शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यापेक्षा मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क स्नेहा पावसकर ठाणे : महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यंदा परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क स्नेहा पावसकर

ठाणे : महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यंदा परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण दिले गेले आहेत. त्यामुळे यंदा गुणांचे पुनर्मूल्यांकन होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांत समाधान मानावे लागत आहे. मात्र, तरीही आपल्याला कमी गुण मिळाले आणि आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला जास्त गुण मिळालेत ते कसे, अशी नाराजी अनेक विद्यार्थ्यांत दिसते आहे.

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी-बारावीच्या नियोजित परीक्षाही रद्द केल्या होत्या. अखेर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल दिले गेले. त्यानुसार निकाल जाहीर झाले. या निकालात नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी असून अनेकांना चांगले टक्के मिळाले आहेत. मात्र, तरीही निकालावर समाधानी नसणारे विद्यार्थी पेपर रिचेकिंगचा अर्ज भरतात. त्यातून काही गुण आणि पर्यायाने टक्के वाढतील अशी अपेक्षा त्यांना असते. मात्र यंदा परीक्षाच झाली नाही तर पेपर नाही आणि रिचेकिंग नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी नाराज आहेत, तसेच आपल्या सोबतच्या मित्र, मैत्रिणींना जास्त गुण मिळाले कसे, मला का नाही, असे प्रश्न ते उपस्थित करत आहेत.

------------------

मला माझ्या मैत्रिणीपेक्षा नववीच्या वर्गात अधिक गुण होते. जर ते गुणही यंदाच्या निकालात ग्राह्य धरलेत तर मग मला तिच्यापेक्षा जास्त गुण मिळायला हवे होते, मात्र मला तिच्यापेक्षा आणि अपेक्षेपेक्षा बरेच कमी टक्के मिळाले.

चिन्मयी राहे, विद्यार्थिनी

-----------

मला अकरावीत आणि अंतर्गत परीक्षांमध्ये माझ्या मित्र, मैत्रिणींइतकेच साधारण गुण मिळाले होते. मग आताच्या आमच्या निकालात फरक कसा काय? माझी टक्केवारी इतरांपेक्षा कमी कशी काय? आता यासाठी कोणाला विचारणा करायची?

शाल्व देसाई, विद्यार्थी

-------------

माझ्याच मुलाला नाही तर परिचयातील अनेक मुलांना नववी आणि अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण होते, मात्र त्या तुलनेत दहावीचा अंतिम निकाल दिसत नाही. नेमका कोणता फॉर्म्युला वापरला काही स्पष्ट होत नाही; पण रिचेकिंग नसल्याने मुले नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया एका पालकांनी दिली.

-------------

रिचेकिंग नाही, पण गुण पडताळणीचा वेगळा काही पर्याय आहे का? कसे गुण ग्राह्य धरले हे कळेल का, असे अनेक प्रश्न विचारले जातात. मात्र यंदा शासनाने मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने परीक्षा न घेता उलट खूप चांगला फॉर्म्युला वापरून निकाल दिला. अनेकांना चांगले टक्के मिळाले. कोणाला कमी, जास्त झाले असतील तर नाराज होऊ नये, अशाप्रकारे समजावत असल्याचे एका बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले.