शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

एक खड्डा बुजवण्यासाठी २० हजार रुपये खर्च कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:05 IST

जागरूक नागरिक मंचचा सवाल : आयुक्तांना दिले निवेदन

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेले पाच हजार ८२३ खड्डे बुजविल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम खात्याने दिली आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जागरूक नागरिक मंचाने केला आहे. तसेच खड्डे बुजविण्यावर आतापर्यंत झालेल्या खर्चानुसार एक खड्डा बुजविण्यासाठी २० हजार रुपये खर्च आला का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.यंदा पाऊस लांबल्याने शहरांमधील सर्वच रस्त्यांना खड्डे पडले आहेत. दिवाळी होऊन गेल्यावरही ते भरण्यात आलेले नाही. मात्र, महापालिकेने १५ मेपासून आतापर्यंत शहरातील पाच हजार ८२३ खड्डे बुजविले असून, अद्याप ३२० खड्डे बुजविण्याचे काम बाकी आहे, अशी माहिती दिली आहे. तसेच खड्डे बुजविण्यासाठी तरतूद असलेल्या १७ कोटी रुपयांपैकी ७० टक्के निधी म्हणजे १२ कोटी रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’च्या हॅलो ‘ठाणे’मध्ये मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल जागरूक नागरिक मंचाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर, पदाधिकारी विवेक कानडे, संजीता नायर यांनी घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्त व शहर अभियंत्यांना बुधवारी निवेदन दिले.

मंचाने निवेदनात म्हटले आहे की, ‘महापालिकेस एक खड्डा बुजविण्यासाठी २० हजारांचा खर्च आल्याचे उघड होत आहे. ही सरासरी रक्कम पाहता खड्डे बुजविण्याच्या कामात गैरव्यवहार झाला आहे. १२ कोटी रुपये खर्च करूनही शहरातील सगळ्याच रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेलेले नाहीत. त्यांची स्थिती जैसे थे अशीच आहे. मग, महापालिकेने कोणत्या ठिकाणचे पाच हजार ८२३ खड्डे बुजविले, असा प्रश्न शिल्लक राहतो. त्याचे कोणतेच उत्तर प्रशासनाकडे नसल्याने याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. यासंदर्भात १३ नोव्हेंबरला चर्चेसाठी बैठकीला बोलवावे.’ दुसरीकडे यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. खड्डे जास्त पडले. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवरील डांबर वाहून गेले. त्यामुळे रस्ताच वाहून गेला, असा दावा महापालिकेने केला आहे. दरम्यान, मंचाने केलेल्या आरोपांबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते रघुवीर शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.मग तरी खड्डे का?च्निवेदनात पुढे म्हटले आहे, ‘२०१८ मध्ये पावसाळ्यात पाच जणांचा मृत्यू खड्ड्यांमुळे झाला होता. त्यावेळी महापालिकेने १५ कोटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी मंजूर केले होते. त्यामुळे तेव्हा हा निधी खर्च झाला असताना यंदाच्या वर्षी रस्त्यांवर कमी खड्डे पडले पाहिजे होते. मात्र, यंदाच्या वर्षीही खड्डे बुजविण्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर केले गेले.’

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका