शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वारेमाप वीजबिले आली कशी?- रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:33 IST

महावितरणच्या विभागीय अभियंत्यांकडे विचारणा

डोंबिवली : वाढीव वीजबिले, सतत वीजपुरवठा खंडित होणे, यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ज्यांना ५०० रु पये बिल येत होते, त्यांना आता पाच हजार रुपये बिल येत आहे. अशी वारमाप वीजबिले कशी येत आहेत? त्यामुळे एखादी चांगली योजना आणून त्यांना दिलासा द्या. विजेच्या संदर्भात दिल्ली पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा या राज्य सरकारने केली होती. ही घोषणा कागदावर राहिली का, असा सवाल आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला.वीजसमस्या, वीजबिलांबाबत चव्हाण यांनी गुरुवारी महावितरणच्या कल्याण येथील तेजश्री कार्यालयात विभागीय अभियंता दिनेश अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला.यावेळी चव्हाण म्हणाले, विविध समस्यांसंदर्भात आम्ही महावितरणला पत्रे पाठवली, पण त्याला उत्तरही मिळत नाही. प्रत्येक बैठकीचे आम्हाला इतिवृत्त हवे आहे. महावितरणने बिल भरण्यासाठी ग्राहकांना तगादा लावणे चुकीचे आहे. खंबाळपाडा, कांचनगाव येथे दिवसातून सात वेळा वीज खंडित होते. मी राज्यमंत्री असताना अखंड वीजपुरवठ्यासाठी मेरी गो राउंड पद्धतीने सर्व व्यवस्था केली, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. वीज खंडित होण्याचा अहवाल आम्हाला हवा. विजेअभावी नागरिकांना घरून कामे करता येत नाहीत. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.त्यावर अग्रवाल म्हणाले की, खंबाळपाडा विभागात सात ठिकाणी समस्या येत आहे. त्याबाबत गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याकरिता शुक्र वारी दिवसभर शटडाउन घेण्यात येणार आहे.गणेशोत्सवात कोणाचेही वीजमीटर काढू नकाभाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी उपअभियंता अधिकारी नितीन दुपहारे यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी केली.गणेशोत्सवात वीजबिलांमुळे कुणाचेही मीटर काढल्यास, त्यामुळे होणाºया परिणामांना केवळ महावितरण जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी खंबाळपाडा प्रभागाचे नगरसेवक साई शेलार यांनीही नागरिकांच्या समस्या मांडल्या.

टॅग्स :electricityवीज