीरा-भाईंदरमधील अनेक व्यापाऱ्यांनी केला आहे. मीरा-भाईंदरमधील एकूणच दुकानदार व विविध व्यापाऱ्यांच्या व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आढावा घेतला असता अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. शहरात मोठ्या संख्येने दुकानदार, हॉटेल व अन्य व्यावसायिक हे भाड्याच्या जागेत आपला व्यवसाय करत आहेत. शहरातील भाडीही भरमसाट आहेत.

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात भाड्यामुळे अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले. तर, काहींनी कसाबसा तग धरला. कारण, बहुसंख्य मालकांनी भाडे अजिबात कमी केले नाही. काहींनी मात्र कमी केले तर काहींनी एखाद्या महिन्याचे भाडे माफही केले. मागील वर्षीच्या लॉकडाऊनकाळातच पगार देणे परवडत नसल्याने बहुसंख्य कर्मचारीवर्ग कमी करण्यात आला. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर हळूहळू व्यवसाय पूर्वपदावर येईल, या आशेने व्यापारीवर्ग होता. पदरमोड करून काहींनी दुकानाचे भाडे भरले व कर्मचारीही टिकवले. परंतु, व्यवसाय हळूहळू का होईना पुन्हा उभा करू, अशी आशा व जिद्द बाळगून व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू ठेवला होता. पण, लॉकडाऊन सुरू झाल्याने आता मात्र सहनशीलतेच्या पलीकडे सर्व गेल्याच्या भावना व्यापारीवर्गात आहेत. कारण, नुकसान सहन तरी किती करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतोय. आपणच इतके अस्थिर झालेले आहोत, तर कर्मचाऱ्यांना कसे पोसायचे, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे त्यांच्याकडे काम करत असले तरी मागील लॉकडाऊनकाळात त्यांना शक्य तेवढा पगार देऊन टिकवून ठेवले होते. पण, पुन्हा लॉकडाऊन म्हणजे व्यवसायच बंद करण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे कृष्णा जेना याने सांगितले.

मालक किती महिने पगार देणार?

लॉकडाऊनची कळ व्यापारी काही महिने व काही वर्षे सोसतीलही. पण, कर्मचाऱ्यांनी कुठे जायचे? व्यवसायच बंद असेल तर मालक किती महिने पगार, पैसे देणार. शेवटी, आमच्या रोजगारावर संक्रांत आहेच, अशी व्यथा भावेश म्हात्रे या कर्मचाऱ्याने मांडली. लॉकडाऊन हा आता पर्याय राहिलेला नसून विनामास्क फिरणारे, गर्दी करणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर आणि सातत्याने कारवाईची गरज आहे. त्याशिवाय लोक सुधारणार नाहीत व कोरोनालाही आळा घालणे अशक्य असल्याचे सुरेश पाटील म्हणाले.