शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

एक खड्डा बुजवण्यासाठी २० हजार रुपये खर्च कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:05 IST

जागरूक नागरिक मंचचा सवाल : आयुक्तांना दिले निवेदन

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेले पाच हजार ८२३ खड्डे बुजविल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम खात्याने दिली आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जागरूक नागरिक मंचाने केला आहे. तसेच खड्डे बुजविण्यावर आतापर्यंत झालेल्या खर्चानुसार एक खड्डा बुजविण्यासाठी २० हजार रुपये खर्च आला का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.यंदा पाऊस लांबल्याने शहरांमधील सर्वच रस्त्यांना खड्डे पडले आहेत. दिवाळी होऊन गेल्यावरही ते भरण्यात आलेले नाही. मात्र, महापालिकेने १५ मेपासून आतापर्यंत शहरातील पाच हजार ८२३ खड्डे बुजविले असून, अद्याप ३२० खड्डे बुजविण्याचे काम बाकी आहे, अशी माहिती दिली आहे. तसेच खड्डे बुजविण्यासाठी तरतूद असलेल्या १७ कोटी रुपयांपैकी ७० टक्के निधी म्हणजे १२ कोटी रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’च्या हॅलो ‘ठाणे’मध्ये मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल जागरूक नागरिक मंचाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर, पदाधिकारी विवेक कानडे, संजीता नायर यांनी घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्त व शहर अभियंत्यांना बुधवारी निवेदन दिले.

मंचाने निवेदनात म्हटले आहे की, ‘महापालिकेस एक खड्डा बुजविण्यासाठी २० हजारांचा खर्च आल्याचे उघड होत आहे. ही सरासरी रक्कम पाहता खड्डे बुजविण्याच्या कामात गैरव्यवहार झाला आहे. १२ कोटी रुपये खर्च करूनही शहरातील सगळ्याच रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेलेले नाहीत. त्यांची स्थिती जैसे थे अशीच आहे. मग, महापालिकेने कोणत्या ठिकाणचे पाच हजार ८२३ खड्डे बुजविले, असा प्रश्न शिल्लक राहतो. त्याचे कोणतेच उत्तर प्रशासनाकडे नसल्याने याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. यासंदर्भात १३ नोव्हेंबरला चर्चेसाठी बैठकीला बोलवावे.’ दुसरीकडे यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. खड्डे जास्त पडले. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवरील डांबर वाहून गेले. त्यामुळे रस्ताच वाहून गेला, असा दावा महापालिकेने केला आहे. दरम्यान, मंचाने केलेल्या आरोपांबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते रघुवीर शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.मग तरी खड्डे का?च्निवेदनात पुढे म्हटले आहे, ‘२०१८ मध्ये पावसाळ्यात पाच जणांचा मृत्यू खड्ड्यांमुळे झाला होता. त्यावेळी महापालिकेने १५ कोटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी मंजूर केले होते. त्यामुळे तेव्हा हा निधी खर्च झाला असताना यंदाच्या वर्षी रस्त्यांवर कमी खड्डे पडले पाहिजे होते. मात्र, यंदाच्या वर्षीही खड्डे बुजविण्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर केले गेले.’

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका