शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

माझ्यापेक्षा मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क स्नेहा पावसकर ठाणे : महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यंदा परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क स्नेहा पावसकर

ठाणे : महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यंदा परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण दिले गेले आहेत. त्यामुळे यंदा गुणांचे पुनर्मूल्यांकन होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांत समाधान मानावे लागत आहे. मात्र, तरीही आपल्याला कमी गुण मिळाले आणि आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला जास्त गुण मिळालेत ते कसे, अशी नाराजी अनेक विद्यार्थ्यांत दिसते आहे.

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी-बारावीच्या नियोजित परीक्षाही रद्द केल्या होत्या. अखेर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल दिले गेले. त्यानुसार निकाल जाहीर झाले. या निकालात नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी असून अनेकांना चांगले टक्के मिळाले आहेत. मात्र, तरीही निकालावर समाधानी नसणारे विद्यार्थी पेपर रिचेकिंगचा अर्ज भरतात. त्यातून काही गुण आणि पर्यायाने टक्के वाढतील अशी अपेक्षा त्यांना असते. मात्र यंदा परीक्षाच झाली नाही तर पेपर नाही आणि रिचेकिंग नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी नाराज आहेत, तसेच आपल्या सोबतच्या मित्र, मैत्रिणींना जास्त गुण मिळाले कसे, मला का नाही, असे प्रश्न ते उपस्थित करत आहेत.

------------------

मला माझ्या मैत्रिणीपेक्षा नववीच्या वर्गात अधिक गुण होते. जर ते गुणही यंदाच्या निकालात ग्राह्य धरलेत तर मग मला तिच्यापेक्षा जास्त गुण मिळायला हवे होते, मात्र मला तिच्यापेक्षा आणि अपेक्षेपेक्षा बरेच कमी टक्के मिळाले.

चिन्मयी राहे, विद्यार्थिनी

-----------

मला अकरावीत आणि अंतर्गत परीक्षांमध्ये माझ्या मित्र, मैत्रिणींइतकेच साधारण गुण मिळाले होते. मग आताच्या आमच्या निकालात फरक कसा काय? माझी टक्केवारी इतरांपेक्षा कमी कशी काय? आता यासाठी कोणाला विचारणा करायची?

शाल्व देसाई, विद्यार्थी

-------------

माझ्याच मुलाला नाही तर परिचयातील अनेक मुलांना नववी आणि अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण होते, मात्र त्या तुलनेत दहावीचा अंतिम निकाल दिसत नाही. नेमका कोणता फॉर्म्युला वापरला काही स्पष्ट होत नाही; पण रिचेकिंग नसल्याने मुले नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया एका पालकांनी दिली.

-------------

रिचेकिंग नाही, पण गुण पडताळणीचा वेगळा काही पर्याय आहे का? कसे गुण ग्राह्य धरले हे कळेल का, असे अनेक प्रश्न विचारले जातात. मात्र यंदा शासनाने मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने परीक्षा न घेता उलट खूप चांगला फॉर्म्युला वापरून निकाल दिला. अनेकांना चांगले टक्के मिळाले. कोणाला कमी, जास्त झाले असतील तर नाराज होऊ नये, अशाप्रकारे समजावत असल्याचे एका बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले.