शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

स्फोटामुळे घरांचे ६ कोटींचे नुकसान!

By admin | Updated: June 3, 2016 01:57 IST

प्रोबेस एंटरप्रायजेस या रासायनिक कंपनीत गेल्या गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटात ६५ कंपन्यांसह सुमारे तीन हजार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अनिकेत घमंडी,  डोंबिवलीप्रोबेस एंटरप्रायजेस या रासायनिक कंपनीत गेल्या गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटात ६५ कंपन्यांसह सुमारे तीन हजार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून प्राथमिक अंदाजानुसार रहिवाशांचे सहा कोटींचे नुकसान झाले आहे. कंपन्यांचे नेमके किती नुकसान झाले याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. विधान परिषद निवडणुकीमुळे पंचनाम्यांचा अहवाल राज्य शासनाला देण्यास काहीसा विलंब होणार आहे. तो अहवाल मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज येईल आणि त्यानंतरच भरपाईचे स्वरुप ठरेल. त्यालाही अवधी लागणार आहे.पंचनामे करणारे अधिकारी-कर्मचारी चार दिवस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने हा अहवाल देण्यास त्यांना पुढच्या आठवड्यातच वेळ मिळेल. ज्या कंपन्यांनी विमा उतरविला आहे, त्यांना किती-कशी भरपाई मिळू शकते, याचीही माहिती घेणे सुरू आहे. स्फोटाच्या हादऱ्यांमुळे ज्या घरांचे नुकसान झाले, त्यात आजुबाजुच्या बहुतांश घरांतील काचेच्या खिडक्या, दरवाजे, काही ठिकाणी भिंतींना तडे जाणे असे नुकसान झाले आहे. अनेकांचे फ्रीज, टीव्ही यांसह अन्य विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे झाल्याने अनेकांनी सरकारी मदतीची वाट न पाहता दुरूस्तीची कामे सुरू केली आहेत.भिवंडीत गोदामातील ताग्यांना आगभिवंडी : कणेरी भागातील आग्रा रोडवर असलेल्या महेश डाइंगच्या पहिल्या मजल्यावरील गोदामातील कपड्यांच्या ताग्यांना गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. भिवंडी महापालिकेसह अन्य ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दुपारी २ च्या सुमारास आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव राज्य राखीव दलाची एक तुकडी घटनास्थळी तैनात करण्यात आली होती.महेश डाइंगमध्ये कच्च्या कापडावर प्रक्रिया केली जाते. या डाइंगच्या पहिल्या मजल्यावरील गोदामात रंगवलेल्या व फिनिशिंग केलेल्या कापडाचा साठा होता. या कापडाच्या ताग्यांना आग लागली. डाइंगमध्ये आग विझवण्याची कोणतीही साधनसामग्री नव्हती. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. ती दोन मजली इमारतीत सर्वत्र पसरली. ती आटोक्यात आणताना भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाची दमछाक झाली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. त्यांनी अथक प्रयत्न करून दुपारी २ वाजता आग आटोक्यात आणली. (प्रतिनिधी)