शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वॉर्डन चार महिने मानधनाविना, संसाराचा गाडा हाकायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 05:36 IST

कुटुंब हवालदिल : संसाराचा गाडा हाकायचा कसा?

उल्हासनगर : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना मदत करणारे वॉर्डन मागील चार महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. पालिकेकडून वेळेत पगार होत नसल्याने वॉर्डन यांच्या कुटुंबाची वाताहत होत असून वेळेत मानधन देण्याची मागणी वाहतूक विभागाने केली आहे.

उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. नागरिकांनादिलासा देऊन वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने महापालिकेला वॉर्डन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, पालिकेने वाहतूक विभागाला ४० व त्यानंतर एकूण ७५ वॉर्डन नियुक्तीला वाहतूक विभागाला परवानगी दिली. एका वॉर्डनला दरमहा चार हजार मानधन सुरुवातीला दिले जात होते. मात्र, ते पुरेसे नसल्याची मागणी वाहतूक विभागाकडून आल्यावर तीन महिन्यांपूर्वी मानधन चारवरून सहा हजार करण्यात आले. महापालिकेकडून दरमहा मानधन दिले जात नसल्याने वॉर्डनच्या कुटुंबाची वाताहत होत असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.महापालिका वाहन विभागाचे व्यवस्थापक यशवंत सगळे यांनी वॉर्डन यांचे दरमहिन्याला मानधनाचे बिल लेखा विभागाकडे पाठवत असल्याची माहिती दिली. तर, मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.शहर वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक घेटे यांनी वॉर्डनचे मानधन दरमहा काढण्याची विनंती पालिकेकडे केली आहे. महापालिकेने ७५ वॉर्डनबरोबरच जॅमर व इतर सुविधा वाहतूक विभागाला दिल्या आहेत. मात्र, कोंडी सुटण्याऐवजी परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. वॉर्डनचा ड्युटी अहवाल वाहतूक पोलीस विभाग पालिकेला नियमित देत नसल्याचे वाहतूक व्यवस्थापक यशवंत सगळे यांनी सांगितले.चौक, गर्दीच्या ठिकाणाहून वॉर्डन गायबमहापालिकेने शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तब्बल ७५ वॉर्डन घेण्यास वाहतूक विभागाला परवानगी दिली. मात्र चौक, रस्ते, गर्दीची ठिकाणे, मुख्य बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी वॉर्डनची नेमणूक केली. मात्र, बहुतांश ठिकाणचे वॉर्डन गायब असल्याचे चित्र शहरात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर