शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना टिकवायचे कसे आणि आम्हीही जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा सवाल धीरज परब लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान अजून भरून निघालेले ...

मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा सवाल

धीरज परब

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान अजून भरून निघालेले नाही. व्यवसाय आता कुठे कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच परत लॉकडाऊन होणार असेल, तर कर्मचाऱ्यांना टिकवणे ही तर नंतरची गोष्ट, पण जिकडे आम्हीच तग धरू शकणार नाही, त्याचे काय, असा सवाल मीरा-भाईंदरमधील अनेक व्यापाऱ्यांनी केला आहे. मीरा-भाईंदरमधील एकूणच दुकानदार व विविध व्यापाऱ्यांच्या व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आढावा घेतला असता अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. शहरात मोठ्या संख्येने दुकानदार, हॉटेल व अन्य व्यावसायिक हे भाड्याच्या जागेत आपला व्यवसाय करत आहेत. शहरातील भाडीही भरमसाट आहेत.

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात भाड्यामुळे अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले. तर, काहींनी कसाबसा तग धरला. कारण, बहुसंख्य मालकांनी भाडे अजिबात कमी केले नाही. काहींनी मात्र कमी केले तर काहींनी एखाद्या महिन्याचे भाडे माफही केले. मागील वर्षीच्या लॉकडाऊनकाळातच पगार देणे परवडत नसल्याने बहुसंख्य कर्मचारीवर्ग कमी करण्यात आला. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर हळूहळू व्यवसाय पूर्वपदावर येईल, या आशेने व्यापारीवर्ग होता. पदरमोड करून काहींनी दुकानाचे भाडे भरले व कर्मचारीही टिकवले. परंतु, व्यवसाय हळूहळू का होईना पुन्हा उभा करू, अशी आशा व जिद्द बाळगून व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू ठेवला होता. पण, लॉकडाऊन सुरू झाल्याने आता मात्र सहनशीलतेच्या पलीकडे सर्व गेल्याच्या भावना व्यापारीवर्गात आहेत. कारण, नुकसान सहन तरी किती करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतोय. आपणच इतके अस्थिर झालेले आहोत, तर कर्मचाऱ्यांना कसे पोसायचे, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे त्यांच्याकडे काम करत असले तरी मागील लॉकडाऊनकाळात त्यांना शक्य तेवढा पगार देऊन टिकवून ठेवले होते. पण, पुन्हा लॉकडाऊन म्हणजे व्यवसायच बंद करण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे कृष्णा जेना याने सांगितले.

मालक किती महिने पगार देणार?

लॉकडाऊनची कळ व्यापारी काही महिने व काही वर्षे सोसतीलही. पण, कर्मचाऱ्यांनी कुठे जायचे? व्यवसायच बंद असेल तर मालक किती महिने पगार, पैसे देणार. शेवटी, आमच्या रोजगारावर संक्रांत आहेच, अशी व्यथा भावेश म्हात्रे या कर्मचाऱ्याने मांडली. लॉकडाऊन हा आता पर्याय राहिलेला नसून विनामास्क फिरणारे, गर्दी करणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर आणि सातत्याने कारवाईची गरज आहे. त्याशिवाय लोक सुधारणार नाहीत व कोरोनालाही आळा घालणे अशक्य असल्याचे सुरेश पाटील म्हणाले.