शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ठाण्यात अ‍ॅथलेटस घडणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 04:27 IST

ठाण्यात सोयीसुविधा नसतानाही चांगले अ‍ॅथलेट्स घडत आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये त्यांची संख्या रोडावली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी स्पर्धा घ्यायची वेळ आली, तर ती मुंबईत घ्यावी लागते. ठाणे शहरासाठी ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. दादोजी कोंडदेव क्रीडागृह अ‍ॅथलेटिक्ससाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. कौसा येथे आजही परवानगी दिली जात ...

ठाण्यात सोयीसुविधा नसतानाही चांगले अ‍ॅथलेट्स घडत आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये त्यांची संख्या रोडावली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी स्पर्धा घ्यायची वेळ आली, तर ती मुंबईत घ्यावी लागते. ठाणे शहरासाठी ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. दादोजी कोंडदेव क्रीडागृह अ‍ॅथलेटिक्ससाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. कौसा येथे आजही परवानगी दिली जात नाही. तेथील ट्रॅक अ‍ॅथलेट्ससाठी उपयोगाचा नसल्याची खंत ठाण्यातील अ‍ॅथलेक्टिस कोच अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

अ‍ॅथलेट्ससाठी ठाण्यात कोणत्याही सोयीसुविधा नसून ही परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न अजित कुळकर्णी यांनी वेळोवेळी केला. ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत आहे. त्याअनुषंगाने ठाणेकरांना अनेक स्मार्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत. परंतु ठाण्याने खेळाडूंच्या सुविधांसाठी म्हणावे तेवढे प्रयत्न केले नाहीत. दादोजी कोंडदेव क्रीडागृहात पूर्वी सिंथेटीक ट्रॅक उपलब्ध होता. आता त्याची दुरवस्था झाली असून, तो सराव करण्यायोग्य राहिलेला नाही. तीन ते चार महिन्यांपासून क्रिकेटसाठी या ट्रॅकचा वापर होत असून, संपूर्ण स्टेडिअमच अ‍ॅथलेट्ससाठी बंद करण्यात आले आहे. मुंब्य्रातील कौसा येथे मोठ्या दिमाखात स्टेडिअम उभारले आहे. तेथील ट्रॅकचा वापर केवळ मॉर्निंग वॉकसाठी होत असून, सरावासाठी अद्यापही तिथे परवानगी दिलेली नाही. महत्प्रयासाने एकदाच त्याठिकाणी सरावाची संधी मिळाली होती. परंतु ठाण्यातील खेळाडूंना तिथे जाण्या-येण्यातच चार तास घालवावे लागले. प्रवासातच एवढा वेळ जात असेल, तर त्यांनी सराव कधी करावा, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे ठाण्यातील खेळाडूंना मुंबईला किंवा पुण्यातील बालेवाडीला नाईलाजाने जावे लागते. त्यातही काही अडचणी आहेत.

मुंबई विद्यापीठात सरावाला गेल्यास तिथे प्रथम प्राधान्य त्यांच्या विद्यार्थ्यांना दिले जाते. एकूणच ठाण्यात चांगले अ‍ॅथलेट्स घडू शकतात. परंतु त्यांना सराव करण्यासाठी जागा आणि पूरक सोयीसुविधासुध्दा उपलब्ध नाहीत. मागील ११ वर्षांपासून अ‍ॅथलेट्ससाठी सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु त्याला यश मिळाले नाही. काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्याची स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा ठाण्यात होणे अपेक्षित होते. परंतु ती सोयीसुविधांअभावी मुंबईला घ्यावी लागली. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, बहुतांश पालक मुलांच्या क्रीडागुणांना महत्त्व देण्याऐवजी अभ्यासावरच जोर देतात. याशिवाय खेळाडूंना नोकरीच्या संधी कमी आहेत. एलआयसीमध्ये खेळाडूंना संधी मिळते, रेल्वेत बऱ्याच मर्यादा आहेत. नोकरीच्या संधी वाढविण्याची गरज आहे. शहरी भागात सोयीसुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने आम्ही मित्रमंडळीसह ग्रामीण भागात जाऊन खेळाडूंना तयार करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे अजित कुळकर्णी यांनी सांगितले.अजित कुलकर्णींची खंतठाण्यातील अ‍ॅथलेट्समध्ये भरपूर ऊर्जा आहे. उच्च दर्जाचे खेळाडू येथे घडू शकतात. या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात ठाण्याचा नावलौकिक होऊ शकतो. मात्र त्यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

टॅग्स :thaneठाणे