शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्फोटामुळे घरांचे ६ कोटींचे नुकसान!

By admin | Updated: June 3, 2016 01:57 IST

प्रोबेस एंटरप्रायजेस या रासायनिक कंपनीत गेल्या गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटात ६५ कंपन्यांसह सुमारे तीन हजार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अनिकेत घमंडी,  डोंबिवलीप्रोबेस एंटरप्रायजेस या रासायनिक कंपनीत गेल्या गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटात ६५ कंपन्यांसह सुमारे तीन हजार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून प्राथमिक अंदाजानुसार रहिवाशांचे सहा कोटींचे नुकसान झाले आहे. कंपन्यांचे नेमके किती नुकसान झाले याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. विधान परिषद निवडणुकीमुळे पंचनाम्यांचा अहवाल राज्य शासनाला देण्यास काहीसा विलंब होणार आहे. तो अहवाल मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज येईल आणि त्यानंतरच भरपाईचे स्वरुप ठरेल. त्यालाही अवधी लागणार आहे.पंचनामे करणारे अधिकारी-कर्मचारी चार दिवस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने हा अहवाल देण्यास त्यांना पुढच्या आठवड्यातच वेळ मिळेल. ज्या कंपन्यांनी विमा उतरविला आहे, त्यांना किती-कशी भरपाई मिळू शकते, याचीही माहिती घेणे सुरू आहे. स्फोटाच्या हादऱ्यांमुळे ज्या घरांचे नुकसान झाले, त्यात आजुबाजुच्या बहुतांश घरांतील काचेच्या खिडक्या, दरवाजे, काही ठिकाणी भिंतींना तडे जाणे असे नुकसान झाले आहे. अनेकांचे फ्रीज, टीव्ही यांसह अन्य विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे झाल्याने अनेकांनी सरकारी मदतीची वाट न पाहता दुरूस्तीची कामे सुरू केली आहेत.भिवंडीत गोदामातील ताग्यांना आगभिवंडी : कणेरी भागातील आग्रा रोडवर असलेल्या महेश डाइंगच्या पहिल्या मजल्यावरील गोदामातील कपड्यांच्या ताग्यांना गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. भिवंडी महापालिकेसह अन्य ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दुपारी २ च्या सुमारास आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव राज्य राखीव दलाची एक तुकडी घटनास्थळी तैनात करण्यात आली होती.महेश डाइंगमध्ये कच्च्या कापडावर प्रक्रिया केली जाते. या डाइंगच्या पहिल्या मजल्यावरील गोदामात रंगवलेल्या व फिनिशिंग केलेल्या कापडाचा साठा होता. या कापडाच्या ताग्यांना आग लागली. डाइंगमध्ये आग विझवण्याची कोणतीही साधनसामग्री नव्हती. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. ती दोन मजली इमारतीत सर्वत्र पसरली. ती आटोक्यात आणताना भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाची दमछाक झाली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. त्यांनी अथक प्रयत्न करून दुपारी २ वाजता आग आटोक्यात आणली. (प्रतिनिधी)