शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

ठाण्यात अ‍ॅथलेटस घडणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 04:27 IST

ठाण्यात सोयीसुविधा नसतानाही चांगले अ‍ॅथलेट्स घडत आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये त्यांची संख्या रोडावली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी स्पर्धा घ्यायची वेळ आली, तर ती मुंबईत घ्यावी लागते. ठाणे शहरासाठी ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. दादोजी कोंडदेव क्रीडागृह अ‍ॅथलेटिक्ससाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. कौसा येथे आजही परवानगी दिली जात ...

ठाण्यात सोयीसुविधा नसतानाही चांगले अ‍ॅथलेट्स घडत आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये त्यांची संख्या रोडावली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी स्पर्धा घ्यायची वेळ आली, तर ती मुंबईत घ्यावी लागते. ठाणे शहरासाठी ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. दादोजी कोंडदेव क्रीडागृह अ‍ॅथलेटिक्ससाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. कौसा येथे आजही परवानगी दिली जात नाही. तेथील ट्रॅक अ‍ॅथलेट्ससाठी उपयोगाचा नसल्याची खंत ठाण्यातील अ‍ॅथलेक्टिस कोच अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

अ‍ॅथलेट्ससाठी ठाण्यात कोणत्याही सोयीसुविधा नसून ही परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न अजित कुळकर्णी यांनी वेळोवेळी केला. ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत आहे. त्याअनुषंगाने ठाणेकरांना अनेक स्मार्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत. परंतु ठाण्याने खेळाडूंच्या सुविधांसाठी म्हणावे तेवढे प्रयत्न केले नाहीत. दादोजी कोंडदेव क्रीडागृहात पूर्वी सिंथेटीक ट्रॅक उपलब्ध होता. आता त्याची दुरवस्था झाली असून, तो सराव करण्यायोग्य राहिलेला नाही. तीन ते चार महिन्यांपासून क्रिकेटसाठी या ट्रॅकचा वापर होत असून, संपूर्ण स्टेडिअमच अ‍ॅथलेट्ससाठी बंद करण्यात आले आहे. मुंब्य्रातील कौसा येथे मोठ्या दिमाखात स्टेडिअम उभारले आहे. तेथील ट्रॅकचा वापर केवळ मॉर्निंग वॉकसाठी होत असून, सरावासाठी अद्यापही तिथे परवानगी दिलेली नाही. महत्प्रयासाने एकदाच त्याठिकाणी सरावाची संधी मिळाली होती. परंतु ठाण्यातील खेळाडूंना तिथे जाण्या-येण्यातच चार तास घालवावे लागले. प्रवासातच एवढा वेळ जात असेल, तर त्यांनी सराव कधी करावा, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे ठाण्यातील खेळाडूंना मुंबईला किंवा पुण्यातील बालेवाडीला नाईलाजाने जावे लागते. त्यातही काही अडचणी आहेत.

मुंबई विद्यापीठात सरावाला गेल्यास तिथे प्रथम प्राधान्य त्यांच्या विद्यार्थ्यांना दिले जाते. एकूणच ठाण्यात चांगले अ‍ॅथलेट्स घडू शकतात. परंतु त्यांना सराव करण्यासाठी जागा आणि पूरक सोयीसुविधासुध्दा उपलब्ध नाहीत. मागील ११ वर्षांपासून अ‍ॅथलेट्ससाठी सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु त्याला यश मिळाले नाही. काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्याची स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा ठाण्यात होणे अपेक्षित होते. परंतु ती सोयीसुविधांअभावी मुंबईला घ्यावी लागली. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, बहुतांश पालक मुलांच्या क्रीडागुणांना महत्त्व देण्याऐवजी अभ्यासावरच जोर देतात. याशिवाय खेळाडूंना नोकरीच्या संधी कमी आहेत. एलआयसीमध्ये खेळाडूंना संधी मिळते, रेल्वेत बऱ्याच मर्यादा आहेत. नोकरीच्या संधी वाढविण्याची गरज आहे. शहरी भागात सोयीसुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने आम्ही मित्रमंडळीसह ग्रामीण भागात जाऊन खेळाडूंना तयार करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे अजित कुळकर्णी यांनी सांगितले.अजित कुलकर्णींची खंतठाण्यातील अ‍ॅथलेट्समध्ये भरपूर ऊर्जा आहे. उच्च दर्जाचे खेळाडू येथे घडू शकतात. या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात ठाण्याचा नावलौकिक होऊ शकतो. मात्र त्यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

टॅग्स :thaneठाणे