शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

वारेमाप वीजबिले आली कशी?- रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:33 IST

महावितरणच्या विभागीय अभियंत्यांकडे विचारणा

डोंबिवली : वाढीव वीजबिले, सतत वीजपुरवठा खंडित होणे, यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ज्यांना ५०० रु पये बिल येत होते, त्यांना आता पाच हजार रुपये बिल येत आहे. अशी वारमाप वीजबिले कशी येत आहेत? त्यामुळे एखादी चांगली योजना आणून त्यांना दिलासा द्या. विजेच्या संदर्भात दिल्ली पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा या राज्य सरकारने केली होती. ही घोषणा कागदावर राहिली का, असा सवाल आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला.वीजसमस्या, वीजबिलांबाबत चव्हाण यांनी गुरुवारी महावितरणच्या कल्याण येथील तेजश्री कार्यालयात विभागीय अभियंता दिनेश अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला.यावेळी चव्हाण म्हणाले, विविध समस्यांसंदर्भात आम्ही महावितरणला पत्रे पाठवली, पण त्याला उत्तरही मिळत नाही. प्रत्येक बैठकीचे आम्हाला इतिवृत्त हवे आहे. महावितरणने बिल भरण्यासाठी ग्राहकांना तगादा लावणे चुकीचे आहे. खंबाळपाडा, कांचनगाव येथे दिवसातून सात वेळा वीज खंडित होते. मी राज्यमंत्री असताना अखंड वीजपुरवठ्यासाठी मेरी गो राउंड पद्धतीने सर्व व्यवस्था केली, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. वीज खंडित होण्याचा अहवाल आम्हाला हवा. विजेअभावी नागरिकांना घरून कामे करता येत नाहीत. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.त्यावर अग्रवाल म्हणाले की, खंबाळपाडा विभागात सात ठिकाणी समस्या येत आहे. त्याबाबत गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याकरिता शुक्र वारी दिवसभर शटडाउन घेण्यात येणार आहे.गणेशोत्सवात कोणाचेही वीजमीटर काढू नकाभाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी उपअभियंता अधिकारी नितीन दुपहारे यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी केली.गणेशोत्सवात वीजबिलांमुळे कुणाचेही मीटर काढल्यास, त्यामुळे होणाºया परिणामांना केवळ महावितरण जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी खंबाळपाडा प्रभागाचे नगरसेवक साई शेलार यांनीही नागरिकांच्या समस्या मांडल्या.

टॅग्स :electricityवीज