शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

वारेमाप वीजबिले आली कशी?- रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:33 IST

महावितरणच्या विभागीय अभियंत्यांकडे विचारणा

डोंबिवली : वाढीव वीजबिले, सतत वीजपुरवठा खंडित होणे, यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ज्यांना ५०० रु पये बिल येत होते, त्यांना आता पाच हजार रुपये बिल येत आहे. अशी वारमाप वीजबिले कशी येत आहेत? त्यामुळे एखादी चांगली योजना आणून त्यांना दिलासा द्या. विजेच्या संदर्भात दिल्ली पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा या राज्य सरकारने केली होती. ही घोषणा कागदावर राहिली का, असा सवाल आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला.वीजसमस्या, वीजबिलांबाबत चव्हाण यांनी गुरुवारी महावितरणच्या कल्याण येथील तेजश्री कार्यालयात विभागीय अभियंता दिनेश अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला.यावेळी चव्हाण म्हणाले, विविध समस्यांसंदर्भात आम्ही महावितरणला पत्रे पाठवली, पण त्याला उत्तरही मिळत नाही. प्रत्येक बैठकीचे आम्हाला इतिवृत्त हवे आहे. महावितरणने बिल भरण्यासाठी ग्राहकांना तगादा लावणे चुकीचे आहे. खंबाळपाडा, कांचनगाव येथे दिवसातून सात वेळा वीज खंडित होते. मी राज्यमंत्री असताना अखंड वीजपुरवठ्यासाठी मेरी गो राउंड पद्धतीने सर्व व्यवस्था केली, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. वीज खंडित होण्याचा अहवाल आम्हाला हवा. विजेअभावी नागरिकांना घरून कामे करता येत नाहीत. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.त्यावर अग्रवाल म्हणाले की, खंबाळपाडा विभागात सात ठिकाणी समस्या येत आहे. त्याबाबत गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याकरिता शुक्र वारी दिवसभर शटडाउन घेण्यात येणार आहे.गणेशोत्सवात कोणाचेही वीजमीटर काढू नकाभाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी उपअभियंता अधिकारी नितीन दुपहारे यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी केली.गणेशोत्सवात वीजबिलांमुळे कुणाचेही मीटर काढल्यास, त्यामुळे होणाºया परिणामांना केवळ महावितरण जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी खंबाळपाडा प्रभागाचे नगरसेवक साई शेलार यांनीही नागरिकांच्या समस्या मांडल्या.

टॅग्स :electricityवीज