शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

किसान ॲपचे वरातीमागून घोडे ; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शेतकऱ्यांना काही काळ आधीच दिल्याचा दावा कृषी विभागाकडून केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शेतकऱ्यांना काही काळ आधीच दिल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तरीही जिल्हाभरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. तब्बल २३८ हेक्टरवरील कृषी संपत्ती या वादळामुळे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. किसान ॲपचे वरातीमागून घोडे या म्हणीप्रमाणे वादळाची ऑनलाईन माहिती मोबाईलवर उशिरा मिळाल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना आपत्तीसह त्यांना उपयुक्त अशी माहिती देण्यासाठी जिल्हाभरात कृषीच्या क्षेत्रिय पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपवर प्रत्येक तालुक्यांचे ग्रुप तयार केलेले आहेत. त्याद्वारे इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना आधीच देऊन अलर्ट केले जाते. शेतकऱ्यांच्या योजनांची माहितीही या ग्रुपवर दिली जाते. वर्षभरात दीड लाखांच्या जवळपास एसएमएस शेतकऱ्यांना वेळच्या वेळी दिले जात असल्याचा दावा जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकार अंकुश माने यांनी केला. या माहितीचा लाभ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताैक्ते चक्रीवादळाचा फटका बसून जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. यात घरांच्या नुकसानीसह शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह आंबा, रोपवाटिका आदींचे नुकसान झाले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. यादरम्यान ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क अभावी बहुतांशी शेतकऱ्यांना माहिती मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तिघांच्या मृत्यूसह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ५६६ घरांचे नुकसान झाले असून २३८ हेक्टरवरील आंबा, काजू, भात आणि भाजीपाल्याचे नुकसान होऊन तब्बल १६४ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसासह वादळी वारा ताशी ९० ते १०० किमी वेगाने वाहत होता. जिल्ह्यातील २३८ हेक्टरवरील आंबा-काजूसह रोपवाटिकांचे मुरबाड, भिवंडी व शहापूर तालुक्यात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील १६४ गावांमधील २३८.१० हेक्टरवरील आंब्यासह काजू, केळी, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचे नुकसान या अवकाळी पावसाने झाले आहे. जिल्ह्यातील ५८२ शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. या शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले, पॉलिनेट तुटले, घरावरील पत्रेही उडाली. जिल्ह्यातील रोपवाटिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुरबाडमधील रोपवाटिकांच्या ३ हजार २०० रोपांचे नुकसान झाले. भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील रोपवाटिकेतील ४ हजार ४५० रोपांची वाट या वादळाने लावली आहे. यामध्ये आंब्यांच्या कलमांसह काजू, बदाम, जांभूळ, सीताफळ, सांग, शेवगा आदी रोपांच्या नुकसानीचा फटका वाटिकांना बसला आहे.

.........