शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

किसान ॲपचे वरातीमागून घोडे ; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शेतकऱ्यांना काही काळ आधीच दिल्याचा दावा कृषी विभागाकडून केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शेतकऱ्यांना काही काळ आधीच दिल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तरीही जिल्हाभरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. तब्बल २३८ हेक्टरवरील कृषी संपत्ती या वादळामुळे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. किसान ॲपचे वरातीमागून घोडे या म्हणीप्रमाणे वादळाची ऑनलाईन माहिती मोबाईलवर उशिरा मिळाल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना आपत्तीसह त्यांना उपयुक्त अशी माहिती देण्यासाठी जिल्हाभरात कृषीच्या क्षेत्रिय पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपवर प्रत्येक तालुक्यांचे ग्रुप तयार केलेले आहेत. त्याद्वारे इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना आधीच देऊन अलर्ट केले जाते. शेतकऱ्यांच्या योजनांची माहितीही या ग्रुपवर दिली जाते. वर्षभरात दीड लाखांच्या जवळपास एसएमएस शेतकऱ्यांना वेळच्या वेळी दिले जात असल्याचा दावा जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकार अंकुश माने यांनी केला. या माहितीचा लाभ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताैक्ते चक्रीवादळाचा फटका बसून जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. यात घरांच्या नुकसानीसह शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह आंबा, रोपवाटिका आदींचे नुकसान झाले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. यादरम्यान ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क अभावी बहुतांशी शेतकऱ्यांना माहिती मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तिघांच्या मृत्यूसह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ५६६ घरांचे नुकसान झाले असून २३८ हेक्टरवरील आंबा, काजू, भात आणि भाजीपाल्याचे नुकसान होऊन तब्बल १६४ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसासह वादळी वारा ताशी ९० ते १०० किमी वेगाने वाहत होता. जिल्ह्यातील २३८ हेक्टरवरील आंबा-काजूसह रोपवाटिकांचे मुरबाड, भिवंडी व शहापूर तालुक्यात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील १६४ गावांमधील २३८.१० हेक्टरवरील आंब्यासह काजू, केळी, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचे नुकसान या अवकाळी पावसाने झाले आहे. जिल्ह्यातील ५८२ शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. या शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले, पॉलिनेट तुटले, घरावरील पत्रेही उडाली. जिल्ह्यातील रोपवाटिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुरबाडमधील रोपवाटिकांच्या ३ हजार २०० रोपांचे नुकसान झाले. भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील रोपवाटिकेतील ४ हजार ४५० रोपांची वाट या वादळाने लावली आहे. यामध्ये आंब्यांच्या कलमांसह काजू, बदाम, जांभूळ, सीताफळ, सांग, शेवगा आदी रोपांच्या नुकसानीचा फटका वाटिकांना बसला आहे.

.........