शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

अंबरनाथ पालिकेला लाज कशी वाटत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:20 IST

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या वडवली तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुळात हे काम करण्याची जबाबदारी स्थानिक पालिका प्रशासनाची असतानाही शहरातील सेवाभावी संस्था हे काम करत आहेत. जे काम पालिकेला जमले नाही, ते काम खासगी संस्थेच्या मदतीने होत असल्याने पालिकेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पंकज पाटील

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या वडवली तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुळात हे काम करण्याची जबाबदारी स्थानिक पालिका प्रशासनाची असतानाही शहरातील सेवाभावी संस्था हे काम करत आहेत. जे काम पालिकेला जमले नाही, ते काम खासगी संस्थेच्या मदतीने होत असल्याने पालिकेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अंबरनाथ नगरपालिका हद्दीत असलेला आणि बदलापूरला लागूनच असलेला वडवली तलाव हा एक निसर्गरम्य परिसर आहे. या परिसराचे सुशोभीकरण केल्यास दोन्ही शहरांतील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. मात्र, या तलावाच्या सुशोभीकरणाचा मुद्दा अनेक वर्षे रखडलेल्या अवस्थेतच राहिला आहे. त्यामुळे या तलावाचे सुशोभीकरण आणि गाळ काढण्याचे काम ३० ते ४० वर्षे झाले नाही. या तलावाची खोली सर्वात जास्त असतानाही चार ते पाच वर्षांत गाळ आल्याने तलावात पाण्याची क्षमता कमी झाली होती. पाणी कमी राहत असल्याने मासे आणि पक्षी यांचा वावर कमी झाला होता. मात्र, या तलावाची दयनीय अवस्था अंबरनाथ पालिकेने कधीही अनुभवली नाही. पंधरा वर्षांपूर्वी या तलावाचे सुशोभीकरण आणि विकासाचे काम बीओटी तत्त्वावर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, ती फाइल गहाळ झाल्याने हा तलाव जैसे थे परिस्थितीत राहिला. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याने या तलावाची फाइल पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला नाही. पाच वर्षांत तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती उभारण्यात आल्याने या भागातील नागरिकांना हे चांगले ठिकाण निर्माण करता यावे, यासाठी नव्याने प्रयत्न करण्यात आले. एवढेच नव्हे तर टीडीआरच्या माध्यमातून या तलावाचे सुशोभीकरण करण्याचा प्रयत्नही करण्यात येणार होता. मात्र, ज्या विकासकांनी हा प्रस्ताव पुढे केला होता, त्याचा प्रस्ताव तांत्रिक अडचणीत अडकल्याने पुन्हा या तलावाला उतरती कळा लागली.

तलावाच्या सुशोभीकरणाचे आणि गाळ काढण्याचे काम अंबरनाथ पालिकेने करणे अपेक्षित होते. मात्र, पालिका प्रशासन हे काम करण्यात अपयशी ठरल्याने आता तलावाच्या परिसरात राहणाºया नागरिकांनी आणि सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जीबीके ग्रुपमधील तरुणांनी पुढाकार घेत तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी तलावाचे काम सुरू करण्यात आले. अर्थात, एवढ्या मोठ्या तलावाचा गाळ काढणे, हे खर्चिक असल्याने त्यासाठी शहरातील दानशूर व्यक्तींचाही हातभार घेतला. शहरासाठी चांगले काम होत असल्याने अनेकांनी जेसीबी, पोकलेन मशीन, डम्पर एवढेच नव्हे, तर जागेवर काम करण्यासाठी कामगारही पुरवले. हा प्रकार पुढे महिनाभर सुरू राहिला. अनेकांनी हातभार लावल्याने तलावाचा निम्मा गाळ उपसण्यात आला. मात्र, त्याचदरम्यान पाऊस पडल्याने गेल्या वर्षी हे काम थांबवण्यात आले. थांबलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले असून शहरात पुन्हा एकदा सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांनी या कामासाठी हातभार लावला आहे. अनेकांची मदत या कामासाठी होत असल्याने अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने काम पुढे सरकत आहे. सरकारी कामालाही लाजवेल, असे नियोजनबद्ध कामकाज सुरू आहे. तलावातील ९० टक्के गाळ काढण्यात आला असून महिनाभरात उर्वरित काळ काढून हा तलाव पुनर्जीवित करण्यात येणार आहे. या तलावात असलेले नैसर्गिक झरे पुन्हा सुरू करून तलावाचा परिसर सुशोभित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या कामासाठी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था आपल्या शक्तीप्रमाणे अर्थसाहाय्य करत आहे. लाखोंचा खर्च करून हे काम केले जात असतानाही अंबरनाथ पालिकेकडून एक रुपयाचीही मदत करण्यात आलेली नाही. याउलट, पालिकेची मदत न घेताच हे काम करण्याचा प्रयत्न सेवाभावी संस्थांनी सुरू केला आहे. त्यामुळे भविष्यात या तलावाचे सौंदर्य वाढल्यास त्याचे श्रेय पालिकेने घेऊ नये, एवढी माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.

ज्या भागात हा तलाव आहे, त्या भागाचे सौंदर्यीकरण करून या परिसरातील बांधकाम व्यावसायिक आपला बांधकाम व्यवसायातील नफा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप होत असला, तरी एवढे मोठे काम करणे, हे सहज शक्य नाही. त्यामुळे या कामावर आरोप करणारे व त्या कामासाठी सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. तलावाशेजारी पालिकेचे उद्यान आरक्षण असून त्या उद्यानाचा विकास केल्यास दोन्ही शहरांसाठी एक चांगला स्पॉट तयार करणे शक्य होईल. गेल्यावर्षी सुरू झालेले हे काम आता यावर्षी संपणार आहे. हे निश्चित चित्र आहे. त्यामुळे पालिकेने उशिरा का होईना, या परिसराच्या कामाकडे लक्ष द्यावे, अशी गरज व्यक्त होत आहे.

गेल्या २० ते २५ वर्षांत तलावाचा केवळ प्रस्ताव तयार करून पालिकेने आपली जबाबदारी झटकण्याचे काम केले. त्यामुळे गाळमुक्त झालेल्या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम पालिकेने केल्यास वाढत्या शहराला एक निसर्गरम्य ठिकाण मिळणार आहे. या तलावाच्या शेजारीच शिव मंदिर असून या शिव मंदिराच्या परिसरात भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या भाविकांनादेखील तलावाचा परिसर मंत्रमुग्ध करणारा ठरेल.

टॅग्स :ambernathअंबरनाथ