शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

किसान ॲपचे वरातीमागून घोडे ; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शेतकऱ्यांना काही काळ आधीच दिल्याचा दावा कृषी विभागाकडून केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शेतकऱ्यांना काही काळ आधीच दिल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तरीही जिल्हाभरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. तब्बल २३८ हेक्टरवरील कृषी संपत्ती या वादळामुळे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. किसान ॲपचे वरातीमागून घोडे या म्हणीप्रमाणे वादळाची ऑनलाईन माहिती मोबाईलवर उशिरा मिळाल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना आपत्तीसह त्यांना उपयुक्त अशी माहिती देण्यासाठी जिल्हाभरात कृषीच्या क्षेत्रिय पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपवर प्रत्येक तालुक्यांचे ग्रुप तयार केलेले आहेत. त्याद्वारे इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना आधीच देऊन अलर्ट केले जाते. शेतकऱ्यांच्या योजनांची माहितीही या ग्रुपवर दिली जाते. वर्षभरात दीड लाखांच्या जवळपास एसएमएस शेतकऱ्यांना वेळच्या वेळी दिले जात असल्याचा दावा जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकार अंकुश माने यांनी केला. या माहितीचा लाभ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताैक्ते चक्रीवादळाचा फटका बसून जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. यात घरांच्या नुकसानीसह शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह आंबा, रोपवाटिका आदींचे नुकसान झाले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. यादरम्यान ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क अभावी बहुतांशी शेतकऱ्यांना माहिती मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तिघांच्या मृत्यूसह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ५६६ घरांचे नुकसान झाले असून २३८ हेक्टरवरील आंबा, काजू, भात आणि भाजीपाल्याचे नुकसान होऊन तब्बल १६४ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसासह वादळी वारा ताशी ९० ते १०० किमी वेगाने वाहत होता. जिल्ह्यातील २३८ हेक्टरवरील आंबा-काजूसह रोपवाटिकांचे मुरबाड, भिवंडी व शहापूर तालुक्यात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील १६४ गावांमधील २३८.१० हेक्टरवरील आंब्यासह काजू, केळी, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचे नुकसान या अवकाळी पावसाने झाले आहे. जिल्ह्यातील ५८२ शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. या शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले, पॉलिनेट तुटले, घरावरील पत्रेही उडाली. जिल्ह्यातील रोपवाटिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुरबाडमधील रोपवाटिकांच्या ३ हजार २०० रोपांचे नुकसान झाले. भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील रोपवाटिकेतील ४ हजार ४५० रोपांची वाट या वादळाने लावली आहे. यामध्ये आंब्यांच्या कलमांसह काजू, बदाम, जांभूळ, सीताफळ, सांग, शेवगा आदी रोपांच्या नुकसानीचा फटका वाटिकांना बसला आहे.

.........